शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

लाडकी बहीण'चे पैसे मिळाले; पण बँकेने ते परस्पर वळविले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:30 IST

ओवाळणीवरही डल्ला : संयुक्त बँक खाते असणाऱ्यांना बसला धक्का

लोकमत न्युज नेटवर्क वर्धा : राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून बहिणींना मोठा दिलासा दिला आहे. रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा मोबाइलवर संदेश आला. हा संदेश पाहून महिलांनाही आनंद झाला. दुसऱ्या दिवशी बँकेत रक्कम काढायला गेल्या असता ती रक्कम कर्जखात्यात वळती केल्याचे बँक कर्मचाऱ्याने सांगताच बहिणींचा पारा चढला. मुख्यमंत्री भावाने पाठविलेली ओवाळणी बँकेने परस्पर वळती केल्याने महिलांची नाराजी झाली.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी रक्षाबंधनापूर्वीच दोन महिन्यांची तीन हजार रुपयांची ओवाळणी त्यांच्या खात्यात जमा केली आहे. दि. १४ ऑगस्टच्या दुपारपासूनच महिलांच्या मोबाइलवर तीन हजार रुपये जमा झाल्याचा संदेश यायला लागल्याने महिलांचा आनंद गगणात मावेनासा झाला. एकमेकींना फोन करुन विचारणा होऊ लागली. ज्यांचे बँक खाते आधारशी संलग्न होते त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पण, ज्यांचे संलग्न नाही त्यांना प्रतीक्षा करावी लागली. विशेष म्हणजे ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, असा संदेश आला त्या महिला मोठ्या आनंदाने बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या असता ती रक्कम कर्ज खात्यात वळती केल्याचे बँक अधिकाऱ्यांकडून सांगताच महिलांचा आनंद औटघटक्याचाच ठरला. कोणतीही विचारपूस न करता पैसे कपात केल्याने रोष व्यक्त होऊ लागला आहे. 

महिलांनी बँकाकडे ती रक्कम परत करण्याची मागणी केल्यावरही काही बैंक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून महिलांना परतवून लावले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा संताप वाढत असून आता बँकेने ओवाळणीची रक्कम परत करण्याची मागणी जोर धरत आहे.

एक लाखांवर महिलांना मिळाले 'लाडकी बहीण'चे पैसे

  • जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून २ लाख २ हजार ३१४ महिलांनी अर्ज केला असून, त्यापैकी १ लाख ९८ हजार ७११ अर्ज पात्र ठरवून ते लाभाकरिता शासनाकडे पाठविण्यात आले. 
  • शासनानेही रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी पाठवायला सुरुवात केली. तीन हजार रुपयांचे संदेश मोबाइलवर धडकायला सुरुवात झाली आतापर्यंत एक लाखांवर महिलांच्या खात्यात रक्कम झाल्याचा अंदाज आहे.

साडेपाचशे अर्ज नाकारलेजिल्ह्यातून दोन लाखांवर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यातून १ लाख ९८ अर्ज पात्र ठरविण्यात आले असून, २ हजार ४०६ अर्ज अपात्र ठरविले आहे. या अर्जदारांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे, तर ५६५ अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे आता बाद झालेल्यांना संधी मिळणार नाही. 

विविध कारणांमुळे अनेकींचे पैसे वळविले...बँकेचे बॅलन्स :महिला लाभार्थ्यांनी ज्या बँकेचे खाते अर्जासोबत जोडले आहे, त्याच खात्यात रक्कम वळती करण्यात आली. विशेषतः बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सची अट असते. ती पाळल्या गेली नाही तर त्याचे चार्ज वसूल केले जात असून, या ओवाळणीतून तिही रक्कम कपात झाल्याची ओरड आहे.

इतर चार्जेस :खातेदारांना विविध सुविधा देण्याच्या मोबदल्यात बँकेकडून चार्जेसही आकारलेले जातात. परंतु खातेदार काही कारणास्तव खातं काढतो पण, काम झाल्यावर ते खाते उपयोगात आणत नाही. त्यामुळे अशा खात्यात रक्कम जमा झाल्यावर त्यांनीही कपात केली आहे.

बचत गटाचे कर्ज :काही महिलांचे पतीसोबत संयुक्त खाते असून, तोच खाते क्रमांक दिला आहे. त्यामुळे पीककर्ज किंवा बचत गटाचे कर्ज थकलेले असल्यामुळे त्या खात्यात रक्कम जमा होताच बँकेने कपात केली. त्यामुळे मुख्यमंत्री भावाने दिलेली ओवाळणी बहिणींच्या कामी आलीच नाही.

"माझ्याकडे बँक ऑफ इंडिया सेलूच्या शाखेतून मुद्रा योजने अंतर्गत घेतलेले कर्ज थकीत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत मला तीन हजार रुपये रक्षाबंधनापूर्वी मिळाले. त्याचा मोबाइलवर संदेशही प्राप्त झाला. परंतु ती तीन हजारांची रक्कम बँकेने परस्पर माझ्या कर्ज खात्यात वळती केली आहे. ती रक्कम परत मिळावी."- जयश्री शंकदरवार, धानोली (मेघे)

"कर्ज थकीत असल्यास आपोआप बँक सिस्टीमनुसार त्या खात्यातील रक्कम कर्ज खात्यामध्ये वळती होते. असे झाल्यास महिलांनी संबंधित बँक व्यवस्थापकांना अर्ज द्यावा. ती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये परत केली जाईल. तशा सूचनाही सर्व बँक व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत."- चेतन शिरभाते, जिल्हा प्रबंधक, अग्रणी बँक.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाwardha-acवर्धा