शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आर्वी वन विभाग वाघाच्या मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:32 IST

नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदोन चमू सज्ज : तालुक्यापासून १६ कि़मी. दक्षिणेस धुमाकूळ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नरभक्षक वाघास पकडण्यास गेल्यांना मागील सहा दिवसांपासून यश आलेले नाही. सदर वाघाचा धुमाकूळ आर्वी तालुक्यापासून दक्षिण दिशेला १६ किमी दूर सुरू असून त्याच्या मागावर आर्वी वन विभागाच्या दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. असे असले तरी वाघाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत आहे.वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे शेतीची विविध कामे ठप्प पडली आहेत. आर्वी वन विभागाच्या दोन चमू वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रवाना करण्यात आल्या आहेत. परंतु, त्याचा खात्रिदायक ठावठिकाणा या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. सदर वाघ वर्धा जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा असून वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आर्वी वन विभागाची १६ कर्मचाºयांची दोन चमू तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प परिसरात डोळ्यात तेल टाकून सध्या खडा पहारा देत आहे. इतकेच नव्हे तर ग्रा.पं., महसुल, पोलीस विभाग यांचेही त्याकडे लक्ष असून त्यांच्याकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सदर वाघास पिंजराबंद करण्याची मागणी शेतकºयांसह दहशतीखाली असलेल्या परिसरातील ग्रामस्थांची आहे.सोशल मिडियावरील चित्रफित बनावटबुधवारी सकाळपासून आर्वी तालुक्यातील नागरिकांच्या मोबाईलमध्ये व्हॉटस् अ‍ॅप द्वारे वाघाबाबतची एक चित्रफित अनेक ग्रुपवर फिरत होती. या चित्रफित बाबत वन विभागाचे अधिकारी टुडे यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणली असता त्यांनी ती बनावटी असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता दक्ष राहण्याचे आवाहनही केले आहे.मांडव्यात वाघाचा बैलावर हल्लाआकोली : वर्धा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या मांडवा येथील विकास विद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या चिकराम यांच्या शेतात असलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला. यावेळी शेतातील नागरिकांनी आरडा-ओरड केल्याने वाघाने तेथून पळ काढला. सदर घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत निर्माण झाली असून वन विभागाने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. मांडवा येथील विकास विद्यालय हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. शिवाय ते गावालगत आहे. याच भागातील चिकराम यांच्या शेतात चरत असलेल्या बैलावर अचानक नाल्याच्या दिशेकडून आलेल्या वाघाने हल्ला केला. ही बाब निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी आरडा-ओरड केली. यामुळे घटनास्थळावरून पळ काढून वाघाने नाल्या लगतच्या झुडपात आश्रय घेतला. सदरची माहिती वन विभागाच्या अधिकाºयांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठून परिसराची बारकाईने पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग