शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

३४ हजार मीटर सूत कताईतून बापूंना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:29 IST

सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात महात्मा गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीला अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात आली. बुधवारला पहाटे ५.४५ वाजता नई तालिम समिती परिसरातील घंटी घर ते बापू कुटी अशी रामधून गात प्रभात फेरी काढण्यात आली.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमातील ७१ वे अखंड सूत्रयज्ञ : अनेकांनी घेतला उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमात महात्मा गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीला अखंड सूत्रयज्ञाने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात आली. बुधवारला पहाटे ५.४५ वाजता नई तालिम समिती परिसरातील घंटी घर ते बापू कुटी अशी रामधून गात प्रभात फेरी काढण्यात आली. बापू कुटी समोर प्रार्थना आणि अखंड सूत्रयज्ञाला आश्रमच्या जेष्ठ कार्यकर्त्या कुसुम पांडे, नथ्थूजी चव्हाण, डॉ. शिवचरण ठाकूर, पवन गणवार यांनी सूतकताईला सुरूवात केली. सायंकाळी उशीरापर्यंत एकूण ३४ हजार मीटर सूत कताई करून महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.सेवाग्राम आश्रम, नई तालिम समिती व गांधी सेवा संघच्या कार्यकर्त्यांसह गांधीजींना माणनाऱ्यांनी या सूत कताईच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शिवाय आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी टकळी, पेटी चरखा व किसान चरख्यावर तूर कताई केली. सायंकाळी अर्धा तास प्रार्थना भूमिवर सामूहिक सूतकताई करण्यात आली. रात्रीला एक तासाचे बापू कुटी वरांड्यात सर्व धर्म भजन पार पडली. यात आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, हिरा शर्मा, जालंधरनाथ, नामदेव ढोले, बाबा खैरकार, विजय धुमाळे, सिद्धेश्वर उंबरकर, प्रशांत ताकसांडे, पंडित चन्नोळे, रूपेश कडू, दक्षिण आफ्रिकेचे मोहन भाई हिरा, योगेश माथुरिया, संजय बाफना, धर्मेंद्र राजपूत, शोभा कवाडकर, सुचित्रा झाडे, प्रभा शहाने, इस्लाम हुसैन, रिटा हुसैन, सुधाकर ताकसांडे, नंदू गावंडे आदी सहभागी झाले होते.उपवास ठेवून अर्पण केली जातेय श्रद्धांजलीजेष्ठ गांधीवादी कुसुम पांडे आणि नथ्थुजी चव्हाण हे गांधीजींच्या पुण्यतिथीला उपवास करतात. कुसूम पांडे या मागील ७० वर्षांपासून ३० जानेवारीला हा उपवास करून तर चव्हाण हे सुमारे २० वर्षांपासून उपवास करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करतात.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटीSewagramसेवाग्राम