शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

पुतळ्यांचे सौंदर्यीकरण; व्यवस्थेचा बोजवारा

By admin | Updated: July 19, 2015 02:15 IST

शहराचे सौंदर्यीकरण म्हटले की पुतळ्यांचे अवलोकन केले जाते. इतर व्यवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

वर्धा : शहराचे सौंदर्यीकरण म्हटले की पुतळ्यांचे अवलोकन केले जाते. इतर व्यवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. शहरातील तीन चौकांबाबत नेमके हेच घडले आहे. रेल्वे स्थानक जवळ असलेला शास्त्री चौक, शिवाजी महाराज चौक आणि एका चित्रपट गृहाच्या नावाने ओळखला जाणारा आरती चौक येथील पुतळ्यांचा रखरखाव व्यवस्थित आहे; पण तेथे अन्य व्यवस्थेचा अभावच दिसून येतो. यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचे पाहावयास मिळते. यामुळे पुतळे चांगले दिसत असले तरी चौक मात्र बरबटलेलेच दिसतात.शहरातील सर्वात मोठा पुतळा असलेला शिवाजी चौक महत्त्वाचा आहे. या चौकाने मुख्य रस्त्याचेच दोन तुकडे झाले आहेत. बजाज चौकातून पूढे शिवाजी चौकाकडे जाणारा मुख्य मार्गाचे विभाजन होते. यातील एक मार्ग आर्वी तर दुसरा नागपूरकडे जातो. या चौकात शिवाजी महाराजांचा मोठा अश्वारूढ पुतळा आहे. पुतळ्याची व्यवस्थित देखभाल केली जात असली तरी परिसरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे दिसते. रस्ता दुभाजकामध्ये मोठे अंतर ठेवण्यात आले आहे. यामुळे वाहने कशीही वळविली जातात. शिवाय पुतळ्याला वळसा देऊन वळण घेणे गरजेचे असताना पुतळ्याच्या मागील बाजूने असलेल्या रस्त्यानेच वाहनांची ये-जा होते. यामुळे अनेकदा अपघातांची शक्यता असते. शिवाय जड वाहनेही पुतळ्याच्या मागील रस्त्याचाच वापर करीत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. येथून पूढे जाणारा नागपूर मार्ग रुंद आहे तर आर्वीकडे जाणारा मार्ग अरुंद झाल्याचे चित्र आहे. या मार्गावर रस्ता दुभाजक व फुटपाथ तयार केला; पण ते अडचणीचेच ठरताना दिसते. यासाठी चौकांतील व्यवस्था राखणेच गरजेचे झाले आहे.