शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

विहिरींचे अनुदान देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: September 3, 2014 23:37 IST

शासन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी नवनवीन योजना काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते, परंतु संबंधित विभागाचे अधिकारी शासनाच्या चांगल्या योजनेचा बट्याबोळ करते.

विरूळ (आकाजी) : शासन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी नवनवीन योजना काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते, परंतु संबंधित विभागाचे अधिकारी शासनाच्या चांगल्या योजनेचा बट्याबोळ करते. परिणामी शेतकऱ्यांना विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार विरूळ परिसरातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे. मागील पाच वर्षाआधी शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्याला धडक सिंचन या योजनेतून एक लाख रूपये किंमतीच्या विहिरी मंजुर केल्या. अनेकांनी या विहिरीचे कामे पुर्ण केली. शासन नियमानुसार ३० फुट विहिर खोली करणे व विहिरीचे बांधकाम करणे बंधनकारक असल्यामुळे शेतकऱ्यांनी नियमानुसार पूर्ण बांधकामही केले. ज्यांचे बांधकाम व खोलीकरण नियमानुसार झाले अशा शेतकऱ्यांना मोजमाप करून कुणाला ८० हजार तर कुणाला ९० हजारपर्यंत अनुदान वाटप करण्यात आले. परंतु बांधकाम पूर्ण होवून सुमारे ४ ते ५ वर्षांचा कालावधी लोटला, परंतु उर्वरीत ९ ते १० हजारांची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. याबाबत आर्वीचे शाखा अभियंता तसरे यांना शेतकऱ्यांनी विचारपूस केली असता तुमच्यास विहिरीचे बांधकामाच्या वेळी मी आर्वी पं.स.ला नव्हतो. माझी नव्यानेच येथे बदली झाली आहे. माझ्या आधी जे अभियंता होते. त्यांनी तुमच्या विहिरीचे फाईल (सी.सी.) काम पूर्ण झाल्याचे दाखवून बंद केली आहे. या फाईलवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्या आहेत. यात मी काहीच करू शकत नाही, अशी उत्तरे मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही धक्काच बसला आहे. काम पूर्ण ३० फूट झाले. बांधकामही पूर्ण झाले. मग या योजनेत पूर्ण १ लाख रुपये असताना त्यांचे उर्वरीत १० हजार किंवा ८ हजार रूपयांचे अनुदान गेले कोठे? शेतक ऱ्यांना पूर्ण १ लाख रूपये का मिळाले नाही? उर्वरीत रक्कम संबंधित अधिकाऱ्यांनी हडप तर केली नाही, अशी सुद्धा शंका उपस्थित केली जात आहे. शेतकऱ्यांनी पूर्ण काम करूनही त्यांना त्यांच्या हक्काचे पूर्ण पैसे मिळाले नाही. मग फाईल कशी बंद केली? पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देवून फाईल बंद करण्याचा प्रकार ज्या तत्कालीन अभियंत्याने केला. त्याची सविस्तर चौकशी करण्याची गरज असून या योजनेत बराच घोळ झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. सदर अभियंत्याने प्रत्यक्षात विहिरीची पाहणी व मोजमाप कयन शेतकऱ्यांना अनुदान वाटप करायचे होते, परंतु टेबलावरच काळे कागदे केले. अंदाजे मोजमाप टाकून अनुदान वाटप केले. यामुळे उर्वरीत रक्कम गेली कुठे? ही रक्कम अशीच पडून आहे की यात घोळ झाला, हे संबंधित अधिकाऱ्यांने तपासून पाहण्याची गरज आहे.सदर बाबीची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करुन यातील सत्यता शेतकऱ्यांपुढे आणण्याची मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहे. घोळ झाला नसेल तर शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणीही केली जात आहे.(वार्ताहर)