शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सावधान ! तुम्हालाही मधुमेह असू शकतो

By admin | Updated: February 26, 2015 01:22 IST

आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्य सुदृढ ठेवणे कठीणच झाले आहे.

गौरव देशमुख वर्धा आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्य सुदृढ ठेवणे कठीणच झाले आहे. याचा प्रत्यय जिल्हा सामान्य रुग्णालयात गत चार वर्षापूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात झालेल्या तपासणीत आला आहे. यात प्रत्येक वर्षाला पाच हजार नागरिकांना मधुमेह असल्याचे समोर आले आहे. ही बाब चिंतेची असून याचे महत्त्वाचे कारण वाढता मानसिक तणाव असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅगस्ट २०११ पासून जानेवारी २०१५ पर्यंत ३० वर्षावरील ५ लाख ३८ हजार ६८९ नागरिकांनी तपासणी केली. यात २० हजार २५२ नागरिकांना त्याची लागण झाल्याचे समोर आले आहे. या आजारावर औषधोपचार असला तरी मधुमेह कायमस्वरुपी बरा होणारा आजार नाही. औषधोपचाराने केवळ यावर आळा बसविता येतो. मधुमेहाची लागण झालेल्यांना कोणताही औषधोपचार करताना पहिले या आजारावर ताबा मिळविणे गरजेचे आहे. शरीरात आवश्यकतेच्या तुनलेत रक्तात शर्कराचे प्रमाण वाढल्यास तो जीवघेणाही ठरणारा आहे. ही आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयासह जिल्ह्यात असलेल्या खासगी रुग्णालयात या आजारावर औषधोपचार करण्यात येतो. त्यांची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आकडेवारीपेक्षा अधिक असल्याची शंका वर्तविली जात आहे.