शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांवरील खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:35 IST

पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाºयांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाºयांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.

ठळक मुद्देबोर नदी : २० वर्षांपासून पाणी अडलेच नाही, लघुसिंचनची उदासिनता

विजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाऱ्यांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाऱ्यांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.घोराड गावानजीक बोर नदीवर शासनाने मोठा निधी खर्च करून दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली. परंतु, मागील २० वर्षांपासून त्यात पाणीच अडले नसल्याचे शेतकरी सांगतात. विशेष म्हणजे, बंधाऱ्यांपैकी एका बंधाºयाची मागील चार महिन्यांपूर्वी नाममात्र डागडुजी करण्यात आली. तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी पुढाकार घेऊन घोराड परिसरात बोरनदीवर हे बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. सुरूवातीला या बंधाºयांमध्ये काही वर्ष पाणी अडले. त्यामुळे परिसरातील शेतातील विहिरींच्या पाणीपातळीतदेखील लक्षणीय वाढ झाली होती. सद्यस्थितीत त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बंधारे सुस्थितीत राहावे याकरिता शेतकºयांची समिती तयार करण्यात आली होती; पण बंधारे बंद करण्यासाठी येणारा महागडा खर्च झेपणारा नसल्याचे वास्तव आहे. असे असले तरी ज्या विभागाकडे देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी आहे, तो विभाग सध्या बघ्याची भूमिकाच घेत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. विशेष म्हणजे, २० वर्षांपासून हे बंधारे हिवाळ्याच्या सुरूवातीलाच कोरडे होतात. या बंधाऱ्याच्या पाट्या गायब असून हे बंधारे बंद करण्यासाठी नव्याने साहित्यही संबंधित विभागाकडून आले नाही. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे शासनातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे निरुपयोगी ठरत असून यात शेतकºयांचे नुकसान होत आहे.डागडुजी नाममात्रकाही महिन्यांपूर्वी स्मशानभूमीजवळ असलेल्या बंधाऱ्याची डागडुजी करण्यात आली. त्यावेळी बंधाºयात अडीच ते तीने फुटांच्या उंचीपर्यंत पाण्याची पातळी राहील, अशी व्यवस्था करण्यात आली; पण करण्यात आलेली डागडुजी किती काळ टिकेल, हे महत्वाचे आहे.उद्देशाला फासले जातेय हरताळशेतकरी सुजलाम्, सुफलाम् व्हावा या हेतूने तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी बोरधरण ते सेलूदरम्यान बोरनदीवर अनेक कोल्हापुरी बंधारे बांधले. यापैकी सेलू येथील एक बंधारा वगळता इतर बंधाऱ्यात पाणीच अडत नसल्याने बंधारे बांधण्याच्या उद्देशालाच खो मिळत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.जे मोठे आणि दुर्लक्षित बंधारे आहेत, त्याच्या दुरूस्तीसंदर्भाने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होत लवकरच निर्णय होईल.- एच. पी. गहलोत, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई