शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वर्धेचा रणसंग्राम: १९९९ अन् २००४ मध्ये झाली चुरशीची निवडणूक

By रवींद्र चांदेकर | Updated: April 5, 2024 15:20 IST

कमी मताधिक्क्यांचे विजय : केवळ तीन अन् सात हजारांनी उमेदवार विजयी

रवींद्र चांदेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, वर्धा : आत्तापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत १९९९ आणि २००४ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. या दोन्ही निवडणुकींत विजयी उमेदवारांचे मताधिक्य केवळ तीन आणि सात हजारांचे होते. लागोपाठ दोन निवडणूक निकालांच्या वेळी मतदारांची उत्कंठा शिगेला पोहाेचली होती.

आत्तापर्यंत १७ वेळा लाेकसभा निवडणूक झाली. वर्धेत १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसला हादरा दिला होता. नंतर १९९६ पासून भाजपने काँग्रेसला धक्के देणे सुरू केले. त्यामुळे २००४ ची निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरली होती. भाजपचे सुरेश वाघमारे यांनी केवळ तीन हजार १८८ मतांनी काँग्रेसच्या प्रभा राव यांचा पराभव केला होता. त्यावेळी वाघमारे यांना दोन लाख ६९ हजार ४५, तर प्रभा राव यांना दोन लाख ६५ हजार ८५७ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणात असलेल्या बसपाचे सोमराज तेलखेडे यांना ५४ हजार नऊ, सीपीएमचे यशवंत झाडे यांना १४ हजार ८२३, शिवराज्य पार्टीचे जगन्नाथ राऊत यांना नऊ हजार ८४५, एआरपीचे श्रीकृष्ण उबाळे यांना सहा हजार ९९१, तर गोंगपाचे नारायण चिडाम यांना पाच हजार ५३५ मते मिळाली होती. विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकापेक्षाही या सर्वांना दोन हजारांपेक्षा जास्त मते होती, हे विशेष.

तत्पूर्वी १९९९ मध्येही चुरशीची लढत झाली होती. त्यावेळीही काँग्रेसच्या वतीने प्रभा राव आणि भाजपच्या सुरेश वाघमारे रिंगणात होते. त्यात प्रभा राव यांनी वाघमारे यांचा केवळ सात हजार ५९ मतांनी पराभव केला होता. प्रभा राव यांना दोन लाख ४९ हजार ५६४, तर सुरेश वाघमारे यांना दोन लाख ४२ हजार ५०२ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणातीत तिसरे मातब्बर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांनी तब्बल एक लाख ५२ हजार ८५६ मते घेतली होती. विजयी आणि पराभूत उमेदवारापेक्षा त्यांना तब्बल एक लाख ४५ हजार मते जास्त होती, हे विशेष. या दोन्ही निवडणुका प्रचंड गाजल्या होत्या. जय आणि पराजयातील अंतर केवळ तीन ते सात हजार होते.

फरकापेक्षा रिंगणातील उमेदवारांना जादा मते

१९९९ आणि २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील फरकापेक्षा रिंगणातील इतर उमेदवारांना जादा मते मिळाली होती. तीन आणि सात हजारांच्या फरकाने उमेदवार विजयी झाला होता. या फरकापेक्षा रिंगणातील उमेदवारांनी जादा मते घेतली होती. दोन्ही निवडणुकीत मतदारांची उत्कंठा ताणली हाेती. निकालाच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४wardha-pcवर्धा