शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

खरीप-रबीतील कर्जवाटपात बँका दिसताहेत निरूत्साही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

जिल्ह्यात खरिपाचा ४ लाख ५ हजार ६२८.०३ हेक्टरवर पेरा होता. रबीचे २७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६७० हेक्टर इतके पेरणी क्षेत्र होते. खरिपाचे नियोजन करतेवेळी बँकांकडून रबीचेही नियोजन केले जात असून बँकांकडून निधी राखीव ठेवला जातो. खरीप आणि रबी हंगामात बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्यानेच लक्ष्यपूर्ती होऊ शकली नाही, वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देलक्ष्यपूर्ती निम्मीच । उद्दिष्ट ९८० कोटींचे, गाठले केवळ ६६ टक्के

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरिपासह रबी हंगामात बँकांनी कर्जवाटपात निरुत्साह दाखविल्याने लक्ष्यपूर्ती निम्मीच होऊ शकली. रबीची बऱ्यापैकी पेरणी आटोपूनही कर्जवितरणाचे प्रमाण केवळ २८.५७ टक्क्यांवर राहिले.खरिपात जिल्ह्यातील बँकांना ८८२ कोटी, तर रबी हंगामात ९८ कोटींचे उद्दिष्ट होते. मात्र, ४ लाख ५ हजार ६२८. ०३ हेक्टरवर पेरणी होऊनही खरिपात ३३२ कोटी तर रबी हंगामात केवळ २८ कोटी इतकेच कर्जवाटप झाले. लक्ष्यपूर्ती न झाल्याची कारणमिमांसा केली असता अनेकांनी कर्जाचे नूतनीकरण केले नाही, शिवाय अद्याप शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करीत असून मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने असलेली नापिकी, परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी पिकांचे झालेले नुकसान यामुळेच कर्ज घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे कारण बँकांकडून पुढे केल जात आहे.जिल्ह्यात खरिपाचा ४ लाख ५ हजार ६२८.०३ हेक्टरवर पेरा होता. रबीचे २७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६७० हेक्टर इतके पेरणी क्षेत्र होते. खरिपाचे नियोजन करतेवेळी बँकांकडून रबीचेही नियोजन केले जात असून बँकांकडून निधी राखीव ठेवला जातो. खरीप आणि रबी हंगामात बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्यानेच लक्ष्यपूर्ती होऊ शकली नाही, वस्तुस्थिती आहे.जिल्ह्यातील अनेक भागात कापसाचे लागवडक्षेत्र मोठे आहे. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकºयांनीच अधिक कर्ज घेतले.रबी हंगामात कर्जाची फारशी उचल झाली नाही. नापिकी, अस्मानी-सुल्तानी संकटांमुळे कर्ज फेडणे अवघड होत असताना, नवे कर्ज कशाला घ्यायचे म्हणूनही कर्ज घेण्याकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. परिणामी, आजही अनेक शेतकऱ्यांचा सावकारी पाश कायम असल्याचे चित्र आहे.राष्ट्रीयीकृत बँकांचे अडेलतट्टू धोरणखरीप हा प्रमुख हंगाम असल्याने याकरिता मोठ्या प्रमाणावत निधी दिला जातो. रबी हंगामाकरिता निधीची तरतूद कमी असते. खरिपातील कर्जाची नियमित फेडणी झाली असेल तर बँकांकडून नवे कर्ज देण्याबाबत विचार केला जातो. अनेक बँका कर्ज वाटप करताना अडेलतट्टू धोरण राबवितात. यामुळे कित्येक शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करतात. त्यांच्याकडून बँकांची कानउघाडणीही केली जाते. मात्र, शासनाकडून आम्हाला निर्देश नाहीत. आम्ही काय करायचे म्हणून बँक व्यवस्थापने वेळ मारून नेताना दिसतात.

टॅग्स :bankबँक