शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धाम नदीला बेशरमचा विळखा

By admin | Updated: February 8, 2016 02:18 IST

जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले;

स्वच्छता अभियान कागदावरच : जलसाठ्यावरही संकटवर्धा : जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले; पण या दोन्ही योजना जिल्ह्यातील नद्यांना शिवल्याच नसल्याचे वास्तव आहे. यामुळेच जनतेची तृष्णा भागविणाऱ्या वर्धा, वणा, धाम व अन्य नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. धाम नदीच्या पात्रात तर सर्वत्र बेशरमचेच राज्य असल्याचे दिसून येते.केंद्र शासनाच्यावतीने नद्या स्वच्छ करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले होते. गंगा नदी स्वच्छ करीत असतानाच या अभियानाचा बोजवारा उडाला. यानंतर राज्यात जलस्त्रोत बळकट करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. यात नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच तलावाच्या खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली. वर्धा जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांत नाला सरळीकरणाची कामे करण्यात आली; पण कुठेही नद्यांच्या स्वच्छतेकरिता पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. धाम नदीच्या स्वच्छतेकरिता पवनार ग्रा.पं. ने पुढाकार घेतला; पण तोही औटघटकेचाच ठरला. वर्धा नदीच्या स्वच्छतेची मोहिमही हाती घेतली होती; पण त्याचाही बोजवाराच उडाला. खरांगणा (मो.) येथेही धाम नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला; पण तोही अपूराच ठरला. किमान जिल्ह्यातील मुख्य नद्या स्वच्छ होणे गरजेचे असताना प्रशासकीय स्तरावर कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. पाटबंधारे विभाग जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडे बोट दाखवित असल्याचे दिसते. नदी स्वच्छता अभियान राबविताना सामूहिक प्रयत्न गरजेचे असताना त्या दृष्टीने कुणीही विचार करताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्यातील नद्यांचे पात्र बकाल झाले आहे. याकडे लक्ष देत पुढाकार घेणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)दूषित पाण्याचा होतो पुरवठाधाम नदी ही जिल्ह्यातील बहुतांश भागाची तहाण भागविणारी नदी म्हणून ओळखली जाते. पिपरी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी येळाकेळी आणि पवनार येथील पम्प हाऊस येथून पाणी घेतले जाते. शिवाय यात वर्धेत जलशुद्धीकरण केंद्र असले तरी अनेक गावांतही याच नदीतील पाण्याचा पुरवठा होतो. ग्रामीण भागात जलशुद्धीकरण केंद्र नाही. यामुळे ग्रामस्थांना बेशरम, लव्हाळ्यांसह अन्य वनस्पतींमुळे दूषित झालेले पाणीच पिण्याकरिता वापरावे लागते. किमान गाव, शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तरी आपापल्या क्षेत्रात येणारे नदी पात्र स्वच्छ केले तर संपूर्ण नदी स्वच्छ होण्यास वेळ लागणार आहे. यासाठी कुणी एकाचा पुढाकार गरजेचा आहे.