शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

‘भूमिगत’च्या कामांसह आंबेडकर उद्यानाच्या कामाचे ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 05:00 IST

शहरातील अर्धवट रस्ता कामामुळे अनेक अपघात झाले. न. प.ने २०० कोटी रुपये खर्चून भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना, बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम सुरू केले. मात्र, आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नवीन पाईपलाईनमधून पाणी मिळत नाही. कंत्राटदाराने अद्याप नागरिकांच्या घरी नळ कनेक्शन लावून दिले नाही. कंत्राटदाराचा आर्थिक फायदा करण्यासाठी अंदाजे ९० टक्के बिलाची रक्कमदेखील अदा करण्यात आली. अंदाजे ५ कोटी रुपये खर्च करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम ५० टक्केही पूर्ण झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील तीन वर्षांपासून नागरिक खड्ड्यातून मार्ग शोधत आहेत. न. प.ने सुमारे २०० कोटी रुपयांचे भूमिगत काम हाती घेतले आहे. मात्र, भूमिगतची कामे अद्याप अर्धवट असून, याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे कामही अर्धवट स्थितीत आहे. या सर्व कामांचे स्पेशल ऑडिट करून चौकशी समिती नेमून  दोषी अधिकारी, कंत्राटदार, लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शेखर शेंडे,  एमआयडीसी इंडस्ट्रियलिस्ट  असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी निवेदनातून केली.     शहरातील अर्धवट रस्ता कामामुळे अनेक अपघात झाले. न. प.ने २०० कोटी रुपये खर्चून भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना, बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम सुरू केले. मात्र, आज तीन वर्षांचा कालावधी लोटूनही नवीन पाईपलाईनमधून पाणी मिळत नाही. कंत्राटदाराने अद्याप नागरिकांच्या घरी नळ कनेक्शन लावून दिले नाही. कंत्राटदाराचा आर्थिक फायदा करण्यासाठी अंदाजे ९० टक्के बिलाची रक्कमदेखील अदा करण्यात आली. अंदाजे ५ कोटी रुपये खर्च करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम ५० टक्केही पूर्ण झाले नाही.  जानेवारी २०२१मध्ये ही सर्व कामे पूर्ण करून लोकार्पण होणार होते हे विशेष.भूमिगत गटार योजनेसाठी शहरातील मजबूत सिमेंट रस्ते फोडून चेंबर तयार करीत पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, यात चांगल्या रस्त्याची पुरती वाट लागली. कंत्राटदाराला १०० कोटीच्या कामाचे अंदाजे ८० टक्के देयकदेखील न. प.ने अदा केले. मात्र, अजून ५० टक्केही काम झाले नाही. जी कामे झाली तीदेखील निकृष्ट दर्जाची झाली. एकाही चेंबरची हायड्रो टेस्ट झाली नाही. त्यामुळे शहरातील विकासकामांचे स्पेशल ऑडिट करून चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.

शासन निधीचा दुरुपयोग... n शहरातील सिमेंट रस्ते फोडून थातूरमातूर डागडुजी करून रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडून रस्ता उखडला. रस्त्याने चालणेदेखील कठीण झाले आहे. याबाबत  नगराध्यक्ष, प्राधिकरणच्या अधिकाऱ्यंकडे अनेकदा तक्रारी करूनही याबाबत कुणी दखल घेतली नाही. संबंधित कंत्राटदार, अधिकारी व पदाधिकारी शासनाच्या निधीचा दुरूपयोग करीत असल्याचा आरोपी शेखर शेंडे आणि प्रवीण हिवरे यांनी चर्चेदरम्यान केला. n इतकेच नव्हे तर संबंधीत कामाची पाहणी करण्यासाठी राज्याच्या सचिव स्तरावरील अधिकारी येऊन गेले. मात्र, कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी केदार यांनी संबंधित कामाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार