शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

खरीप-रबीतील कर्जवाटपात बँका दिसताहेत निरूत्साही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

जिल्ह्यात खरिपाचा ४ लाख ५ हजार ६२८.०३ हेक्टरवर पेरा होता. रबीचे २७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६७० हेक्टर इतके पेरणी क्षेत्र होते. खरिपाचे नियोजन करतेवेळी बँकांकडून रबीचेही नियोजन केले जात असून बँकांकडून निधी राखीव ठेवला जातो. खरीप आणि रबी हंगामात बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्यानेच लक्ष्यपूर्ती होऊ शकली नाही, वस्तुस्थिती आहे.

ठळक मुद्देलक्ष्यपूर्ती निम्मीच । उद्दिष्ट ९८० कोटींचे, गाठले केवळ ६६ टक्के

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरिपासह रबी हंगामात बँकांनी कर्जवाटपात निरुत्साह दाखविल्याने लक्ष्यपूर्ती निम्मीच होऊ शकली. रबीची बऱ्यापैकी पेरणी आटोपूनही कर्जवितरणाचे प्रमाण केवळ २८.५७ टक्क्यांवर राहिले.खरिपात जिल्ह्यातील बँकांना ८८२ कोटी, तर रबी हंगामात ९८ कोटींचे उद्दिष्ट होते. मात्र, ४ लाख ५ हजार ६२८. ०३ हेक्टरवर पेरणी होऊनही खरिपात ३३२ कोटी तर रबी हंगामात केवळ २८ कोटी इतकेच कर्जवाटप झाले. लक्ष्यपूर्ती न झाल्याची कारणमिमांसा केली असता अनेकांनी कर्जाचे नूतनीकरण केले नाही, शिवाय अद्याप शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करीत असून मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने असलेली नापिकी, परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी पिकांचे झालेले नुकसान यामुळेच कर्ज घेण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे कारण बँकांकडून पुढे केल जात आहे.जिल्ह्यात खरिपाचा ४ लाख ५ हजार ६२८.०३ हेक्टरवर पेरा होता. रबीचे २७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६७० हेक्टर इतके पेरणी क्षेत्र होते. खरिपाचे नियोजन करतेवेळी बँकांकडून रबीचेही नियोजन केले जात असून बँकांकडून निधी राखीव ठेवला जातो. खरीप आणि रबी हंगामात बँकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्यानेच लक्ष्यपूर्ती होऊ शकली नाही, वस्तुस्थिती आहे.जिल्ह्यातील अनेक भागात कापसाचे लागवडक्षेत्र मोठे आहे. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकºयांनीच अधिक कर्ज घेतले.रबी हंगामात कर्जाची फारशी उचल झाली नाही. नापिकी, अस्मानी-सुल्तानी संकटांमुळे कर्ज फेडणे अवघड होत असताना, नवे कर्ज कशाला घ्यायचे म्हणूनही कर्ज घेण्याकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. परिणामी, आजही अनेक शेतकऱ्यांचा सावकारी पाश कायम असल्याचे चित्र आहे.राष्ट्रीयीकृत बँकांचे अडेलतट्टू धोरणखरीप हा प्रमुख हंगाम असल्याने याकरिता मोठ्या प्रमाणावत निधी दिला जातो. रबी हंगामाकरिता निधीची तरतूद कमी असते. खरिपातील कर्जाची नियमित फेडणी झाली असेल तर बँकांकडून नवे कर्ज देण्याबाबत विचार केला जातो. अनेक बँका कर्ज वाटप करताना अडेलतट्टू धोरण राबवितात. यामुळे कित्येक शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करतात. त्यांच्याकडून बँकांची कानउघाडणीही केली जाते. मात्र, शासनाकडून आम्हाला निर्देश नाहीत. आम्ही काय करायचे म्हणून बँक व्यवस्थापने वेळ मारून नेताना दिसतात.

टॅग्स :bankबँक