शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नकार्य अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 14:21 IST

जगासह देशात व राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्च व एप्रिल महिन्यात होणारे लग्न समारंभ अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देअनेकांनी केले सोहळे रद्दतेरवी कार्यक्रमांवरही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगासह देशात व राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मार्च व एप्रिल महिन्यात होणारे लग्न समारंभ अडचणीत आले आहे. त्यामुळे वधू व वर पित्याच्या अडचणी वाढल्या आहे. मंगल कार्यालय, कॅटरर्स व इतर कामासाठी आगावू स्वरूपात दिलेली रक्कम परत कशी मिळवायची याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. मार्च महिन्या साधारणत: २९ व ३० मार्च या दिवशी लग्नांचा मोठा ठोक आहे. यासाठी सहा ते आठ महिन्यापूर्वीच मंगल कार्यालय, कॅटरर्स, लग्नबस्ते बूक करण्याचे व खरेदीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मार्च महिन्यात राज्यात कोरोना आजाराने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. राज्यात एक बळी या आजाराने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केले आहे.गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा स्थितीत लग्नकार्य मार्गी लावणे कठीण होणार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी लग्न आहे, असे अनेकजण विचारात पडले आहेत. तर काहींनी लग्न समारंभ, स्वागत समारंभ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सेलू येथील दफ्तरी परिवारातील स्वागत समारंभ याच पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती कुटूंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी तेरवी कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील कोरोना आजाराची स्थिती कशी राहते यावर पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून राहणार असून लग्न कार्य रद्द केले जात असल्याने यावर अवलंबून असणारे इतर अनेक व्यवसायही अडचणीत आले आहे. कॅटरर्स व्यवसायाला याचा फटका बसला असून वधू व वर पित्याचा लागलेला खर्च या पार्श्वभूमीवर पाण्यात जाणार आहे.

सार्वजनिक मिरवणूका, आंदोलनांवरही बंदीकोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मिरवणूका व सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लग्न समारंभात वरातीच्या मिरवणूका मोठ्या प्रमाणावर काढल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न वरातीही काढण्यास अडचण येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस