शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

भेसळयुक्त खवा व पनीरपासून व्हा सावध; घरच्याघरी अशी ओळखा भेसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 07:05 IST

Wardha News भेसळयुक्त खवा आणि पनीरचे सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहूनच विविध खाद्यपदार्थ्यांची खरेदी केली पाहिजे.

ठळक मुद्देसेवन केल्यास होऊ शकतो पोटाचा त्रास

वर्धा: दिवाळीच्या औचित्य साधून मिठाईच्या मागणीत वाढ होते; पण याच संधीचे सोने भेसळखोर करीत असून, भेसळयुक्त खवा आणि पनीरचे सेवन केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहूनच विविध खाद्यपदार्थ्यांची खरेदी केली पाहिजे.विविध मिठाईची निर्मिती करताना खव्याचा वापर केला जातो. तर काही व्यक्ती पनीरचे विविध खाद्यपदार्थ तयार करतात. पण भेसळयुक्त खव्यासह पनीर मनुष्याच्या आरोग्यासाठी हानिकारकच असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. मोठा नफा मिळविण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ आकर्षक दिसावे यासाठी बहुदा भेसळ केली जाते. वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत भेसळयुक्त खवा व पनीरचा वापर होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.घरच्या घरी ओळखा भेसळ खवा शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडा खवा हातावर घेऊन घासून बघावा. खव्याचा पोत दाणेदार असला, तो हातावर चोळल्यानंतर हात तेलकट झाले आणि हाताला शुद्ध तुपासारखा सुगंध आला म्हणजे खवा शुद्ध आहे हे समजावे. शुद्ध खवा ओळखण्याची दुसरी पद्धत अशी आहे की, एक चमचा खवा घ्यावा, तो एक कप गरम पाण्यात मिसळावा. नंतर कपामध्ये आयोडिनचे काही थेंब टाकावेत. आयोडिन टाकल्याने गरम पाण्यात मिसळलेला खवा जर निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ झाली आहे हे समजावे. पनीरचा एक तुकडा घेऊन तो चोळून पाहावा. चोळल्यानंतर त्या पनीरचे लगेचच बारीक तुकडे व्हायला लागले. तर समजावे की पनीर भेसळयुक्त आहे. पनीर पाण्यात उकळून थंड करावे. थंड झाल्यानंतर त्यातल्या एका तुकड्यावर आयोडिन टिंचरचे काही थेंब घालावेत. त्यानंतर पनीरचा रंग निळा झाला, तर ते पनीर बनावटी असल्याचे समजावे.तर वाढू शकतो पोटाचा त्रासभेसळयुक्त खवा, पनीर पदार्थ लोकांना विकणे हा गुन्हा असला तरी अनेक व्यक्ती मोठा नफा मिळविण्यासाठी भेसळीचा गोरखधंदा करतात. भेसळयुक्त खाद्यपदाथार्चे सेवन केल्यास कर्करोग, मूत्रपिंड, पोटदुखी, अपचन, त्वचेवर रॅशेस, डोकेदुखी, टायफॉइड, अल्सर यांसारखे विविध आजार नागरिकांना जडू शकतात.अन्न व औषध प्रशासन सुस्तचवर्धा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाकडे पूर्वीच मनुष्यबळाची चणचण आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील शासनाच्या या विभागाच्या बड्या अधिकाऱ्याकडे इतर जिल्ह्याचाही प्रभार असल्याने ते मोजकेच दिवस वर्धा जिल्ह्यासाठी देतात. दिवाळीच्या तोंडावर भेसळबाजीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज असताना अन्न व औषध प्रशासन सुस्त असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.अल्प मनुष्यबळजिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात अल्प मनुष्यबळ सध्या कार्यरत आहे. त्यामुळे कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. शासनानेही या विभागातील रिक्त पद तातडीने भरण्याची गरज आहे.

 

 

टॅग्स :foodअन्न