शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

उड्डाण पुलावर बॅरिकेटस् लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:17 IST

येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमोर्चा काढून उपविभागीय महसूल अधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हिंगणघाट शहरातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटस् लावण्याची मागणी आहे.उड्डाणपुलावर बॅरीगेटस् लावण्याकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने याकडे लक्ष देत उड्डाणपुलावर बॅरिकेटस् लावून उडाणपूलावरील खड्डे त्वरित बुजवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजय मडावी युथ फाउंडेशनद्वारे देण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन सादर करण्यात आले. हिंगणघाट शहरातून गेलेल्या उड्डाणपुलावर नेहमीच जड वाहनांची वर्दळ असते. जड वाहनांमुळे रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येत्या काही दिवसात हिंगणघाट शहरातून गेलेल्या उडाणपुलावर बॅरिकेटस् लावून जड वाहनांची ये-जा बंद करुन उड्डाण पुलावरील जीवघेणे खड्डे तात्काळ न बुजविल्यास अजय मडावी युथ फाउंडेशनच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या मार्गावर अनेक विद्यालय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जड वाहनांच्या ये-जा करण्यावरून ऐरणीवर आला आहे. अनेक जड वाहनचालक आपल्या ताब्यातील वाहने भरधाव न निष्काळजी पणाने चालवत असल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या प्रकाराकडे संबंधीत अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व सामान्य जनतेच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. जड वाहनांवर कारवाई करणे क्रमप्राप्त असताना स्थानिक पोलीस केवळ दारूपकडण्यातच व्यस्थ असल्याचे दिसते. संभाव्य धोका लक्षात घेता स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाºयांसह संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या रेल्वे गेट या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सदर पुलावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू करण्याची मागणी यावेळी रेटण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्त्व लिलाधर मडावी, भिशांत कोल्हे, भरत शिंदे, रोहीत मांडवकर, रूषी देवगीरकर, सागर महाजन, पंकज यादव, मंथन चव्हाण, जाखोटिया, अनिकेत सहारे, विक्की जुमडे, प्रसाद धनवटे, कुणाल नगराळे यांनी केले. निवेदन देताना तरुण-तरूणी उपस्थित होत्या.