शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

बाबासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती देतात अनेकांना प्रेरणा

By admin | Updated: April 14, 2016 02:48 IST

देशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली.

तो दगड ठरला भेटीचा साक्षीदार : सेवाग्राम येथे महामानव आणि राष्ट्रपित्याची चर्चादिलीप चव्हाण सेवाग्रामदेशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली. या चर्चेत डॉ. आंबेडकर यांनी सेवाग्राम येथील दलित बांधवांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. या गावात जाण्यासाठी सायंकाळ झाल्याने त्यांनी खुल्या मैदानात एका दगडावर बसून समाजबांधवांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. तो दगड आजही येथे कायम असून त्या स्मृती अनेकांना प्रेरणादायी ठरत आहेत.डॉ. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या दगडाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. शिवाय येथे बसून त्यांनी दिलेला संदेश का फलकावर लिहून तो सर्वांना कळावा, यासाठी हा फलक दर्शनी भागात लावण्यात आला आहे. येथे येणारे या स्थळी प्रेरणा मिळत असल्याचे बोलून दाखवितात. त्या मैदानात उपस्थित गावातील काही नागरिक आजही त्या क्षणाची साक्ष देतात. डॉ. आंबेडकर १ मे १९३६ रोजी सेवाग्राम येथे आले होते. बापुकुटीत महात्मा गांधी यांची भेट घेत त्यांच्यात चर्चा झाली. या गावातील समाज बांधवांमध्ये आपल्या हक्काकरिता लढण्याची जनजागृती व्हावी, यासाठी बाबासाहेबांनी मूळ गावात जाऊन संवाद साधला. शिक्षणाची कास धरण्याचे केले होते आवाहनसेवाग्राम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम या मूळ गावात जाऊन शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन समाजबांधवांना केले होते. ज्या ठिकाणी बाबासाहेब बसले होते, ती जागा व दगड सौंदर्यीकृत करून त्यांच्या स्मृती आजही जोपासल्या जात आहे. महात्मा गांधी दलितांवर होत असलेल्या अन्यायामुळे अस्वस्थ होते. याच काळात डॉ. आंबेडकर यांचा या अन्यायाविरोधात लढा सुरू होता. दोन्ही महात्म्यांचे विचार एक असले तरी काही बाबतीत तात्विक वाद होते. या दोघांत चर्चा व्हावी, या उद्देशाने १ मे १९३६ रोजी जमनालाल बजाज यांनी डॉ. आंबेडकर यांची भेट आश्रमात बापूंशी घडवून आणली. येथील बौद्ध विहाराच्या परिसरातील ही जागा आता समाज बांधवांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाकरिता प्रेरणास्थान बनली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चर्चेचे साक्षीदार पांडुरंग गोसावी, नामदेव गोसावी, आत्माराम ताकसांडे तो क्षण आपल्या डोळ्यांत आजही साठवून आहेत.