शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

भोलेश्वरीच्या पात्राचे खोलीकरण रखडले

By admin | Updated: June 20, 2015 02:36 IST

येथील भोलेश्वरी नदीच्या पात्रात गाळ साचल्याने पात्र उथळ झाले आहे. यामुळे कमी प्रमाणात पाऊस झाला तरी नदीला पूर येतो.

रोहणा : येथील भोलेश्वरी नदीच्या पात्रात गाळ साचल्याने पात्र उथळ झाले आहे. यामुळे कमी प्रमाणात पाऊस झाला तरी नदीला पूर येतो. या नदीकाठावर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. यापूर्वी नदीला आलेल्या पुरात वित्तहानी व जीवितहानी झाली होती. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नवीन सोना यांनी नदीपात्राच्या खोलीकरणाचे संबंधित यंत्रणेला आदेश दिले होते. मात्र त्याची आजवर अंमलबजावणी झालेली नाही.येथील नदीपात्राचे खोलीकरण झाले नसल्याने नदीकाठावर ज्यांची घरे आहेत त्यांना पुराचा धोका आहे. यामुळे येथील नागरिक अस्वस्थ झाले आहे. सन २०१२ च्या जुलै महिन्यात पावसाने हाहाकार उडाला. भोलेश्वरीचा पूर अर्ध्या गावापर्यंत शिरला होता. यात अनेक कुटुंबाची वाताहत झाली. शेकडो कुटुंबांना महिनाभर शिबिरात काढावे लागले. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी खुद्द जिल्हाधिकारी यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून नदीपात्राचे खोलीकरण करण्याचे आदेश दिले होते.येथील नदीपात्राचे अद्याप खोलीकरण झाले नाही. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यानीही यासाठी १० लाख रुपये निधीची तरतूदही केली होती. पण या न त्या कारणाने सदर निधी परत गेला असल्याची माहिती आहे. तीन वर्षांचा काळ लोटला नदीपात्राचे खोलीकरण झाले नाही. यापूर्वी पुराच्या घटना घडल्या असल्याने शासनाकडून खबरदारी घेण्यात येत नाही. गावातील गांधी वॉर्डात राहणाऱ्या लोकांना मोठा फटका बसतो. पावसाळा तोंडावर आले आहे. नदीपात्राचे खोलीकरण करणे शक्य आहे. पुराने होणारी वित्तहानी टाळण्यासाठी खोलीकरण आवश्यक आहे. शासकीय यंत्रणेने वेळ न दवडता भोलेश्वरीच्या पात्राचे खोलीकरण करुन भविष्यातील संभाव्य धोका टाळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.(वार्ताहर)