शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

आर्वी वन विभाग वाघाच्या मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:32 IST

नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदोन चमू सज्ज : तालुक्यापासून १६ कि़मी. दक्षिणेस धुमाकूळ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. असे असले तरी वाघाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत आहे.वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे शेतीची विविध कामे ठप्प पडली आहेत. आर्वी वन विभागाच्या दोन चमू वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रवाना करण्यात आल्या आहेत. परंतु, त्याचा खात्रिदायक ठावठिकाणा या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. सदर वाघ वर्धा जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा असून वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आर्वी वन विभागाची १६ कर्मचाºयांची दोन चमू तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प परिसरात डोळ्यात तेल टाकून सध्या खडा पहारा देत आहे. इतकेच नव्हे तर ग्रा.पं., महसुल, पोलीस विभाग यांचेही त्याकडे लक्ष असून त्यांच्याकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सदर वाघास पिंजराबंद करण्याची मागणी शेतकºयांसह दहशतीखाली असलेल्या परिसरातील ग्रामस्थांची आहे.सोशल मिडियावरील चित्रफित बनावटबुधवारी सकाळपासून आर्वी तालुक्यातील नागरिकांच्या मोबाईलमध्ये व्हॉटस् अ‍ॅप द्वारे वाघाबाबतची एक चित्रफित अनेक ग्रुपवर फिरत होती. या चित्रफित बाबत वन विभागाचे अधिकारी टुडे यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणली असता त्यांनी ती बनावटी असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता दक्ष राहण्याचे आवाहनही केले आहे.मांडव्यात वाघाचा बैलावर हल्लाआकोली : वर्धा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या मांडवा येथील विकास विद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या चिकराम यांच्या शेतात असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. यावेळी शेतातील नागरिकांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने तेथून पळ काढला. सदर घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली असून वन विभागाने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. मांडवा येथील विकास विद्यालय हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. शिवाय ते गावालगत आहे. याच भागातील चिकराम यांच्या शेतात चरत असलेल्या बैलावर अचानक नाल्याच्या दिशेकडून आलेल्या वाघाने हल्ला केला. ही बाब निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी आरडा-ओरड केली. यामुळे घटनास्थळावरून पळ काढून वाघाने नाल्या लगतच्या झुडपात आश्रय घेतला. सदरची माहिती वन विभागाच्या अधिकाºयांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठून परिसराची बारकाईने पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग