शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लोक अदालतीमध्ये पैसे भरलेल्या शेतकऱ्याला बँकेने केले ‘नादार’

By admin | Updated: June 14, 2015 02:27 IST

नापिकी आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेले शेतकरी बँकेचे संपूर्ण कर्ज अदा करू शकत नाहीत.

भविष्यात कर्ज नाही : व्याज अदा करण्यास तयार असतानाही कर्जास नकारचअल्लीपूर : नापिकी आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेले शेतकरी बँकेचे संपूर्ण कर्ज अदा करू शकत नाहीत. यामुळे लोक अदालतीमध्ये सेटलमेंट करून कर्ज अदा करतात; पण यानंतर शेतकऱ्यांना बँक नादारीतच काढत असल्याचे दिसते. अशा शेतकऱ्यांना बँकेतून पुन्हा कर्ज दिले जात नाही. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. पवनी येथील शेतकरी हिरामण बालपांडे यांनी २००९-१० मध्ये भारतीय स्टेट बँक शाखा अल्लीपूरकडून पाच एकर शेतीवर १७ हजार ८०३ रुपये कर्ज घेतले. त्याचा कर्ज खाते क्र. ११७१०९५१८४४ असा आहे. सतत तीन वर्ष नापिकी झाल्याने कर्ज थकित राहीले आणि २३ नोव्हेंबर २०१३ मध्ये बँकेने सदर कर्ज प्रकरणात लोक अदालत हिंगणघाट येथे टाकले. नोटीसी मार्फत १७ हजार ८०३ रुपये मुद्दल व ७ हजार ४७९ रुपये व्याज, असे एकूण २५ हजार २८१ रुपये अदा करा अन्यथा सेटलमेंंट करून मुद्दल भरा, असे कळविले. यावरून शेतकऱ्याने मुद्दल रक्कम अदा केली; पण बँकेने सर्व सेटलमेंट करीत नादार बुडीत कर्जदार म्हणून जाहीर केले. यामुळे सदर शेतकऱ्याला भविष्यात बँकांकडून कर्ज उपलब्ध होणार नाही.बँकेने भुलथापा देत व कोणतीही माहिती वा भविष्यात कर्ज मिळणार नाही याची सूचना न देता हे सेटलमेंट केले. यात बँकेने माफ केलेले व्याज आणि त्यावरील व्याज, अशी पूर्ण रक्कम अदा करण्यास शेतकरी तयार आहे; पण बँक ती स्वीकारत नाही आणि नवीन कर्जही देत नाही. शिवाय कर्ज निल केल्याचे प्रमाणपत्र देण्यासही बँकेद्वारे नकार दिला जात आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)