शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

राजकीय अनास्थेत अडले रस्ता सौंदर्यीकरण

By admin | Updated: July 4, 2015 00:26 IST

येथील मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी आघाडी सरकारच्या काळात सुमारे दीड कोटी रुपये मंजूर होऊन सदर कामाचे आदेशही काढण्यात आले आहेत.

कामाकरिता दीड कोटी रुपये मंजूर : दोन वर्षांपूर्वीच निघाले कामाचे आदेश नाल्याच्या अरूंद पुलामुळे वाहतुकीचा खोळंबा कायम सुधीर खडसे समुद्रपूरयेथील मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी आघाडी सरकारच्या काळात सुमारे दीड कोटी रुपये मंजूर होऊन सदर कामाचे आदेशही काढण्यात आले आहेत. युतीचे शासन आल्यानंतर रस्त्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाबाबत लोकप्रतिनिधींची अनास्था असल्याने कामाचे भवितव्य अधांतरी आले आहे. आघाडी शासनाच्या काळात शहरांतर्गत असलेल्या एक किलोमिटर रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ७ फेब्रुवारी २०१३ रोजी मंजूर करण्यात आला. येथील या रकमेत येथील विश्रामगृह ते पोलीस ठाण्यापर्यंतचा १५ मिटर रूंदीचा व एक किलोमिटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार होता. या रस्त्याच्या मधोमध १.२० मिटर रूंदीचे दुभाजक निर्माण करण्यात येणार होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या लेंडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम करणे आदी बाबींचा या कामामध्ये समावेश होता. रस्त्याची रूंदी वाढविण्यासाठी ६२ लाख ३३ हजार ६०६ रुपये, दुतर्फा नाली बांधकामासाठी २४ लाख १० हजार ५३ रुपये, रस्ता दुभाजकाकरिता ८ लाख ८० हजार ९७१ रुपये, विजेचे खांब हटविण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये तर रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यासाठी १ लाख रुपये पुलाच्या बांधकामासाठी ४ लाख रुपये, संगणकीकरणाकरिता १ लाख ९० हजार ४९३ रुपये व इतर आवश्यक बाबींसह या कामाचे १ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे प्राकलन मंजूर झाले आहे. या कामाचे आदेश देवून दोन वर्षांचा कालावधी होऊनही प्राकलनानुसार अद्याप काम झाले नाही.शहराच्या मधोमध असलेल्या नाल्याला पूर येत असल्याने पावसाळ्यात तासनतास वाहतूक ठप्प होते. या नाल्यावर उंच पूल होणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु सदर रस्त्याच्या कामा अंतर्गत या पुलाच्या बांधकामासाठी संबंधित विभागाकडून कोणत्याच हालचाली होतांना दिसत नाही. यामुळे नव्या शासनाच्या काळात हा रस्ता पूर्ण होईल अथवा नाही या बाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. रस्ता रूंदीकरणाच्या नावावर वृक्षांची कत्तल या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावावर शहरातील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची मोठ-मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. यामुळे रस्त्यावर भकासपणा आला आहे. शेकडो वृक्षांचा बळी देण्यात आला मात्र रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे पोल काढण्यात आले नाही. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. यामुळे काही अपघातही झाले आहेत. पुलाचे काम, विजेचे पोल काढण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. रस्त्याच्या कामात रूंदी कमी करून लांबी वाढविण्यात आली. यामुळे रस्त्याची लांबी ४१० मीटर तर रूंदी ११ मीटर झाली आहे. रूंदी कमी झाल्याने दुभाजक होणार नाही. - एस. बी. गबने, कनिष्ठ अभियंताबांधकाम विभाग, समुद्रपूर