शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बिहाडीत अग्नितांडव, दोन घरे, तीन गोठे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:47 IST

तालुक्यातील बिहाडी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडला. अचानक लागलेल्या आगीत दोन घरे व तीन गोठे जळून खाक झाले. यात ४० लाखांच्या वर नुकसान झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले.

ठळक मुद्देजीवनाश्यक साहित्याचा कोळसा, बैल होरपळला

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यातील बिहाडी येथे शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अग्नितांडव घडला. अचानक लागलेल्या आगीत दोन घरे व तीन गोठे जळून खाक झाले. यात ४० लाखांच्या वर नुकसान झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले.बिहाडी गावात शुक्रवारी रात्री अचानक गावठाण शिवारात आग लागली. ही आग पसरत जाऊन संदीप, शरद व सुनील तुकाराम धांदे या भावंडांचे तीन गोठे जळून खाक झाले. यात गुरांचा चारा, शेतीसाहित्य जळाले. गोठ्यांना लागूनच महादेव तुळशीराम रेवतकर व आशा माणिक भोयर यांचे घर असून त्यांच्या घरांनाही आगेने आपल्या कवेत घेतले. आगीत घरातील संपूर्ण साहित्य, अन्नधान्य भस्मसात झाले. माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकत्र येत आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण आग आटोक्यात येत नव्हती. आर्वी व पुलगाव येथून बोलविलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविल्याने पूढील अनर्थ टळला. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. जीवनावश्यक तथा शेतीपयोगी साहित्याचा कोळसा झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शनिवारी नायब तहसीलदार बर्वे, तितरे, मंडळ अधिकारी सांभारे, तलाठी गद्रे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यात रेवतकर यांचे ३ लाख ५५ हजार, भोयर यांचे १ लाख ३५ हजार, संदीप धांदे ९७ हजार, शरद धांदे ९० हजार व सुनीलचे ६५ हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनास दिला.बकऱ्या विकून आणलेला गहूदेखील भस्मसातआशा भोयर ही विधवा महिला चार मुलींसोबत संसाराचा गाडा चालविते; पण शुक्रवारची रात्र त्यांना उद्ध्वस्त करून गेली. घरातील संपूर्ण साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. बकऱ्या विकून विकत घेतलेला गहूदेखील आगीत स्वाहा झाला. रेवतकर यांच्या घरातीलही संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यामुळे दोन्ही कुटुंब उघड्यावर आले असून त्वरित शासकीय मदतीची गरज व्यक्त होत आहे.उदरनिर्वाहासाठी दिले धान्यशनिवारी पं.स. सभापती मंगेश खवशी यांनी बिहाडी गाठत पाहणी केली. यावेळी त्वरित आशा भोयर यांना निराधार योजनेतून आर्थिक मदत सुरू करावी, अशी मागणी तहसीलदारांना केली. खवशी यांनी दोन्ही कुटुंबांना उदरनिर्वाहाकरिता साखर, तांदूळ व अन्य किराणा त्वरित देण्यात आला.दोन जनावरे जखमीअचानक लागलेल्या आगीत गोठ्यात बांधून असलेली दोन जनावरे होरपळली गेली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने गोठ्यातील गुरे बाहेर काढण्यात आली. शिवाय भोयर व रेवतकर यांच्या कुटुंबातील सदस्य त्वरित घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :fireआग