शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
3
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
4
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
5
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

आगाऊ वेतनवाढीसाठी टाळाटाळ

By admin | Updated: January 24, 2016 02:01 IST

राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाड देण्याचा शासन निर्णय असल्यावरही यात भेदभाव केला जात आहे.

वर्धा : राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाड देण्याचा शासन निर्णय असल्यावरही यात भेदभाव केला जात आहे. त्यामुळे काही पुरस्कारप्राप्त शिक्षकांवर अन्याय होत आहे. हआ अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार २००५-०६ पर्यंत पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतन वाढी मिळत होत्या. त्यानंतर सहाव्या वेतन आयोगात ३ ते ४ टक्के वेतनवाढीचा उल्लेख असल्यामुळे या दोन वेतन वाढी शिक्षकांना दिल्या गेल्या नाही. काही शिक्षकांना या दोन वेतनवाढी रितसर सुरू आहेत तर काहींना नाही. त्यामुळे यासंदर्भात काही राज्य पुरस्कृत शिक्षकांनी दोन आगाऊ वेतनवाढी मिळण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या. १६ डिसेंबर २०१४ च्या न्यायालयीन आदेशाप्रमाणे सहा महिन्याच्या आत याचिकाकर्त्यांना दोन आगाऊ वेतन वाढी देण्याचे निर्देशित केले. परंतु निर्धारित कालावधीत राज्य शासनाने या संबंधीचे आदेश न काढल्यामुळे सदर याचिका कर्त्यातर्फे अवमान याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केली. यावरील निर्णयानुसार ९ डिसेंबर २०१५ ला शिक्षण सहसंचालक दिनकर पाटील यांनी पत्र पाठवून विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांना संबंधित १९ याचिकाकर्त्यांना देय रकमेचा फरक तक्ता सादर करण्याचे कळविले. परंतु लाभार्थ्यांना अजुनही दोन वेतन वाढी मिळाल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांना निवेदन सादर करीत अन्याय दूर करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात मोहन मोहिते, उल्हास फडके, योगेश बन, शेषराव बिजवार, पुरुषोत्तम पोफळी, डॉ. कल्पना लांडगे, पद्माकर बाविस्कर, गुणवंत बाराहाते, बुद्धपाल कांबळे, सुनील उमाटे, प्रदीप बिबटे, संजय बारवे, वंदना येणूरकर, अशोक महाजन, प्रदीप गौतम, रामभाऊ बाचले आदी सहभागी होते.(शहर प्रतिनिधी)