शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:07 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही.

ठळक मुद्देरामदास तडस : पीक कर्ज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही. काँगे्रस शासन काळात कर्ज वाटपात गैरप्रकार झाला. मोठ्या भांडवलदारांना दोनशे कोटीच्या कारखान्यासाठी हजार कोटींचे कर्ज या बँक अधिकाऱ्यांनी दिले; पण भाजप शासनाने शेतकरी कर्जमुक्तीचे आदेश दिले असताना बँक अधिकारी गरीब शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. बँकाचे लालफितशाही धोरण शेतकºयांच्या कर्जमुक्तीत अडसर ठरत आहे. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असा गंभीर इशारा खा. रामदास तडस यांनी दिला.स्थानिक आर.के. हायस्कूलच्या सभागृहात शेतकरी पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खा. तडस पूढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना शासनाने सुरू केली. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी ९८ हजार ४५५ अर्ज आले. पैकी ६६ हजार १०१ ग्रिनलिस्ट मध्ये आलेले शेतकरी आहे. त्यांच्या कर्जमाफीसाठी ४८५ कोटी मंजूर झाले; पण यापैकी केवळ ४४ हजार १८७ शेतकऱ्यांच्या खात्यात २६० कोटी जमा आहे. ३२,३५४ अर्जाबाबत कुठलीही माहिती नाही. २१,९१४ शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, प्रभारी तहसीलदार भागवत, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, जयंत येरावार, गजानन राऊत, दीपक फुलकरी उपस्थित होते. संचालन विनोद माहुरे यांनी केले तर आभार उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी मानले. यावेळी नितीन बडगे, कपील शुक्ला यासह शेतकरी व बँक अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी