शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

धाम नदीला बेशरमचा विळखा

By admin | Updated: February 8, 2016 02:18 IST

जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले;

स्वच्छता अभियान कागदावरच : जलसाठ्यावरही संकटवर्धा : जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तत्पूर्वी नदी स्वच्छता अभियानही राबविण्यात आले; पण या दोन्ही योजना जिल्ह्यातील नद्यांना शिवल्याच नसल्याचे वास्तव आहे. यामुळेच जनतेची तृष्णा भागविणाऱ्या वर्धा, वणा, धाम व अन्य नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. धाम नदीच्या पात्रात तर सर्वत्र बेशरमचेच राज्य असल्याचे दिसून येते.केंद्र शासनाच्यावतीने नद्या स्वच्छ करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले होते. गंगा नदी स्वच्छ करीत असतानाच या अभियानाचा बोजवारा उडाला. यानंतर राज्यात जलस्त्रोत बळकट करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. यात नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच तलावाच्या खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली. वर्धा जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अनेक गावांत नाला सरळीकरणाची कामे करण्यात आली; पण कुठेही नद्यांच्या स्वच्छतेकरिता पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. धाम नदीच्या स्वच्छतेकरिता पवनार ग्रा.पं. ने पुढाकार घेतला; पण तोही औटघटकेचाच ठरला. वर्धा नदीच्या स्वच्छतेची मोहिमही हाती घेतली होती; पण त्याचाही बोजवाराच उडाला. खरांगणा (मो.) येथेही धाम नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न झाला; पण तोही अपूराच ठरला. किमान जिल्ह्यातील मुख्य नद्या स्वच्छ होणे गरजेचे असताना प्रशासकीय स्तरावर कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. पाटबंधारे विभाग जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडे बोट दाखवित असल्याचे दिसते. नदी स्वच्छता अभियान राबविताना सामूहिक प्रयत्न गरजेचे असताना त्या दृष्टीने कुणीही विचार करताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्यातील नद्यांचे पात्र बकाल झाले आहे. याकडे लक्ष देत पुढाकार घेणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)दूषित पाण्याचा होतो पुरवठाधाम नदी ही जिल्ह्यातील बहुतांश भागाची तहाण भागविणारी नदी म्हणून ओळखली जाते. पिपरी येथील पाणी पुरवठा योजनेसाठी येळाकेळी आणि पवनार येथील पम्प हाऊस येथून पाणी घेतले जाते. शिवाय यात वर्धेत जलशुद्धीकरण केंद्र असले तरी अनेक गावांतही याच नदीतील पाण्याचा पुरवठा होतो. ग्रामीण भागात जलशुद्धीकरण केंद्र नाही. यामुळे ग्रामस्थांना बेशरम, लव्हाळ्यांसह अन्य वनस्पतींमुळे दूषित झालेले पाणीच पिण्याकरिता वापरावे लागते. किमान गाव, शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी तरी आपापल्या क्षेत्रात येणारे नदी पात्र स्वच्छ केले तर संपूर्ण नदी स्वच्छ होण्यास वेळ लागणार आहे. यासाठी कुणी एकाचा पुढाकार गरजेचा आहे.