शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

कालवा बुजल्याने शेतात पाणी पोहोचण्यास अडथळे

By admin | Updated: December 22, 2015 03:17 IST

उपविभागातील पोथरा धरणाचा डावा व उजवा कालवा ठिकठिकाणी बुजला आहे. कालव्यात धरणाचे पाणी दिसत असले तरी

पोथरा धरणाचे दोन्ही कालवे बुजले : पाणी असूनही सिंचनाची बोंब; शेतकऱ्यांचे नुकसान भास्कर कलोडे ल्ल हिंगणघाटउपविभागातील पोथरा धरणाचा डावा व उजवा कालवा ठिकठिकाणी बुजला आहे. कालव्यात धरणाचे पाणी दिसत असले तरी कमी विसर्गामुळे ते शेतकऱ्यांच्या शेतात पोहचत नाही. पर्यायाने गाव सीमेत धरणाचे पाणी पोहचून सुद्धा शेती सिंचनाला उपयोग होत नाही. वर्षानुवर्षांच्या या समस्येकडे शासनाने लक्ष देवून या कालव्यांची डागडुजी करून शेवटच्या टोकापर्यंत सिंचनाची व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.समुद्रपूर तालुक्यातील पोथरा नदीवर १९७८ मध्ये निर्मित पोथरा धरणाचा नऊ कि़मी.चा डावा कालवा पवनगाव नंतर वरोरा तालुक्यात जातो. ३५ कि़मी. चा उजवा कालवा लाडकी पर्यंत व पुढे १० कि़मी.ची वितरिका चिचघाट पारडीपर्यंत गेली आहे. या कालव्याची हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील सिंचन क्षमता कागदोपत्री ५ हजार २०० हेक्टर दर्शविण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र निम्म्या क्षेत्रातही ओलीत पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे वास्तव आहे.दोन्ही कालवे ठिकठिकाणी गाळाने बुजले असून त्यात झुडपे वाढली आहेत. अनेक ठिकाणी कालव्याला भेगा गेल्या आहे. पूल कलवर्ट खचले आहेत. हिच अवस्था वितरिकांची व पाटचऱ्यांची झाली आहे. दरवर्षी या कालवे व पाटसऱ्यांचे दुरूस्तीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. तो खर्च झाल्याचे कागदोपत्री दिसत आहे. या कालव्याची व पाटसऱ्यांची मिळालेल्या निधीच्या प्रमाणात दुरूस्ती होत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ५-१० वर्षांची बाभळीची ऐटीत वाढणारी झाडे दिसत आहेत. कालव्याच्या दुरूस्तीकरिता ८.९३ कोेटींचा प्रस्ताव ४पोथरा धरणाचा डावा व उजवा कालवा दुरूस्तीसाठी या विभागाने ८ कोटी ९३ लाखाचे इस्टीमेट प्रस्तावित केले असून मंजुरीसाठी शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्याच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.क्षमतेपेक्षा सिंचन अल्पच ४तालुक्यात पोथरा धरणाचे पाणी लाडकी बुरकोनीपर्यंत पोहचले आहे. असे असले तरी बुरकोनीत मोटारपंपाची सोय असलेल्या चार पाच शेतकऱ्यांनीच या पाण्याचा सिंचनासाठी लाभ घेतल्याचे म्हणणे आहे. बुरकोनीपर्यंत धरणाचे पाणी पोहचत असले तरी पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग होत नाही. पूर्ण क्षमतेने विसर्ग झाल्यास मुख्य कालवा ओव्हर फ्लो होवून फुटण्याची भीती असल्याने पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्या जात नसल्याची माहिती आहे. पर्यायाने कालव्यात पाणी दिसत असले तरी पाटचऱ्यामध्ये ते वाहत नाही, अशी अवस्था आहे. ४ही अवस्था बदलावी म्हणून शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिली असली तरी समस्या मात्र कायम आहे. पूल कलवर्टच्या लिकेजसाठी गाऊटींगची आवश्यकता दर्शवून केवळ प्लास्टरने दुरूस्ती करण्यात येत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. एकंदरीत मुख्य कालवा व पाटचऱ्या दुरूस्तीचे काम योग्यप्रकारे करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी शासन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.पोथरा उजवा मुख्य कालवा व पाटचऱ्या ठिकठिकाणी गाळाने बुजल्या असल्याने व झुडपी वाढल्याने पूल कलवर्टला भेगा पडल्याने पाण्याचा अपव्यय होतो. पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग होत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतात धरणाचे पाणी पोहचत नाही.- शंकर पानवटकर, शाखा अभियंता, उपविभाग हिंगणघाट.