शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

लावण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:24 IST

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमण झाले. शनिवारी अनेक भागात दमदार पाऊस झाला. पावसाच्या सरी कोसळताच बळीराज पेरता झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ३२ मीमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमण झाले. शनिवारी अनेक भागात दमदार पाऊस झाला. पावसाच्या सरी कोसळताच बळीराज पेरता झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. पाऊस येताच बऱ्याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड होत आहे. तर सोयाबीन व इतर वाणांच्या पेरणीचे नियोजन सुरू आहे.जिल्ह्यात योग्य पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नका असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सावधगिरी म्हणून अद्याप पेरण्या केल्या नाही. पेरणी नंतर पाऊस बेपत्ता झाल्यास मोड येवून दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करण्याची वेळ येण्याशी शक्यता कृषी विभागाच्या सल्ल्यावरून दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर काही शेतकºयांनी कृषी विभागाचा हा सल्ला बाजूला ठेवत आपल्या अनुभवावरून पेरण्या सुरू केल्याचे दिसून आले. काही शेतकऱ्यांनी शनिवारचा पाऊस येण्यापूर्वीच कपाशीची लागवड केल्याचे दिसून आले आहे. तर काही शेतकऱ्यांकडून आज रविवारी सकाळपासून लागवडीला प्रारंभ झाला आहे.पाऊस येण्यापूर्वी ज्या कापूस उत्पादकांनी कपाशीची लागवड केली त्यांची पेरणी साधल्याचे बोलले जात आहे. यात पावसाचा खंड पडल्यास शेतात असलेल्या ओलिताचा लाभ त्यांच्याकडून होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडूनच कपाशीची लागवड होत असल्याचे दिसून आले आहे. तर शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि तुरीची लागवड अद्याप झाली नसल्याचे दिसत आहे. त्याला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सर्वत्र कपाशीच्या लागवडीला जोरमागील खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे यंदा कपाशीचे क्षेत्र घटेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यात पाऊस येण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे.सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यातवर्धा जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यात झाला आहे. येथे ६९ मीमी पावसाची नोंद झाली आहे. वर्धा तालुक्यात ३७.४८, देवळी २३.६०, आर्वी ३६.१५, आष्टी १७.०३, कारंजा १४.५९, हिंगणघाट ४३ तर समुद्रपूर येथे १७ मीम पावसाची झाली आहे. याची एकूण बेरीज २५८.१३ मीमी असून त्याची सरासरी ३२ मीमी आहे. एवढा पाऊस पेरणीकरिता पुरेसा असल्याचे बोलले जात आहे.काही बियाण्यांनी बिटीतच मिसळविले नॉन बिटी तर काहींकडून वेगळी व्यवस्थाशासनाच्यावतीने यंदा कपाशीच्या बियाण्यांबाबत अधिकच सावधगिरी बाळगली गेल्याचे दिसून आले आहे. अनेक कंपन्यांना बाजारात विक्रीकरिता येत असलेल्या त्यांच्या वाणावर बंदी घालण्याच्या सूचना केल्या. बोंड अळीला बिटी आणि नॉन बिटीत झालेली गफलत एक कारण असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कपाशीची बियाणे विकणाऱ्या काही कंपन्यांनी त्यांच्या बिटी बियाण्यांतच नॉन बिटी मिसळविले आहे तर काही कंपन्यांकडून त्याची वेगळी पाकिटे देण्यात येत आहे. ही नॉन बिटी बियाणे शेताच्या धुऱ्यावर सभोवताल लावण्याच्या सूचना करण्यात आल्या असताना शेतकऱ्यांकडून तसे झाले नाही. यामुळे कपाशीवर बोंडअळीचा हल्ला झाल्याचे या कंपन्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.आर्थिक अडचण कायमच; अनेकांकडून अद्यापही बी-बियाण्यांची खरेदी नाहीयंदाच्या खरीप हंगामाच्या तोंडावर जाहीर झालेली कर्जमाफी आणि त्यात व्याजाच्या रकमेवरून झालेला गोंधळ यामुळे अनेकांचा सातबारा कोरा झाला नाही. परिणामी त्यांना बँकांकडून नवे पिककर्ज नाकारण्यात आले. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बी-बियाणे कशी घ्यावी अशी चिंता पडली आहे. शिवाय तूर आणि चण्याचे चुकारे अडल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटल्याचे दिसत आहे. या आर्थिक अडचणीवर मार्ग काढून पेरणी साधण्याकरिता शेतकरी प्रचत्नरत आहे.

टॅग्स :agricultureशेती