शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

‘बापू दप्तर’चे होणार नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

ही झोपडी अत्यंत साधी नि कमी खर्चिक आहे. अर्धवट भिंती, बांबूच्या झापड्या असे स्वरूप असून भिंती कुडाच्या आहेत. याला पायवा नाही. जमिनीत बल्ली टाकून झोपडी बनविण्यात आलेली आहे. या दप्तरात गांधीजींचा टेलिफोन, साहित्य, साप पकडण्याचा चिमटा, टंकलेखन यंत्र आदी ठेवण्यात आले होते. आता हे सर्व साहित्य आखरी निवासमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यातरी बल्ली आणि बांबूचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देसाहित्य हलविले आखरी निवासमध्ये : पहिल्यांदाच दुरूस्तीचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम गांधीजींच्या वास्तव्य आणि कायार्मुळे जगात प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्य चळवळीत तर प्रमुख केंद्रच बनले होते. कार्याचा आवाका पाहता स्वतंत्र कार्यालच करावे लागले, जे आज बापू दप्तर म्हणून ओळखले जाते. गेली अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेल्या आणि स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार असलेल्या या दप्तरचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याने तेथील साहित्य, वस्तू आखरी निवासमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.विशेष म्हणजे दप्तरचे पहिल्यांदाच दुरुस्ती करण्यात येत आहे. जगाला गांधींची ओळख त्यांच्या अहिंसक आंदोलन आणि सामूहिक जीवन पद्धतीमुळे झाली. दक्षिण आफ्रिकेतील कार्यानंतर गांधीजी मायदेशी परतले. साबरमती आश्रमातून कार्याला सुरुवात करण्यात आली. मिठाच्या सत्याग्रहानंतर बापू १९३६ मध्ये सेवाग्राम येथे आले, तो काळ आणि वेळ इतिहासात नोंद करणारी ठरली. स्वातंत्र्य चळवळीचेच नव्हे, तर अन्य कार्याचे आश्रम मुख्य केंद्र ठरले होते. त्यामुळे जगाचे लक्ष बापूंच्या ध्येय धोरणाकडे लागले होते. कामाचा आवाका पाहता बापूंची मानस कन्या मीरा बहन यांनी आपली झोपडी बापू दप्तरसाठी दिली.ही झोपडी अत्यंत साधी नि कमी खर्चिक आहे. अर्धवट भिंती, बांबूच्या झापड्या असे स्वरूप असून भिंती कुडाच्या आहेत. याला पायवा नाही. जमिनीत बल्ली टाकून झोपडी बनविण्यात आलेली आहे. या दप्तरात गांधीजींचा टेलिफोन, साहित्य, साप पकडण्याचा चिमटा, टंकलेखन यंत्र आदी ठेवण्यात आले होते. आता हे सर्व साहित्य आखरी निवासमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यातरी बल्ली आणि बांबूचे काम सुरू आहे.टिकाऊपणा कायम ठेवण्यासाठी मोरचूद, गोमूत्र अर्क आदींचे पाणी करून त्यात बांबू ठेवण्यात येणार आहेत. बापू दप्तर जसे आहे तसेच तयार केले जाणार असून यासाठी झारखंड येथील मजूर येणार आहेत. संपूर्ण काम वास्तूकलाशास्त्राचे अभ्यासक अभय मलिये यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.दप्तरचे प्रथमच नूतनीकरण करण्यात येत आहे. जुने जमिनीला समांतर असल्याने विशेष काळजी घ्यावी लागली. बापूंचा विचार महत्त्वाचा आणि हे स्मारकसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. दुरुस्ती आवश्यक आहे. दप्तरचे आयुष्य वाढावे, ते अबाधित राहावे हा आमचा प्रयत्न आहे. याच महिन्यात कार्य सुरू होणार आहे.- मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामBapu Kutiबापू कुटी