शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

२५ दिवसांपासून थांबलीत ऑटोची चाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

गत काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने ऑटोचालकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. शहरात जवळपास १० ते १२ ठिकाणी ऑटो थांबे आहेत. नियमित प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासोबतच शाळेतून परत आणण्यासाठी ऑटोचालकांना महिन्याकाठी पैसे दिले जातात. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील २५ दिवसांपासून देशासह राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी असल्याने संपूर्ण बाजारपेठ ठप्प आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ३,३४५ ऑटोरिक्षा। १४ हजार कुटुंबसंख्येवर ओढवले उपासमारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात साडेतीन हजारांच्या जवळपास ऑटोरिक्षा चालक आहेत. दररोज रेल्वेस्थानक, बसस्थानकावरील प्रवाशांची ने-आण आणि विद्यार्थ्यांना शाळेत सोडून मिळणाऱ्या पैशावर आॅटोचालकांचा चरितार्थ चालतो. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे ऑटोचालकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.गत काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने ऑटोचालकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. शहरात जवळपास १० ते १२ ठिकाणी ऑटो थांबे आहेत. नियमित प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासोबतच शाळेतून परत आणण्यासाठी ऑटोचालकांना महिन्याकाठी पैसे दिले जातात. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील २५ दिवसांपासून देशासह राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी असल्याने संपूर्ण बाजारपेठ ठप्प आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शाळाही बंद आहेत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाची एसटी बससेवा आणि रेल्वेसेवाही ठप्प आहे. अनेकांचे पोट या व्यवसायावरच आहे. मात्र, २५ दिवसांपासून ऑटोची चाके जागीच थांबल्याने ऑटोचालकांचा हक्काचा रोजगार बनद झाला आहे.काही ऑटोचालकांनी बँकांचे कर्ज घेऊन ऑटोरिक्षाचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, व्यवसाय ठप्प झाल्याने बँकेचा हप्ता कसा भरायचा, असा प्रश्न अनेक ऑटोचालकांसमोर उभा ठाकला आहे. कोरोना विषाणूचा फटका ऑटोचालकांसोबतच तीनचाकी रिक्षाचालकांनाही बसला आहे.आर्थिक मदतीची चालकांची मागणीकोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने २३ मार्चपासून लॉकडाऊनचा अंमल केला आहे. लॉकडाऊनला जवळपास महिना पूर्ण होत आहे. मागील पंचवीस दिवसांपासून शहरातील सर्वच ऑटोरिक्षा चालक घरीच बसून आहेत. अजून किती दिवस घरी बसावे लागणार, हेही सध्या सांगणे अवघड असल्याने ऑटोचालकांसह मालक चिंतित आहेत. अनेकांचा ऑटोवरच उदरनिर्वाह आहे. शासनाने ऑटोचालकांना आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे ऑटोचालक प्रकाश कुबडे यांनी सांगितले.अनेक ऑटोचालक उच्च शिक्षितवर्धा शहरात साडेतीन हजार ऑटोरिक्षा असून यातील अनेक ऑटोचालक-मालक उच्च शिक्षित आहेत. अनेकांनी शासकीय नोकरीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, अपयशच आल्याने हताश होत अनेकांनी ऑटोव्यवसाय स्वीकारला आहे. या व्यवसायातील तुटपुंज्या मिळकतीतूनच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.बँकांचे हप्ते कसे भरावे?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे मागील २५ दिवसांपासून ऑटोरिक्षा घरीच उभे आहेत. अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन ऑटोरिक्षा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, व्यवसायच ठप्प असल्याने बँकांचे हप्ते भरायचे कसे, असा सवाल ऑटोचालक रवी काळपांडे, धनराज शेलोकार, मनोहर कुबडे, पंकज झाडे यांनी केला आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा