शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

आत्महत्या नव्हे तर हत्येच्या दिशेने तपास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:11 IST

सेलू तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबातील युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकून आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

ठळक मुद्देशुभांगी हत्याप्रकरण : संघटनांच्या बैठकीतील सूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबातील युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकून आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात केवळ आत्महत्येच्या दिशेने तपास होत असून पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास करण्याबाबत सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करण्यात येईल, यावर रविवारी स्वाध्याय मंदिरात आयोजित बैठकीत एकमत झाले.शुभांगी उईकेच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना अभय दिले जात असल्याचा आरोप करीत आदिवासी समाजबांधवांनी आक्रोष मोर्चा काढला. या मोर्चाची दखल घेत वर्धेतील विविध सामाजिक संघटनांनी एकजूट होत प्रकरणाच्या मूळाशी जाण्याचा निर्णय घेतला. यात ‘लोकमत’च्या वृत्ताने जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी एकत्र येत या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. याचीच दिशा ठरविण्यासाठी आज सभा आयोजित होती. या सभेला जिल्ह्यातील एकूण ४८ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्णय घेतला. यावेळी आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह काही निवृत्त पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. त्यांनीही परिस्थितीजन्य पुराव्याची माहिती घेतली असता या प्रकरणात हत्येचा संशय वर्तविला आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी नेते अवचित सयाम होते. शुभांगीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस तपासाविरूद्ध एकत्र येण्याची भूमिका मनोहर पंचारिया यांनी मांडली. उपस्थित सर्व पदाधिकाºयांनीही मते मांडली. यात न्यायालयीन लढा उभारण्याची मतेही अनेकांनी मांडली. वर्धेत रूपेश मुळे हत्या प्रकरणात सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत लढा उभारला; पण पोलिसांनी तपासात मेख मारल्याने आरोपींची सुटका झाली. या प्रकरणात असे झाल्यास न्यायालयात लढा देण्याबाबतही चर्चा झाली. शुभांगीला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्णयही संघटनांच्या पदाधिकाºयांनी घेतला.शुभांगीच्या न्यायासाठी पुकारलेल्या बैठकीत वर्धेतील सर्वच सामाजिक संघटना एकवटल्याचे दिसून आले. यावेळी रामभाऊ सातव, संजय इंगळे तिगावकर, प्रा. शिवाजी इथापे, भास्कर इथापे, हरिष इथापे, सुनीता इथापे, मीनल इथापे, नूतन माळवी, अविनाश काकडे, राजू मडावी, कॉग्रेस कमिटीचे सुनील कोल्हे, राजेंद्र शर्मा, इक्राम हुसेन, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व्यंकटेश बुंदे, दिलीप उटाणे, सीताराम लोहकरे, अस्लम पठाण, सुचिता ठाकरे, रोटरी क्लबच्या संगिता इंगळे तिगावकर, निरज गुजर, प्रा. नाखले, अमिर अली अजानी, गंगाधर पाटील, मंगेश चोरे, सुनील ढाले, सतीश मडावी, डॉ. शरद सावरकर, संजय चिडाम, चंद्रशेखर मडावी, पंकज वंजारे यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेत होणाºया निर्णयाच्या पाठीशी राहण्याची कबुलीही याप्रसंगी सर्वच संघटनांनी दिली.एकूण ४८ संघटनांचा सहभागशुभांगी मृत्यू प्रकरणात न्याय देण्याच्या मागणीकरिता पुकारलेल्या या बैठकीत वर्धेतील तब्बल ४८ संघटना एकत्र आल्या. या संस्थांची एक वज्रमुठ तयार झाली असून शुभांगीला न्याय मिळण्याची आशा दिसून येत आहे.प्रारंभी तीन मुद्यांकडे वेधणार लक्षसोमवारी या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षकांचे तीन मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. प्रथम आत्महत्येच्या दिशने नव्हे तर हत्येच्या दिशेने तपास करावा, निष्पक्ष तपासाकरिता एसआयटीला तपास द्यावा व पीडितेच्या परिवाराला न्याय देत गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, आदी मागण्या निवेदनातून करणार आहे. केवळ निवेदन देऊन संघटना स्वस्थ बसणार नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.रूपेश मुळे नरबळी प्रकरणात पोलिसांवर ताशेरेवर्धेतील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात पोलिसांनी तपासात मेख मारल्याने आरोपी निर्दोष मुक्त झाला. यामुळे पोलीस तपासावर लक्ष केंद्रित करून लढा उभारावा, असे म्हणत पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले. 

टॅग्स :Crimeगुन्हा