शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

कर्ज पुनर्गठनासाठी बँकेत रांगा

By admin | Updated: June 20, 2016 01:59 IST

शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बियाणे, खते आदी जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

शेतकऱ्यांची लगबग : नंदोरी येथील बँक शाखा रविवारीही सुरूनारायणपूर : शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बियाणे, खते आदी जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करीत आहेत. आतापर्यंत बँक आॅफ महाराष्ट्र शाखा नंदोरीने पुनर्गठण प्रक्रिया सुरू केली नव्हती; पण नव्याने आलेले प्रभारी व्यवस्थापक एस.के. भट्टाचार्य यांनी तीन दिवसांपासून पुनर्गठन प्रक्रियेला वेग दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचीही गर्दी होत असल्याचे दिसते. सकाळी ८ वाजताच बँकेच्या आवारात शेतकऱ्यांच्या रांगा लागत असल्याचे दिसते.गतवर्षीचा दुष्काळ लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले. यामुळे बँकांनी शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे हप्ते पाडून देत नवीन कर्ज वाटपास सुरूवात केली होती. असे असले तरी बँक आॅफ महाराष्ट्र नंदोरी येथील कर्ज पुनर्गठण प्रकिया रखडली होती. यामुळे शेतकरीही यासाठी बँकेमध्ये जात नव्हते. तीन दिवसांपूर्वी नंदोरी शाखेत प्रभारी व्यवस्थापक म्हणून एस.के. भट्टाचार्य रूजू झाले आहेत. ते स्वत: बँकेत ९ वाजता येत असून पुनर्गठणाची अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्ज पुनर्गठण प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती होताच शेतकऱ्यांचीही बँकेत गर्दी होत आहे. परिसरातील खातेदार शेतकरी सकाळी ८ वाजतापासूनच नंदोरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या आवारात रांगा लावताना दिसून येतात. कर्ज पुनर्गठनाची प्रकरणे अधिक असल्याने त्यांनी रविवारीही बँक सुरू ठेवली. व्यवस्थापक सौरभ भट्टाचार्य हे सर्व कर्मचाऱ्यांसह बँकेत कार्यरत असल्याचे दिसून आले. ही पद्धत पुर्वीपासून अवलंबणे गरजेचे आहे. किमान या शाखा व्यवस्थापकांनी प्रक्रिया नियमित व वेगाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(वार्ताहर)