शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीची दहशत कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:48 IST

बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी समुद्रपूर तालुक्यातील कोरा भागातील शेतशिवाराचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी केला कोरा शिवाराचा दौरा : शेतकºयांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी समुद्रपूर तालुक्यातील कोरा भागातील शेतशिवाराचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.कामगंध सापळ्यांचा वापर करा, त्याचप्रमाणे कृषी विभागामार्फत ज्या ज्या सूचना देण्यात येत आहे, त्याचे पालन करा. बोंडअळीचा आपण सामना करू शकतो असे जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतकऱ्यांना सांगितले. एका शेतकऱ्याने याप्रसंगी म्हटले की, बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे हाल होत असून औषधी निर्माते व विक्रेते मालामाल होत आहे. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले की, कोणी कोणतीही कीटकनाशके वापरली म्हणून आपण ही ती वापरावी असे करू नका तर आपल्या पिकाला कशाची आवश्यकता आहे, याचा विचार करून कीटकनाशकांचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले. नारायणपूर येथील युवराज सालवरकर या शेतकºयांचे ५ एकरातील सोयाबीन शेत अळीने नष्ट केले. महागडे कीटकनाशक वापरण्याची गरज नाही तर किनालफॉस, प्रोफीनोफॉन या औषधाने या अळ्यांवर नियंत्रण मिळविता येते. त्याचप्रमाणे सोयाबीनवर असलेली बुरशी, आलेली अळी गोळा करून त्यात थोडा गुळ मिसळून पाण्यामध्ये मिश्रण करून फवारणी करावी. अळीवर आळा बसविता येते अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी यावेळी शेतकºयांना दिली. कोरा येथे शुक्रवारला कपाशी व सोयाबीन पीकावर कृषी मार्गदर्शन कार्यक्रम ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.यावेळी बजरंग अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजमध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल, डॉ. विद्या मानकर, नायब तहसीलदार मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, मेश्राम, बजरंग अ‍ॅग्रो इंडस्ट्रिजचे खरशे, कृषी पर्यवेक्षक धोटे, जि.प. सदस्य रोशन चौखे, पं.स. सदस्य वसंता घुमडे, कोराचे सरपंच अरूण चौधरी आदीशी संवाद साधला.बोंडअळी प्रादुर्भावाला ‘राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती’ घोषित करावर्धा- कपाशीच्या पिकावर आलेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदील झाला आहे. आलेल्या संकटाला ‘राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती’ घोषीत करा, अशी मागणी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली आहे. शासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाच्या पिकावर बोंडे लागल्यानंतर बोंडअळीच्या प्रादुर्भाव झाला होता. परंतु यावर्षी खरीपाच्या हंगामात कपाशीचे झाडे पाती, फुलावर, बोंडावर आल्या पासूनच बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कपाशीच्या झाडावर सुरुवातीच्या पाती, फुलापासूनच बोंड अळी सुरू झाली आहे. मान्सून पूर्व पेरणी, धुळ-पेरणी, पाणी पडल्यानंतर केलेली पेरणी अशाप्रकारे वेगवेगळ्या पध्दतीने केलेल्या कपाशीच्या डोबणे बोंड अळीग्रस्त झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक १०० टक्के शेतकरी असमानी संकटात सापडला आहे. शेतकºयांनी उपाय योजना करून सुध्दा बोंड अळीवर नियंत्रण मिळवता आले नाही. केंद्र व राज्य सरकारने बोंड अळीची व्याप्ती लक्षात घेता, तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान पातळीचा विचार करून या संकटाला राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत करावे.