शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

नाल्याच्या दुतर्फा बांबू आणि चारा लागवड करावी

By admin | Updated: May 17, 2017 00:33 IST

जलयुक्त शिवार अभियानात नाला खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. खोलीकरण करताना काढण्यात आलेली माती नाल्याच्या दोन्ही बाजूला

शैलेश नवाल : २०१७-१८ मध्ये १४५ गावांची निवड लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जलयुक्त शिवार अभियानात नाला खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. खोलीकरण करताना काढण्यात आलेली माती नाल्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात येते. ही माती पावसामुळे पुन्हा नाल्यात वाहून जाऊ नये तसेच शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा म्हणून शेताच्या बाजूकडे बांबुची व नाल्याच्या बाजुकडे चारा रोपांची लागवड करावी. यासाठी लागणारी बांबुची रोपे वनविभागाकडून तर गवताचे बियाणे व ठोंबे कृषी विभाग वा कृषी विद्यापीठाकडून मागवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. जलयुक्त शिवार आढावा बैठकीत ते बोलत होते. यासाठी येणारा खर्च प्रत्येक विभागाने आकस्मिक निधीतून करावा. बांबुवरील निर्बंध काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना बांबु लागवडीपासून तीन वर्षांनंतर आर्थिक फायदा होण्यास सुरुवात होते. यासाठी शेतकऱ्यांना केवळ बांबु रोपांची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. गवत लागवडीमुळे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल. जमिनीची धुपही थांबू शकेल. यामुळे या पावसाळ्यात ज्या-ज्या ठिकाणी नाला खोलीकरण झाले, तेथे दुर्तफा बांबु व गवत लागवड करणे. जलयुक्त शिवारमधील सर्व अंमलबजावणी यंत्रणांना बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले. २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये झालेल्या कामांतून गावांचा पाण्याचा ताळेबंद पूर्ण झाला की नाही, यासाठी त्रयस्थ विभागांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहेत. यात सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या विभागाने व्यवस्थित सर्वेक्षण केले नसल्यास त्या गावातील शिल्लक काम सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेला पूर्ण करावे लागणार आहे. गाळमुक्त धरण योजनेतून जिल्ह्यातील पाच तलावातील काळ काढण्याचे काम सुरू करावे. यातून निघणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचाही या कामात सहभाग घ्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, उपवनसंरक्षक दत्तात्रय पगार, लघुसिंचन जि.प. कार्यकारी अभियंता गेहलोत, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी. वाहणे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे एम.एस. चौधरी तथा तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. १४१.५६ कोटींच्या तरतुदीला मान्यता जलयुक्त शिवार अभियानात २०१७-१८ मध्ये १४५ गावांची निवड करण्यात आली आहे. यात वर्धा - २२, सेलू -१०, देवळी- २८, आर्वी १७, आष्टी - १६, कारंजा - १८, हिंगणघाट -१९ व समुद्रपूर तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. यात कृषी विभाग- १२११, वन विभाग- ११५०, लघुसिंचन ११०, लघुसिंचन (जि.प)- १००, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा-११२, ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प.-२२७ अशा एकूण २९१० कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी एकूण १४१ कोटी ५६ लाख ५८ हजार रुयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे. या कामातील दुरुस्ती आणि नाला खोलीकरणाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. वनविभागाने खोल व समतल चर, साठवण तलाव तसेच माथा ते पायथा काम करण्यास प्राधान्य द्यावे. अन्यथा स्व-खर्चाने करावी लागणार दुरूस्ती जलयुक्त शिवारच्या २०१५-१६ आणि २०१६-१७ मधील कामांचा आढावा घेताना, दुरुस्तीच्या सर्व कामांना मंजुरी देण्यात येणार आहे; पण त्यांनतर गावातील एकही जुने दुरुस्तीचे काम शिल्लक राहू नये, याची दक्षता घ्यावयाची आहे. जुने काम शिल्लक राहिल्यास त्याची जबाबदारी गावांचे सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेवर राहणार आहे. संबंधित यंत्रणेला स्व-खर्चाने ते दुरुस्तीचे काम पूर्ण करावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.