शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

बंधाऱ्यांवरील खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:35 IST

पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाºयांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाºयांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.

ठळक मुद्देबोर नदी : २० वर्षांपासून पाणी अडलेच नाही, लघुसिंचनची उदासिनता

विजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : पाणी अडवा, पाणी जिरवा या उद्देशालाच सध्या हरताळ फासल्याचे बोरनदीवरील बंधाऱ्यांची स्थिती पाहिल्यावर दिसून येते. इतकेच नव्हे, तर नदीवर बंधारे बांधूनही २० वर्षांपासून संबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणीच अडत नसल्याने बंधाऱ्यांवरील झालेला खर्च व्यर्थ ठरत आहे.घोराड गावानजीक बोर नदीवर शासनाने मोठा निधी खर्च करून दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली. परंतु, मागील २० वर्षांपासून त्यात पाणीच अडले नसल्याचे शेतकरी सांगतात. विशेष म्हणजे, बंधाऱ्यांपैकी एका बंधाºयाची मागील चार महिन्यांपूर्वी नाममात्र डागडुजी करण्यात आली. तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी पुढाकार घेऊन घोराड परिसरात बोरनदीवर हे बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. सुरूवातीला या बंधाºयांमध्ये काही वर्ष पाणी अडले. त्यामुळे परिसरातील शेतातील विहिरींच्या पाणीपातळीतदेखील लक्षणीय वाढ झाली होती. सद्यस्थितीत त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बंधारे सुस्थितीत राहावे याकरिता शेतकºयांची समिती तयार करण्यात आली होती; पण बंधारे बंद करण्यासाठी येणारा महागडा खर्च झेपणारा नसल्याचे वास्तव आहे. असे असले तरी ज्या विभागाकडे देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी आहे, तो विभाग सध्या बघ्याची भूमिकाच घेत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. विशेष म्हणजे, २० वर्षांपासून हे बंधारे हिवाळ्याच्या सुरूवातीलाच कोरडे होतात. या बंधाऱ्याच्या पाट्या गायब असून हे बंधारे बंद करण्यासाठी नव्याने साहित्यही संबंधित विभागाकडून आले नाही. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले बंधारे शासनातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे निरुपयोगी ठरत असून यात शेतकºयांचे नुकसान होत आहे.डागडुजी नाममात्रकाही महिन्यांपूर्वी स्मशानभूमीजवळ असलेल्या बंधाऱ्याची डागडुजी करण्यात आली. त्यावेळी बंधाºयात अडीच ते तीने फुटांच्या उंचीपर्यंत पाण्याची पातळी राहील, अशी व्यवस्था करण्यात आली; पण करण्यात आलेली डागडुजी किती काळ टिकेल, हे महत्वाचे आहे.उद्देशाला फासले जातेय हरताळशेतकरी सुजलाम्, सुफलाम् व्हावा या हेतूने तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांनी बोरधरण ते सेलूदरम्यान बोरनदीवर अनेक कोल्हापुरी बंधारे बांधले. यापैकी सेलू येथील एक बंधारा वगळता इतर बंधाऱ्यात पाणीच अडत नसल्याने बंधारे बांधण्याच्या उद्देशालाच खो मिळत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.जे मोठे आणि दुर्लक्षित बंधारे आहेत, त्याच्या दुरूस्तीसंदर्भाने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होत लवकरच निर्णय होईल.- एच. पी. गहलोत, कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई