शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

‘बापू दप्तर’चे होणार नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

ही झोपडी अत्यंत साधी नि कमी खर्चिक आहे. अर्धवट भिंती, बांबूच्या झापड्या असे स्वरूप असून भिंती कुडाच्या आहेत. याला पायवा नाही. जमिनीत बल्ली टाकून झोपडी बनविण्यात आलेली आहे. या दप्तरात गांधीजींचा टेलिफोन, साहित्य, साप पकडण्याचा चिमटा, टंकलेखन यंत्र आदी ठेवण्यात आले होते. आता हे सर्व साहित्य आखरी निवासमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यातरी बल्ली आणि बांबूचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देसाहित्य हलविले आखरी निवासमध्ये : पहिल्यांदाच दुरूस्तीचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम गांधीजींच्या वास्तव्य आणि कायार्मुळे जगात प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्य चळवळीत तर प्रमुख केंद्रच बनले होते. कार्याचा आवाका पाहता स्वतंत्र कार्यालच करावे लागले, जे आज बापू दप्तर म्हणून ओळखले जाते. गेली अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेल्या आणि स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेल्या या दप्तरचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याने तेथील साहित्य, वस्तू आखरी निवासमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.विशेष म्हणजे दप्तरचे पहिल्यांदाच दुरुस्ती करण्यात येत आहे. जगाला गांधींची ओळख त्यांच्या अहिंसक आंदोलन आणि सामूहिक जीवन पद्धतीमुळे झाली. दक्षिण आफ्रिकेतील कार्यानंतर गांधीजी मायदेशी परतले. साबरमती आश्रमातून कार्याला सुरुवात करण्यात आली. मिठाच्या सत्याग्रहानंतर बापू १९३६ मध्ये सेवाग्राम येथे आले, तो काळ आणि वेळ इतिहासात नोंद करणारी ठरली. स्वातंत्र्य चळवळीचेच नव्हे, तर अन्य कार्याचे आश्रम मुख्य केंद्र ठरले होते. त्यामुळे जगाचे लक्ष बापूंच्या ध्येय धोरणाकडे लागले होते. कामाचा आवाका पाहता बापूंची मानस कन्या मीरा बहन यांनी आपली झोपडी बापू दप्तरसाठी दिली.ही झोपडी अत्यंत साधी नि कमी खर्चिक आहे. अर्धवट भिंती, बांबूच्या झापड्या असे स्वरूप असून भिंती कुडाच्या आहेत. याला पायवा नाही. जमिनीत बल्ली टाकून झोपडी बनविण्यात आलेली आहे. या दप्तरात गांधीजींचा टेलिफोन, साहित्य, साप पकडण्याचा चिमटा, टंकलेखन यंत्र आदी ठेवण्यात आले होते. आता हे सर्व साहित्य आखरी निवासमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यातरी बल्ली आणि बांबूचे काम सुरू आहे.टिकाऊपणा कायम ठेवण्यासाठी मोरचूद, गोमूत्र अर्क आदींचे पाणी करून त्यात बांबू ठेवण्यात येणार आहेत. बापू दप्तर जसे आहे तसेच तयार केले जाणार असून यासाठी झारखंड येथील मजूर येणार आहेत. संपूर्ण काम वास्तूकलाशास्त्राचे अभ्यासक अभय मलिये यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.दप्तरचे प्रथमच नूतनीकरण करण्यात येत आहे. जुने जमिनीला समांतर असल्याने विशेष काळजी घ्यावी लागली. बापूंचा विचार महत्त्वाचा आणि हे स्मारकसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. दुरुस्ती आवश्यक आहे. दप्तरचे आयुष्य वाढावे, ते अबाधित राहावे हा आमचा प्रयत्न आहे. याच महिन्यात कार्य सुरू होणार आहे.- मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी