शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अतिधोकादायक वृक्षांच्या आड शतायुषींवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

कंत्राटदाराला एका झाडाच्या फांद्या किंवा झाडं तोडण्याकरिता पालिकेकडून ९५० रुपये दिले जाते. कंत्राटदाराने अतिधोकादायक नसलेल्या झाडांनाही बोडखे करुन पालिकेकडून देयक उचलले तसेच ती लाकडेही विकल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील विविध भागातील वृक्ष किंवा फांद्या तोडण्याकरिता पालिकेचा आदेश नसतानाही अनेक महत्वाची झाडे तोडल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराचे अर्थकारण : मनमर्जी कारभारामुळे पर्यावरणाला धोका, शहरातील वृक्षप्रेमी अजूनही गप्पच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील नगरपालिका हद्दीतील अतिधोकादायक झाडे तोडणे, फांद्या तोडणे व पालापाचोळा साफ करुन विल्हेवाट लावण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. पण, कंत्राटदाराने पालिकेच्या कराराप्रमाणे कामकाज न करता मनमर्जी वृक्ष व फांद्या तोडण्याचा सपाटा लावला. तोडलेली लाकडे थेट विकल्या जात असल्याने आवश्यक नसलेल्या झाडांवरही कुऱ्हाड चालविली आहे. त्यामुळे शहरातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून यातील अर्थकारणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.कंत्राटदाराला पालिकेने करारनामा करुन देतांना १९ अटी घालून दिल्या आहेत. मात्र, या कंत्राटदाराने पालिकेला विचारात न घेता तब्बल ९ अटींचा भंग केल्याचे माहितीतून उघड झाले आहे. यामध्ये झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर जागा साफ न करणे, अभियंत्याकडून ले-आऊट न घेणे, काम सुरु करण्यापूर्वीचे व नंतरचे फोटो न घेणे, कामावरील कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरणे, मजूर व कर्मचाऱ्यांचा विमा न काढणे यासह विद्यूत वितरण, वनविभाग, पोलीस आदी यंत्रणेची मदत न घेणे आणि नागरिक व नगरसेवकांचे प्रमाणपत्र न घेणे आदी अनियमितता आहे. कंत्राटदाराला एका झाडाच्या फांद्या किंवा झाडं तोडण्याकरिता पालिकेकडून ९५० रुपये दिले जाते. कंत्राटदाराने अतिधोकादायक नसलेल्या झाडांनाही बोडखे करुन पालिकेकडून देयक उचलले तसेच ती लाकडेही विकल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील विविध भागातील वृक्ष किंवा फांद्या तोडण्याकरिता पालिकेचा आदेश नसतानाही अनेक महत्वाची झाडे तोडल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी तक्रारही करण्यात आली तसेच कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली पण, उत्तर मिळत नसल्याने पाणी कुठे मुरतेय, याकडे लक्ष लागले आहे. विकासाच्या नावाखाली वर्धा शहरासह जिल्ह्यात वृक्षकत्तल केली जात असल्याचे बघावयास मिळत आहे.झाडे नसतानाही म्हणे, फांद्या तोडल्या!कंत्राटदाराला फक्त अतिधोकादायक झाडं व त्याच्या फांद्या तोडण्याचा कंत्राट दिला आहे पण, त्यांनी शहरातील बालोद्यान, मोकळी जागा तसेच मंदिर परिसरात असलेली पर्यावरणपूरक झाडेही स्वस्वार्थाकरिता तोडली आहे. इतकेच काय ज्या ठिकाणी झाडंच अस्तित्वात नाही, त्या झाडाच्या फांद्या तोडल्याबाबत देयक उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कंत्राटदाराने शहरातील महत्त्वाची झाडे तोडून अनधिकृतपणे लाखो रुपयांचे लाकूड विकल्याचा आरोप होत आहे.शहरातील अतिधोकादायक वृक्षांच्या नावावर इतरही झाडे मोठ्या प्रमाणात तोडली आहे. पालिकेचा कोणताही आदेश नसताना मोठमोठी झाडे बोडखी केली आहे. मंदिर परिसर आणि बालोद्यानातील झाडांवरही कुऱ्हाड चालविली. लोभापोटी शहराच्या पर्यावरणाला धोका निर्माण केला आहे. त्यामुळे कंत्राट रद्द करुन कंत्राटदाराविरुद्ध वनकायद्यांतर्गत तसेच फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करावा.- जयंत सालोडकर, स्वीकृत सदस्य, नगरपालिका वर्धा.

टॅग्स :environmentपर्यावरण