शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

फुकट्या प्रवाशांनो सावधान! रोज 250 बसेसची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाययोेजनांचे पालन करून प्रवाशांची ने-आण सध्या रापम करीत असले तरी, फुकट्या प्रवाशांमुळे मोठा तोटा या विभागाला सोसावा लागतो. हाच तोटा टाळता यावा तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागस्तरावर पाच, तर आगारस्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी बससेवा सुरू करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तींंमुळे रापमला तोटा सहन करावा लागतो. याच फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वर्ध्याच्या रापम विभागाने कंबर कसली असून, तब्बल दहा पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून दररोज किमान २५० बसेसची तपासणी केली जात आहे.जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे पाच आगार असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसेस सोडल्या जात आहेत. कोरोनाबाबतच्या खबरदारीच्या उपाययोेजनांचे पालन करून प्रवाशांची ने-आण सध्या रापम करीत असले तरी, फुकट्या प्रवाशांमुळे मोठा तोटा या विभागाला सोसावा लागतो. हाच तोटा टाळता यावा तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागस्तरावर पाच, तर आगारस्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत. ही दहा पथके प्रत्येक दिवशी किमान २५० बसेसची तपासणी करून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. 

तीन दिवसात १ हजार बसेसची तपासणी

फुकट्या प्रवाशांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कंबर कसली आहे.जिल्ह्यात सध्या विशेष मोहीम राबवून बसमधील प्रवासी विना तिकीट तर प्रवास करीत नाही ना, याची पडताळणी केली जात आहे.मागील तीन दिवसात १ हजाराहून अधिक बसेसची तपासणी या दहा पथकांकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये दंडमोटार वाहन कायदा १९८८ अन्वये विना तिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकविलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती दंड म्हणून वसूल करण्यात येते. त्यामुळे बसमध्ये चढताच तिकीट काढून त्याचे प्रवास संपेपर्यंत जतन करणे क्रमप्राप्तच आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत. एका दिवशी किमान २५० बसेसची तपासणी ही पथके करीत आहेत. प्रवाशांनीही बसमध्ये चढताच तिकीट घ्यावे, तसेच प्रवास संपेपर्यंत त्यांच्याजवळील तिकिटाचे जतन करावे.- विजय धायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, रा.प.म. वर्धा.

 

टॅग्स :state transportएसटी