शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:07 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही.

ठळक मुद्देरामदास तडस : पीक कर्ज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही. काँगे्रस शासन काळात कर्ज वाटपात गैरप्रकार झाला. मोठ्या भांडवलदारांना दोनशे कोटीच्या कारखान्यासाठी हजार कोटींचे कर्ज या बँक अधिकाऱ्यांनी दिले; पण भाजप शासनाने शेतकरी कर्जमुक्तीचे आदेश दिले असताना बँक अधिकारी गरीब शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. बँकाचे लालफितशाही धोरण शेतकºयांच्या कर्जमुक्तीत अडसर ठरत आहे. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असा गंभीर इशारा खा. रामदास तडस यांनी दिला.स्थानिक आर.के. हायस्कूलच्या सभागृहात शेतकरी पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खा. तडस पूढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना शासनाने सुरू केली. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी ९८ हजार ४५५ अर्ज आले. पैकी ६६ हजार १०१ ग्रिनलिस्ट मध्ये आलेले शेतकरी आहे. त्यांच्या कर्जमाफीसाठी ४८५ कोटी मंजूर झाले; पण यापैकी केवळ ४४ हजार १८७ शेतकऱ्यांच्या खात्यात २६० कोटी जमा आहे. ३२,३५४ अर्जाबाबत कुठलीही माहिती नाही. २१,९१४ शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, प्रभारी तहसीलदार भागवत, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, जयंत येरावार, गजानन राऊत, दीपक फुलकरी उपस्थित होते. संचालन विनोद माहुरे यांनी केले तर आभार उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी मानले. यावेळी नितीन बडगे, कपील शुक्ला यासह शेतकरी व बँक अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी