शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

पुतळ्यांचे सौंदर्यीकरण; व्यवस्थेचा बोजवारा

By admin | Updated: July 19, 2015 02:15 IST

शहराचे सौंदर्यीकरण म्हटले की पुतळ्यांचे अवलोकन केले जाते. इतर व्यवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

वर्धा : शहराचे सौंदर्यीकरण म्हटले की पुतळ्यांचे अवलोकन केले जाते. इतर व्यवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. शहरातील तीन चौकांबाबत नेमके हेच घडले आहे. रेल्वे स्थानक जवळ असलेला शास्त्री चौक, शिवाजी महाराज चौक आणि एका चित्रपट गृहाच्या नावाने ओळखला जाणारा आरती चौक येथील पुतळ्यांचा रखरखाव व्यवस्थित आहे; पण तेथे अन्य व्यवस्थेचा अभावच दिसून येतो. यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचे पाहावयास मिळते. यामुळे पुतळे चांगले दिसत असले तरी चौक मात्र बरबटलेलेच दिसतात.शहरातील सर्वात मोठा पुतळा असलेला शिवाजी चौक महत्त्वाचा आहे. या चौकाने मुख्य रस्त्याचेच दोन तुकडे झाले आहेत. बजाज चौकातून पूढे शिवाजी चौकाकडे जाणारा मुख्य मार्गाचे विभाजन होते. यातील एक मार्ग आर्वी तर दुसरा नागपूरकडे जातो. या चौकात शिवाजी महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा आहे. पुतळ्याची व्यवस्थित देखभाल केली जात असली तरी परिसरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे दिसते. रस्ता दुभाजकामध्ये मोठे अंतर ठेवण्यात आले आहे. यामुळे वाहने कशीही वळविली जातात. शिवाय पुतळ्याला वळसा देऊन वळण घेणे गरजेचे असताना पुतळ्याच्या मागील बाजूने असलेल्या रस्त्यानेच वाहनांची ये-जा होते. यामुळे अनेकदा अपघातांची शक्यता असते. शिवाय जड वाहनेही पुतळ्याच्या मागील रस्त्याचाच वापर करीत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. येथून पूढे जाणारा नागपूर मार्ग रुंद आहे तर आर्वीकडे जाणारा मार्ग अरुंद झाल्याचे चित्र आहे. या मार्गावर रस्ता दुभाजक व फुटपाथ तयार केला; पण ते अडचणीचेच ठरताना दिसते. यासाठी चौकांतील व्यवस्था राखणेच गरजेचे झाले आहे.