शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

विहिरींचे अनुदान देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: September 3, 2014 23:37 IST

शासन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी नवनवीन योजना काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते, परंतु संबंधित विभागाचे अधिकारी शासनाच्या चांगल्या योजनेचा बट्याबोळ करते.

विरूळ (आकाजी) : शासन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी नवनवीन योजना काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते, परंतु संबंधित विभागाचे अधिकारी शासनाच्या चांगल्या योजनेचा बट्याबोळ करते. परिणामी शेतकऱ्यांना विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार विरूळ परिसरातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे. मागील पाच वर्षाआधी शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्याला धडक सिंचन या योजनेतून एक लाख रूपये किंमतीच्या विहिरी मंजुर केल्या. अनेकांनी या विहिरीचे कामे पुर्ण केली. शासन नियमानुसार ३० फुट विहिर खोली करणे व विहिरीचे बांधकाम करणे बंधनकारक असल्यामुळे शेतकऱ्यांनी नियमानुसार पूर्ण बांधकामही केले. ज्यांचे बांधकाम व खोलीकरण नियमानुसार झाले अशा शेतकऱ्यांना मोजमाप करून कुणाला ८० हजार तर कुणाला ९० हजारपर्यंत अनुदान वाटप करण्यात आले. परंतु बांधकाम पूर्ण होवून सुमारे ४ ते ५ वर्षांचा कालावधी लोटला, परंतु उर्वरीत ९ ते १० हजारांची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. याबाबत आर्वीचे शाखा अभियंता तसरे यांना शेतकऱ्यांनी विचारपूस केली असता तुमच्यास विहिरीचे बांधकामाच्या वेळी मी आर्वी पं.स.ला नव्हतो. माझी नव्यानेच येथे बदली झाली आहे. माझ्या आधी जे अभियंता होते. त्यांनी तुमच्या विहिरीचे फाईल (सी.सी.) काम पूर्ण झाल्याचे दाखवून बंद केली आहे. या फाईलवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्या आहेत. यात मी काहीच करू शकत नाही, अशी उत्तरे मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही धक्काच बसला आहे. काम पूर्ण ३० फूट झाले. बांधकामही पूर्ण झाले. मग या योजनेत पूर्ण १ लाख रुपये असताना त्यांचे उर्वरीत १० हजार किंवा ८ हजार रूपयांचे अनुदान गेले कोठे? शेतक ऱ्यांना पूर्ण १ लाख रूपये का मिळाले नाही? उर्वरीत रक्कम संबंधित अधिकाऱ्यांनी हडप तर केली नाही, अशी सुद्धा शंका उपस्थित केली जात आहे. शेतकऱ्यांनी पूर्ण काम करूनही त्यांना त्यांच्या हक्काचे पूर्ण पैसे मिळाले नाही. मग फाईल कशी बंद केली? पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देवून फाईल बंद करण्याचा प्रकार ज्या तत्कालीन अभियंत्याने केला. त्याची सविस्तर चौकशी करण्याची गरज असून या योजनेत बराच घोळ झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. सदर अभियंत्याने प्रत्यक्षात विहिरीची पाहणी व मोजमाप कयन शेतकऱ्यांना अनुदान वाटप करायचे होते, परंतु टेबलावरच काळे कागदे केले. अंदाजे मोजमाप टाकून अनुदान वाटप केले. यामुळे उर्वरीत रक्कम गेली कुठे? ही रक्कम अशीच पडून आहे की यात घोळ झाला, हे संबंधित अधिकाऱ्यांने तपासून पाहण्याची गरज आहे.सदर बाबीची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करुन यातील सत्यता शेतकऱ्यांपुढे आणण्याची मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहे. घोळ झाला नसेल तर शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणीही केली जात आहे.(वार्ताहर)