शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

डायल 112 वर फेक कॉल कराल तर खबरदार; दाखल होईल आता गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

राज्य सरकारने सर्वच टोल फ्री क्रमांक आता एका डायल ११२ या क्रमांकावर आणले आहेत. ११२ क्रमांकावर कॉल केल्यास अवघ्या दहाव्या मिनिटाला मदत पोहोचविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्वतंत्र कंट्रोल युनिट स्थापन करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक वाय. एस. किचक, खैरकार तसेच महेंद्रा कंपनीचे अभियंता निखिल ढोक आणि रुकेश ढोले हे काम सांभाळत आहेत.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तक्रारकर्त्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी पोलीस विभागात आता ‘डायल ११२’ ही नवी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तक्रारकर्त्याने फोन केल्यास दहाव्या मिनिटाला मदत दिली जाते. मात्र, ११२ क्रमांकावर फेक कॉल करणारेही असतातच. त्यामुळे या क्रमांकावर फेक कॉल केल्यास खबरदार, गुन्हादेखील दाखल होऊ शकतो. राज्य सरकारने सर्वच टोल फ्री क्रमांक आता एका डायल ११२ या क्रमांकावर आणले आहेत. ११२ क्रमांकावर कॉल केल्यास अवघ्या दहाव्या मिनिटाला मदत पोहोचविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्वतंत्र कंट्रोल युनिट स्थापन करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक वाय. एस. किचक, खैरकार तसेच महेंद्रा कंपनीचे अभियंता निखिल ढोक आणि रुकेश ढोले हे काम सांभाळत आहेत.२७ सप्टेंबरपासून डायल ११२ ही नवी अत्याधुनिक प्रणाली वर्धा जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमध्ये अत्याधुनिक पोलीस वाहनेही उपलब्ध झाली असून, तक्रारदाराला क्विक रिस्पॉन्स मिळत आहे. मात्र, नवरा भांडतोय, बायको मारतेय, मुलगा अभ्यास करीत नाही, अशी कारणे सांगणे तसेच फेक कॉल करून पोलिसांचा वेळ वाया घालवून त्यांना त्रास देणे आता महागात पडणार आहे. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज असून, असे केल्यास त्यांच्यावरच गुन्हा दाखल होणार आहे.

तत्काळ मदतीसाठी २७४ जणांची फौज-    पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात तब्बल २७४ जणांची फौज मदतीसाठी धावत असून तक्रारकर्त्यांना तत्काळ मदत मिळत आहे.

फेक कॉल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल - फेक कॉल करून पोलिसांना त्रास देणाऱ्यांची कुंडली बाहेर काढली जाईल. त्याने कुठून कॉल केला, त्याचे नाव काय, हे सर्व पोलीस यंत्रणेत दिसणार असून, फेक कॉल करणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण कॉल करून त्रास देणे बंद करण्याचे आवाहन केले.

बायको भांडतेय, यासाठी कशाला हवी मदत

-    डायल ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ पोलीस मदत पोहोचविण्यात येते. मात्र, अनेकदा बायको भांडण करतेय, नवरा दारू पिऊन मारहाण करतो, मुलगा अभ्यास करीत नाही, सासू वाद करते, आदीप्रकारचे कॉल येतात. त्यामुळे अशा कॉलमुळे पोलिसांचा वेळ वाया जातो. त्यामुळे अशा क्षुल्लक कारणांसाठी ११२ वर कॉल करून मदत मागतानाही दहावेळा विचार करण्याची गरज आहे. 

पोलीस कंट्राेल रूमला फेक कॉल करून त्रस्त करणाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. फेक कॉल केल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते;पण हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पोलिसांचा वेळ वाय जातो. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता थेट गुन्हाच दाखल करण्यात येईल. नागरिकांनी याबाबतची दक्षता घ्यावी.प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.

तीन महिन्यांत ५४० कॉल-   सप्टेंबर महिन्यापासून सुरू  झालेल्या डायल ११२ या नव्या प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. तत्काळ मदत पोहोचत असल्याने पोलिसांची प्रतिमादेखील उंचावत आहे. सप्टेंबर महिन्याच्या चार दिवसांत ३० कॉल, ऑक्टोबर महिन्यात २७४ आणि नोव्हेंबरमध्ये २३६ अशा एकूण ५४० नागरिकांपर्यंत पोलीस मदत तत्काळ पोहोचविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याच कारणासाठी करावा कॉल-  एखादा गंभीर गुन्हा घडला असेल, गावात जबर हाणामारी होत असेल, कुणी आत्महत्या केली असेल, खून झाला असेल, कुणी रक्तबंबाळ अवस्थेत पडून असेल, तर अशावेळी डायल ११२ या अत्याधुनिक प्रणाली असलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, जेणेकरून तत्काळ मदत पोहोचविली जाईल, विनाकारण फोन कॉल करून पोलिसांना त्रास न देण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस