शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेचा रणसंग्राम: १९९९ अन् २००४ मध्ये झाली चुरशीची निवडणूक

By रवींद्र चांदेकर | Updated: April 5, 2024 15:20 IST

कमी मताधिक्क्यांचे विजय : केवळ तीन अन् सात हजारांनी उमेदवार विजयी

रवींद्र चांदेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, वर्धा : आत्तापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत १९९९ आणि २००४ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. या दोन्ही निवडणुकींत विजयी उमेदवारांचे मताधिक्य केवळ तीन आणि सात हजारांचे होते. लागोपाठ दोन निवडणूक निकालांच्या वेळी मतदारांची उत्कंठा शिगेला पोहाेचली होती.

आत्तापर्यंत १७ वेळा लाेकसभा निवडणूक झाली. वर्धेत १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसला हादरा दिला होता. नंतर १९९६ पासून भाजपने काँग्रेसला धक्के देणे सुरू केले. त्यामुळे २००४ ची निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरली होती. भाजपचे सुरेश वाघमारे यांनी केवळ तीन हजार १८८ मतांनी काँग्रेसच्या प्रभा राव यांचा पराभव केला होता. त्यावेळी वाघमारे यांना दोन लाख ६९ हजार ४५, तर प्रभा राव यांना दोन लाख ६५ हजार ८५७ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणात असलेल्या बसपाचे सोमराज तेलखेडे यांना ५४ हजार नऊ, सीपीएमचे यशवंत झाडे यांना १४ हजार ८२३, शिवराज्य पार्टीचे जगन्नाथ राऊत यांना नऊ हजार ८४५, एआरपीचे श्रीकृष्ण उबाळे यांना सहा हजार ९९१, तर गोंगपाचे नारायण चिडाम यांना पाच हजार ५३५ मते मिळाली होती. विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकापेक्षाही या सर्वांना दोन हजारांपेक्षा जास्त मते होती, हे विशेष.

तत्पूर्वी १९९९ मध्येही चुरशीची लढत झाली होती. त्यावेळीही काँग्रेसच्या वतीने प्रभा राव आणि भाजपच्या सुरेश वाघमारे रिंगणात होते. त्यात प्रभा राव यांनी वाघमारे यांचा केवळ सात हजार ५९ मतांनी पराभव केला होता. प्रभा राव यांना दोन लाख ४९ हजार ५६४, तर सुरेश वाघमारे यांना दोन लाख ४२ हजार ५०२ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणातीत तिसरे मातब्बर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांनी तब्बल एक लाख ५२ हजार ८५६ मते घेतली होती. विजयी आणि पराभूत उमेदवारापेक्षा त्यांना तब्बल एक लाख ४५ हजार मते जास्त होती, हे विशेष. या दोन्ही निवडणुका प्रचंड गाजल्या होत्या. जय आणि पराजयातील अंतर केवळ तीन ते सात हजार होते.

फरकापेक्षा रिंगणातील उमेदवारांना जादा मते

१९९९ आणि २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील फरकापेक्षा रिंगणातील इतर उमेदवारांना जादा मते मिळाली होती. तीन आणि सात हजारांच्या फरकाने उमेदवार विजयी झाला होता. या फरकापेक्षा रिंगणातील उमेदवारांनी जादा मते घेतली होती. दोन्ही निवडणुकीत मतदारांची उत्कंठा ताणली हाेती. निकालाच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४wardha-pcवर्धा