शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

उड्डाण पुलावर बॅरिकेटस् लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:17 IST

येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमोर्चा काढून उपविभागीय महसूल अधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हिंगणघाट शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटस् लावण्याची मागणी आहे.उड्डाणपुलावर बॅरीगेटस् लावण्याकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने याकडे लक्ष देत उड्डाणपुलावर बॅरिकेटस् लावून उडाणपूलावरील खड्डे त्वरित बुजवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजय मडावी युथ फाउंडेशनद्वारे देण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन सादर करण्यात आले. हिंगणघाट शहरातून गेलेल्या उड्डाणपुलावर नेहमीच जड वाहनांची वर्दळ असते. जड वाहनांमुळे रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येत्या काही दिवसात हिंगणघाट शहरातून गेलेल्या उडाणपुलावर बॅरिकेटस् लावून जड वाहनांची ये-जा बंद करुन उड्डाण पुलावरील जीवघेणे खड्डे तात्काळ न बुजविल्यास अजय मडावी युथ फाउंडेशनच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या मार्गावर अनेक विद्यालय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जड वाहनांच्या ये-जा करण्यावरून ऐरणीवर आला आहे. अनेक जड वाहनचालक आपल्या ताब्यातील वाहने भरधाव न निष्काळजी पणाने चालवत असल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या प्रकाराकडे संबंधीत अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व सामान्य जनतेच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. जड वाहनांवर कारवाई करणे क्रमप्राप्त असताना स्थानिक पोलीस केवळ दारूपकडण्यातच व्यस्थ असल्याचे दिसते. संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाºयांसह संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या रेल्वे गेट या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सदर पुलावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू करण्याची मागणी यावेळी रेटण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व लिलाधर मडावी, भिशांत कोल्हे, भरत शिंदे, रोहीत मांडवकर, रूषी देवगीरकर, सागर महाजन, पंकज यादव, मंथन चव्हाण, जाखोटिया, अनिकेत सहारे, विक्की जुमडे, प्रसाद धनवटे, कुणाल नगराळे यांनी केले. निवेदन देताना तरुण-तरूणी उपस्थित होत्या.