शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

न्युक्लियर समस्येवर बापूंचे विचार आशादायी

By admin | Updated: November 22, 2014 01:38 IST

न्युक्लियर समस्येसोबतच जपानमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भोगवाद वाढल्याने चंगळवादी प्रवृत्ती बळावली आहे.

दिलीप चव्हाण सेवाग्रामन्युक्लियर समस्येसोबतच जपानमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. भोगवाद वाढल्याने चंगळवादी प्रवृत्ती बळावली आहे. आधुनिकतेकडे कल वाढला आहे. यामुळे दुरावा वाढत आहे. माणूसकी हरविली आहे. त्सुनामीचे संकट आले. याची सर्वांना माहिती आहे. पण समाजातील हे संकट दूर कोण करणार. असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. प्रत्येकाला शांती हवी, सुख हवे, हे खरेदीतून मिळणार नाही. हे सर्व मिळणार केवळ बापूंच्या विचारातूनच, असा आशावाद व्यक्त केला आहे जपानची कावेरी कुरिहारा या ३० वर्षीय युवतीने. बापूंच्या ‘अस्वस्थ’ या पुस्तकात असलेल्या विचाराने ती पुरती भारावली आहे. कावेरी नुकतीच सेवाग्राम आश्रमात नारायणभाई देसाई यांच्यासोबत आली होती. ती गुजरात विद्यापीठामध्ये गांधीजींचे आश्रम प्रयोग यावर आचार्यपदवी करीत आहे. २०१० पासून ती अहमदाबाद विद्यापीठात असल्याचे तीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कावेरी बी.ए. झाली असून आई वडीलांची एकुलती एक मुलगी आहे. बीएला असताना समाज आणि जगातील घडामांडीचा बारकाईने विचार करीत आहे. यांत्रिक युग, चाकोरीबद्ध जीवन, आधुनिकतेचा भडीमार, समाज जाणीवेपासून फारकत घेतलेली युवापिढी आणि मुल्यांचा ऱ्हास यामुळे तिची अस्वस्थता वाढीस लागली. गांधीजींच्या पुस्तकामुळे तिला प्रेरणा मिळाली. वास्तविक जीवन काय याचे ज्ञान झाले. यातून प्रभावित होऊन तिने गांधीजींच्या विचाराचा अभ्यास करावा असा विचार आई वडिलांना बोलून दाखविला. भारतात जाण्यास मात्र आई वडिलांनी विरोध दर्शविला. गांधी विचार कावेरीला स्वस्थ बसू देत नव्हता. बी.ए. नंतर नोकरी केली. आवश्यक तेवढा पैसा जमविला आणि सरळ गुजरात गाठले. तिला हिंदीचे सुद्धा उत्तम ज्ञान आहे. यामुळे तिने गांधी विचाराचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याची तिची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधन कावेरीने व्यक्त केले.