शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

११२ वर फेक कॉल कराल तर खबरदार; दाखल होईल गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 18:04 IST

फेक कॉल करून पोलिसांचा वेळ वाया घालवून त्यांना त्रास देणे आता महागात पडणार आहे. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज असून, असे केल्यास त्यांच्यावरच गुन्हा दाखल होणार आहे.

ठळक मुद्देतत्काळ मदत मिळत असल्याने दिलासा नियंत्रण कक्षात २४ तास सेवा

वर्धा : तक्रारकर्त्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी पोलीस विभागात आता ‘डायल ११२’ ही नवी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तक्रारकर्त्याने फोन केल्यास दहाव्या मिनिटाला मदत दिली जाते. मात्र, ११२ क्रमांकावर फेक कॉल करणारेही असतातच. त्यामुळे या क्रमांकावर फेक कॉल केल्यास खबरदार, गुन्हादेखील दाखल होऊ शकतो.

राज्य सरकारने सर्वच टोल फ्री क्रमांक आता एका डायल ११२ या क्रमांकावर आणले आहेत. ११२ क्रमांकावर कॉल केल्यास अवघ्या दहाव्या मिनिटाला मदत पोहोचविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्वतंत्र कंट्रोल युनिट स्थापन करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक वाय. एस. किचक, खैरकार तसेच महेंद्रा कंपनीचे अभियंता निखिल ढोक आणि रुकेश ढोले हे काम सांभाळत आहेत.

२७ सप्टेंबरपासून डायल ११२ ही नवी अत्याधुनिक प्रणाली वर्धा जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमध्ये अत्याधुनिक पोलीस वाहनेही उपलब्ध झाली असून, तक्रारदाराला क्विक रिस्पॉन्स मिळत आहे. मात्र, नवरा भांडतोय, बायको मारतेय, मुलगा अभ्यास करीत नाही, अशी कारणे सांगणे तसेच फेक कॉल करून पोलिसांचा वेळ वाया घालवून त्यांना त्रास देणे आता महागात पडणार आहे. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज असून, असे केल्यास त्यांच्यावरच गुन्हा दाखल होणार आहे.

तत्काळ मदतीसाठी २७४ जणांची फौज

जिल्ह्यात डायल ११२ ‘क्विक रिस्पॉन्स व्हेईकल’ ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्वतंत्र युनिटमधून नागरिकांच्या कॉलला तत्काळ रिस्पॉन्स दिला जात आहे. जिल्ह्यात तब्बल २७४ जणांची फौज मदतीसाठी धावत आहेत.

तीन महिन्यांत ५४० कॉल

सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या डायल ११२ या नव्या प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. तत्काळ मदत पोहोचत असल्याने पोलिसांची प्रतिमादेखील उंचावत आहे. सप्टेंबर महिन्याच्या चार दिवसांत ३० कॉल, ऑक्टोबर महिन्यात २७४ आणि नोव्हेंबरमध्ये २३६ अशा एकूण ५४० नागरिकांपर्यंत पोलीस मदत तत्काळ पोहोचविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बायको भांडतेय, यासाठी कशाला हवी मदत

डायल ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ पोलीस मदत पोहोचविण्यात येते. मात्र, अनेकदा बायको भांडण करतेय, नवरा दारू पिऊन मारहाण करतो, मुलगा अभ्यास करीत नाही, सासू वाद करते, आदीप्रकारचे कॉल येतात. त्यामुळे अशा कॉलमुळे पोलिसांचा वेळ वाया जातो. त्यामुळे अशा क्षुल्लक कारणांसाठी ११२ वर कॉल करून मदत मागतानाही दहावेळा विचार करण्याची गरज आहे.

याच कारणासाठी करावा कॉल

एखादा गंभीर गुन्हा घडला असेल, गावात जबर हाणामारी होत असेल, कुणी आत्महत्या केली असेल, खून झाला असेल, कुणी रक्तबंबाळ अवस्थेत पडून असेल, तर अशावेळी डायल ११२ या अत्याधुनिक प्रणाली असलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, जेणेकरून तत्काळ मदत पोहोचविली जाईल, विनाकारण फोन कॉल करून पोलिसांना त्रास न देण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

फेक कॉल करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

फेक कॉल करून पोलिसांना त्रास देणाऱ्यांची कुंडली बाहेर काढली जाईल. त्याने कुठून कॉल केला, त्याचे नाव काय, हे सर्व पोलीस यंत्रणेत दिसणार असून, फेक कॉल करणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण कॉल करून त्रास देणे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस कंट्राेल रुमला फेक कॉल करून त्रस्त करणाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. फेक कॉल केल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते;पण हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पोलिसांचा वेळ वाय जातो. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता थेट गुन्हाच दाखल करण्यात येईल. नागरिकांनी याबाबतची दक्षता घ्यावी.

प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी