शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सावधान ! तुम्हालाही मधुमेह असू शकतो

By admin | Updated: February 26, 2015 01:22 IST

आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्य सुदृढ ठेवणे कठीणच झाले आहे.

गौरव देशमुख वर्धा आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्य सुदृढ ठेवणे कठीणच झाले आहे. याचा प्रत्यय जिल्हा सामान्य रुग्णालयात गत चार वर्षापूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात झालेल्या तपासणीत आला आहे. यात प्रत्येक वर्षाला पाच हजार नागरिकांना मधुमेह असल्याचे समोर आले आहे. ही बाब चिंतेची असून याचे महत्त्वाचे कारण वाढता मानसिक तणाव असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅगस्ट २०११ पासून जानेवारी २०१५ पर्यंत ३० वर्षावरील ५ लाख ३८ हजार ६८९ नागरिकांनी तपासणी केली. यात २० हजार २५२ नागरिकांना त्याची लागण झाल्याचे समोर आले आहे. या आजारावर औषधोपचार असला तरी मधुमेह कायमस्वरुपी बरा होणारा आजार नाही. औषधोपचाराने केवळ यावर आळा बसविता येतो. मधुमेहाची लागण झालेल्यांना कोणताही औषधोपचार करताना पहिले या आजारावर ताबा मिळविणे गरजेचे आहे. शरीरात आवश्यकतेच्या तुनलेत रक्तात शर्कराचे प्रमाण वाढल्यास तो जीवघेणाही ठरणारा आहे. ही आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयासह जिल्ह्यात असलेल्या खासगी रुग्णालयात या आजारावर औषधोपचार करण्यात येतो. त्यांची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आकडेवारीपेक्षा अधिक असल्याची शंका वर्तविली जात आहे.