शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

राजकीय अनास्थेत अडले रस्ता सौंदर्यीकरण

By admin | Updated: July 4, 2015 00:26 IST

येथील मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी आघाडी सरकारच्या काळात सुमारे दीड कोटी रुपये मंजूर होऊन सदर कामाचे आदेशही काढण्यात आले आहेत.

कामाकरिता दीड कोटी रुपये मंजूर : दोन वर्षांपूर्वीच निघाले कामाचे आदेश नाल्याच्या अरूंद पुलामुळे वाहतुकीचा खोळंबा कायम सुधीर खडसे समुद्रपूरयेथील मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी आघाडी सरकारच्या काळात सुमारे दीड कोटी रुपये मंजूर होऊन सदर कामाचे आदेशही काढण्यात आले आहेत. युतीचे शासन आल्यानंतर रस्त्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाबाबत लोकप्रतिनिधींची अनास्था असल्याने कामाचे भवितव्य अधांतरी आले आहे. आघाडी शासनाच्या काळात शहरांतर्गत असलेल्या एक किलोमिटर रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ७ फेब्रुवारी २०१३ रोजी मंजूर करण्यात आला. येथील या रकमेत येथील विश्रामगृह ते पोलीस ठाण्यापर्यंतचा १५ मिटर रूंदीचा व एक किलोमिटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार होता. या रस्त्याच्या मधोमध १.२० मिटर रूंदीचे दुभाजक निर्माण करण्यात येणार होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या लेंडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम करणे आदी बाबींचा या कामामध्ये समावेश होता. रस्त्याची रूंदी वाढविण्यासाठी ६२ लाख ३३ हजार ६०६ रुपये, दुतर्फा नाली बांधकामासाठी २४ लाख १० हजार ५३ रुपये, रस्ता दुभाजकाकरिता ८ लाख ८० हजार ९७१ रुपये, विजेचे खांब हटविण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये तर रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यासाठी १ लाख रुपये पुलाच्या बांधकामासाठी ४ लाख रुपये, संगणकीकरणाकरिता १ लाख ९० हजार ४९३ रुपये व इतर आवश्यक बाबींसह या कामाचे १ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे प्राकलन मंजूर झाले आहे. या कामाचे आदेश देवून दोन वर्षांचा कालावधी होऊनही प्राकलनानुसार अद्याप काम झाले नाही.शहराच्या मधोमध असलेल्या नाल्याला पूर येत असल्याने पावसाळ्यात तासनतास वाहतूक ठप्प होते. या नाल्यावर उंच पूल होणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु सदर रस्त्याच्या कामा अंतर्गत या पुलाच्या बांधकामासाठी संबंधित विभागाकडून कोणत्याच हालचाली होतांना दिसत नाही. यामुळे नव्या शासनाच्या काळात हा रस्ता पूर्ण होईल अथवा नाही या बाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. रस्ता रूंदीकरणाच्या नावावर वृक्षांची कत्तल या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावावर शहरातील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची मोठ-मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. यामुळे रस्त्यावर भकासपणा आला आहे. शेकडो वृक्षांचा बळी देण्यात आला मात्र रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे पोल काढण्यात आले नाही. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. यामुळे काही अपघातही झाले आहेत. पुलाचे काम, विजेचे पोल काढण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. रस्त्याच्या कामात रूंदी कमी करून लांबी वाढविण्यात आली. यामुळे रस्त्याची लांबी ४१० मीटर तर रूंदी ११ मीटर झाली आहे. रूंदी कमी झाल्याने दुभाजक होणार नाही. - एस. बी. गबने, कनिष्ठ अभियंताबांधकाम विभाग, समुद्रपूर