शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

आगाऊ वेतनवाढीसाठी टाळाटाळ

By admin | Updated: January 24, 2016 02:01 IST

राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाड देण्याचा शासन निर्णय असल्यावरही यात भेदभाव केला जात आहे.

वर्धा : राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाड देण्याचा शासन निर्णय असल्यावरही यात भेदभाव केला जात आहे. त्यामुळे काही पुरस्कारप्राप्त शिक्षकांवर अन्याय होत आहे. हआ अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार २००५-०६ पर्यंत पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतन वाढी मिळत होत्या. त्यानंतर सहाव्या वेतन आयोगात ३ ते ४ टक्के वेतनवाढीचा उल्लेख असल्यामुळे या दोन वेतन वाढी शिक्षकांना दिल्या गेल्या नाही. काही शिक्षकांना या दोन वेतनवाढी रितसर सुरू आहेत तर काहींना नाही. त्यामुळे यासंदर्भात काही राज्य पुरस्कृत शिक्षकांनी दोन आगाऊ वेतनवाढी मिळण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या. १६ डिसेंबर २०१४ च्या न्यायालयीन आदेशाप्रमाणे सहा महिन्याच्या आत याचिकाकर्त्यांना दोन आगाऊ वेतन वाढी देण्याचे निर्देशित केले. परंतु निर्धारित कालावधीत राज्य शासनाने या संबंधीचे आदेश न काढल्यामुळे सदर याचिका कर्त्यातर्फे अवमान याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केली. यावरील निर्णयानुसार ९ डिसेंबर २०१५ ला शिक्षण सहसंचालक दिनकर पाटील यांनी पत्र पाठवून विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांना संबंधित १९ याचिकाकर्त्यांना देय रकमेचा फरक तक्ता सादर करण्याचे कळविले. परंतु लाभार्थ्यांना अजुनही दोन वेतन वाढी मिळाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांना निवेदन सादर करीत अन्याय दूर करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात मोहन मोहिते, उल्हास फडके, योगेश बन, शेषराव बिजवार, पुरुषोत्तम पोफळी, डॉ. कल्पना लांडगे, पद्माकर बाविस्कर, गुणवंत बाराहाते, बुद्धपाल कांबळे, सुनील उमाटे, प्रदीप बिबटे, संजय बारवे, वंदना येणूरकर, अशोक महाजन, प्रदीप गौतम, रामभाऊ बाचले आदी सहभागी होते.(शहर प्रतिनिधी)