शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

बामर्डा पूल ठरतोय मृत्यूचा सापळा

By admin | Updated: August 7, 2016 00:20 IST

धानोरा मार्गावरील बामर्डा येथील पूल महिन्याभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खचला व वाहून गेला.

पुलाचे काम कोण करणार : ग्रामस्थांनी विचारला सवाल, वाहने जाताना बसतात हादरे हिंगणघाट : धानोरा मार्गावरील बामर्डा येथील पूल महिन्याभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खचला व वाहून गेला. सध्या या पुलाच्या उर्वरित भागावरून वाहतूक सुरू असताना पूल हादरतो. या पुलाचे काम कोण करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या पुलावरून मार्गक्रमण करताना अपघाताची शक्यता बळावली आहे. पुलावरून वाहने जाताना पूल हादरून मोठा अपघात होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अपघात झाल्यावरच पुलाची दुरूस्ती होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वडनेर ते धानोरा या मार्गावरील बामर्डा येथील अरूंद व जीर्ण अवस्थेतील पुलावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. चंद्रपूर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही भरपूर आहे. यात भाविक रविवारी व बुधवारी वाहनांनी आजनसरा येथे भोजाजी महाराजांच्या मंदिरात दर्शनास येतात. या मार्गाच्या डागडुजीसाठी शासनाचा मोठा निधी खर्च करण्याचे नियोजन आहे. भूमिपूजनही नुकतेच करण्यात आले; पण दोन महिन्यांचा कालावधी लोटत असताना बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही. जीर्ण झालेला बामर्डा गावाजवळील पूल सततच्या पावसाने तुटून वाहून गेला. याकडेही एक महिन्यापासून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. दोन वाहने रात्री या पुलावर आल्यास अपघात निश्चित आहे. शिवाय रहदारीचा रस्ता असल्याने धोका अधिकच वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत पुलाची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)