शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बापूकुटी, आदीनिवासला शिंदूल्याच्या झांज्यांचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:34 PM

देश-विदेशातील अनेक पर्यटकांसाठी महात्मा गांधीजींचे आश्रम प्रेरणा स्थान बनले आहे. या आश्रमातील स्मारके माती आणि कुडाचे असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण करण्याकरिता शिंदोल्यांच्या झांज्या बांधण्यात येतात.

ठळक मुद्देआश्रमाचे पावसापासून संरक्षणासाठी पारंपरिक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : देश-विदेशातील अनेक पर्यटकांसाठी महात्मा गांधीजींचे आश्रम प्रेरणा स्थान बनले आहे. या आश्रमातील स्मारके माती आणि कुडाचे असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण करण्याकरिता शिंदोल्यांच्या झांज्या बांधण्यात येतात. या झांज्या सध्या स्मारकांसाठी कवच बनल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही पद्धत आजही कायम आहे.गांधीजी १२ वर्षांपर्यंत सेवाग्राम येथील आश्रमात राहिले. सेवाग्राम त्यांची कर्मभूमी व प्रयोगभूमी राहिली. देशातील सामाजिक व राजनितिक हालचालींचे हे केंद्र राहिल्याने सदैव कार्यकर्ता व देशातील प्रमुख नेते आश्रमात येत असतात. गांधीजींनी सेवाग्रामला राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक साधन, साहित्य व कारागीर यांच्या माध्यमातून आश्रमात कुट्या तयार झाल्या. बापू व बा यांच्या कुट्या व दप्तर माती व कुडापासून बनविले असल्याने पावसाळ्यात संरक्षणाची व्यवस्था करावी लागते. त्या काळी याच शिंदोल्यांच्या झांज्या बांधल्या जात होत्या. आश्रमला ८२ वर्षांचा काळ झाला. आजही ही पंरपरा कायम आहे. आश्रम व्यवस्थापन आजही त्याच पध्दतीने कुटीचे संरक्षण करण्यास कटिबद्ध असल्याचे दिसून येते.काळ बदला. साधन साहित्यातही बदल होऊन काही समस्यांचा सामना व्यवस्थापकांना करावा लागत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या झांज्या दूर्मिळ होत चालल्या आहे. या वर्षी जुनोना या ठिकाणाहून शिंदोल्यांच्या पाणोळ्या आणाव्या लागल्या. काही जुन्या सुरक्षित ठेवलेल्या व काही नव्या अशांच्या झापड्या बनवून स्मारकांना लावण्यात आल्या. अनेक वर्षांची ही परंपरा आजही जोपासली जात आहे. सर्व स्मारकांना सुरक्षित ठेवून येणाऱ्या पिढीला गांधीजी आणि त्यांचा आश्रम पाहायला मिळावा, यासाठी आश्रम प्रतिष्ठान प्रयत्नरत आहे.आधुनिक साहित्याला नकारचमहात्मा गांधी या कुटीत राहावयास आले तेव्हा नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून अत्यल्प खर्चात निवासाची सोय करण्याची अट त्यांनी ठेवली होती. त्या अटीनुसार येथे कुटी निर्माण झाली. आज विज्ञानाने अनेक शोध लावले आहेत. या शोधात पावसापासून बचावाकरिता प्लास्टिक सारख्या वस्तू आहेत. असे असताना त्यांच्याकडून अशा कुठल्याही वस्तूंचा वापर येथे केला जात नाही. आजही जुन्याच पारंपरिक साहित्याच्या वापरातून कुटींचे रक्षण होत आहे.पर्यटकांसाठी खुलेआंतरराष्ट्रीय स्तरावरील व स्वातंत्र्य चळवळीची साक्षीदार आदिनिवासच्या वऱ्हांडा व गांधीजींच्या स्नानग्रुहाच्या छताच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले. ते पर्यटकांकरिता खुले करण्यात आले आहे. शिवाय पावसापासून बचावाकरिता नेहमीप्रमाणे पाणोळ्यांचे आवरण लावण्यात आले आहे.गांधीजींनी सेवाग्रामला राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम बनविलेली कुटी म्हणजे आदिनिवास होय. ही कुटी बांबू, बोरा, बल्ली, कवेलू, माती आदींपासून बनविली होती. वास्तूची सुरक्षितता आश्रमसाठी महत्त्वाचा विषय आहे. पवसाळ्यात विषेश काळजी घेतली जाते.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी