शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत मोर्चातून बहुजनांचा हुंकार

By admin | Updated: January 6, 2017 01:18 IST

कुण्या एका मागणीकरिता एक समाज रस्त्यावर येवून मोर्चा काढतो. यात मागणी पूर्ण होत नाही, असे म्हणत

४३ मागण्यांकरिता एकवटल्या ४४ संघटना : शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचा सहभाग वर्धा : कुण्या एका मागणीकरिता एक समाज रस्त्यावर येवून मोर्चा काढतो. यात मागणी पूर्ण होत नाही, असे म्हणत ‘एकच पर्व बहुजन सर्व’चा नारा देत जिल्ह्यातील सर्वच बहुजन संघटनांच्यावतीने वर्धेत गुरुवारी एका विशाल मोर्चातून आक्रोश नोंदविला. या मार्चातून तब्बल ४३ मागण्यांचे निवेदन मोर्चाच्या एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले व ते मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्याची विनंती केली. या मोर्चात विविध मागण्यांसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत बहुजन समाजातील ओबीसी, एससी, एसटी, मराठा-कुणबी, एनटी, एसबीसी व अल्पसंख्याक मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, बौध्द, जैन, लिंगायत या सर्व बांधवांचा समावेश होता. मोर्चा निघण्याचे नियोजित स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान होते. यामुळे येथे सकाळी ११ वाजतापासूनच मोर्चेकरांची गर्दी उसळली होती. येथे एकत्र आलेल्या बहुजन समाजाला जिल्ह्यातील काही बहुजन नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एका मागणीकरिता एकत्र येण्याऐवजी सर्वच समाजाच्या मागण्यांकरिता एकत्र येण्याची वर्धेतील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले. हा मोर्चा कोणाच्या विरोधात नसल्याने या मैदानावर बहुजन समाज एकत्र आला होता. बहुजनांची उपस्थिती झाल्यानंतर दुपारी ३ वाजता हा मोर्चा ठरलेल्या मार्गाने रवाना झाला. अ‍ॅट्रोसिटीचा कायदा अधिक कडक करा, मुस्लीम समाजाला सच्चर कमिशन लागू करा, महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायदा कडून करून कोपर्डी आणि त्यापूर्वी व त्यानंतरच्या तत्सम घटनांमधील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच एनटी, डीएनटी, व्हिजेएनटी यांना अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे. राज्यातील १२ बलुतेदार समाजाच्या हक्काची अंमलबजावणी करून त्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तयार करावे, यासह अनेक मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा मुख्य डाकघर, शिवाजी चौकात पोहाचला. येथे मोर्चातील काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. या पुतळ्याला वेढा देत मुख्य मार्गाने बजाच चौकात पोहोचला. येथे विविध मागण्यांकरिता घोषणा देण्यात आल्या. येथून शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे रवाना झाला. रस्त्याने महापुरूषांचा जयजयकार करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ पोहोचलेला मोर्चा विसर्जित झाला. तत्पूर्वी एका शिष्टमंडळाने या मोर्चादरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.(प्रतिनिधी) महापुरूषांच्या वेशभूषेतील युवक ठरले आकर्षण ४या मोर्चात काही युवकांनी महापुरूषांच्या वेशभूषा केल्या होत्या. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा यासह गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेचा समावेश होता. या वेशभूषेतील युवक मोर्चाच्या प्रारंभी होते. चौकाचौकात त्यांच्या तोंडून घोषणा निघताच मोर्चात सहभागी युवकही घोषणा देत होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त ४वर्धा शहरातून निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणाऱ्यांची व सर्वसामान्यांची गैरसोय होवू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा ज्या मार्गे जाणार होता त्या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आली होती. मात्र मोर्चाला विलंब असल्याने त्या मार्गे होत असलेली वाहतूक कायम ठेवण्यात आली होती. मोर्चा निघताच या मार्गांवरील वाहतूक त्या काळाकरिता रोखण्यात आली होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.