शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
4
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
5
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
6
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
7
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
8
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
9
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
10
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
11
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
12
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
13
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
14
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
15
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
16
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
17
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
18
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
19
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
20
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार

आर्द्राच्या अखेरपर्यंत सरासरी २४७ मिमी पाऊस

By admin | Published: July 05, 2017 12:22 AM

जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सध्या पाऊस कमीच लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात दररोज पाऊस येत आहे. येत असलेला पाऊस नियमित नसल्याने त्याची सरासरी गतवर्षीच्या तुलनेत कमीच असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारला आर्द्रा नक्षत्राचा अखेरचा दिवस होता. या नक्षत्रापर्यंत जिल्ह्यात सरसरी २४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी जुलै महिन्यापर्यंत २५४ मिमी पावसाची नोंद झाली होती. उद्या बुधवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. आद्राच्या अखरेच्या दिवशी दुपारी वर्धेत पावसाने हजेरी लावली. दोन दिवसाच्या विश्रातीनंतर हा पाऊस आला. याची मोजणी बुधवारी सकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सरासरी १,१२१ मीमी. पावसाची नोंद होणे अपेक्षित आहे. मात्र जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमीच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात झालेली सर्वाधिक नोंद सरासरी ९२०.७१ मीमी. एवढी आहे. पावसाच्या चार महिन्यात झालेली सरासरी महत्त्वाची धरली जाते. यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोरडे पडलेले जलसाठे भरल्याचे दिसून आले आहे. गत पावसाळ्यात या काळात जिल्ह्यातील एकूण चार जलाशय कोरडे असल्याची नोंद आहे. यंदा मात्र तसे नाही. जिल्ह्यातील सर्वच जलाशयात पाणी असल्याचे दिसून आले आहे. पावसाचे अजून दोन महिने बाकी आहेत.कोरड्या जलाशयात आले पाणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी झालेल्या पावसाने कोरड्या पडलेल्या जलाशयात पाणी आल्याचे झालेल्या नोंदिवरून दिसून आले आहे. आजच्या स्थितीत बोर प्रकल्पात १४.७६ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. धाम प्रकल्पात २०.५४, पोथरा २६.४७, पंचधारा २४.३४, डोंगरगाव १५.८९, मदन ३७.१४, मदन उन्नई ५.९७, लालनाला १२.३५, नांद १९.३४, उर्ध्व वर्धा ३५.१९, निम्न वर्धा १७.५८, बेंबळा २६.८२ तर सुकळी लघु प्रकल्पात आजच्या घडीला एकूण २५.२७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मंगळवारी वर्धेत ११.३४ मिमि पावसाची नोंद मंगळवारी वर्धा शहरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. दुपारपासून सायंकाळपर्यंत ११.३४ मिमि पावसाची नोंद झाली आहे.