शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

धाम नदीला बेशरमचा विळखा

By admin | Updated: February 8, 2016 02:18 IST

जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले;

स्वच्छता अभियान कागदावरच : जलसाठ्यावरही संकटवर्धा : जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले; पण या दोन्ही योजना जिल्ह्यातील नद्यांना शिवल्याच नसल्याचे वास्तव आहे. यामुळेच जनतेची तृष्णा भागविणाऱ्या वर्धा, वणा, धाम व अन्य नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. धाम नदीच्या पात्रात तर सर्वत्र बेशरमचेच राज्य असल्याचे दिसून येते.केंद्र शासनाच्यावतीने नद्या स्वच्छ करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले होते. गंगा नदी स्वच्छ करीत असतानाच या अभियानाचा बोजवारा उडाला. यानंतर राज्यात जलस्त्रोत बळकट करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. यात नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच तलावाच्या खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली. वर्धा जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांत नाला सरळीकरणाची कामे करण्यात आली; पण कुठेही नद्यांच्या स्वच्छतेकरिता पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. धाम नदीच्या स्वच्छतेकरिता पवनार ग्रा.पं. ने पुढाकार घेतला; पण तोही औटघटकेचाच ठरला. वर्धा नदीच्या स्वच्छतेची मोहिमही हाती घेतली होती; पण त्याचाही बोजवाराच उडाला. खरांगणा (मो.) येथेही धाम नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला; पण तोही अपूराच ठरला. किमान जिल्ह्यातील मुख्य नद्या स्वच्छ होणे गरजेचे असताना प्रशासकीय स्तरावर कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. पाटबंधारे विभाग जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडे बोट दाखवित असल्याचे दिसते. नदी स्वच्छता अभियान राबविताना सामूहिक प्रयत्न गरजेचे असताना त्या दृष्टीने कुणीही विचार करताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्यातील नद्यांचे पात्र बकाल झाले आहे. याकडे लक्ष देत पुढाकार घेणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)दूषित पाण्याचा होतो पुरवठाधाम नदी ही जिल्ह्यातील बहुतांश भागाची तहाण भागविणारी नदी म्हणून ओळखली जाते. पिपरी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी येळाकेळी आणि पवनार येथील पम्प हाऊस येथून पाणी घेतले जाते. शिवाय यात वर्धेत जलशुद्धीकरण केंद्र असले तरी अनेक गावांतही याच नदीतील पाण्याचा पुरवठा होतो. ग्रामीण भागात जलशुद्धीकरण केंद्र नाही. यामुळे ग्रामस्थांना बेशरम, लव्हाळ्यांसह अन्य वनस्पतींमुळे दूषित झालेले पाणीच पिण्याकरिता वापरावे लागते. किमान गाव, शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तरी आपापल्या क्षेत्रात येणारे नदी पात्र स्वच्छ केले तर संपूर्ण नदी स्वच्छ होण्यास वेळ लागणार आहे. यासाठी कुणी एकाचा पुढाकार गरजेचा आहे.