शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

उमेदवारांच्या घोषणेकडे ग्रामीण मतदारांचे लक्ष

By admin | Updated: January 18, 2017 00:48 IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अद्यापही एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

चाचपणीच सुरू : उमेदवारांच्या गर्दीमुळे भाजपला बंडखोरीची भीती राजेश भोजेकर   वर्धा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अद्यापही एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. यामुळे ग्रामीण मतदारांमध्ये उमेदवारांबाबत कमालीची उत्सुकता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. इच्छुकांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू झालेली आहे. भाजपकडे उमेदवारांची मोठी यादी आहे. ही यादीही भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्ष सत्तेत आणि पक्षाचे अच्छे दिन असल्यामुळे ही बाब पक्षश्रेष्ठींसाठी आनंददायी असली तरी एका जिल्हा परिषद मतदार संघातून एकालाच उमेदवारी द्यायची असल्यामुळे बंडखोरीची भीतीही भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेम्यात पाहिजे तशी चहलपहल दिसत नाही. मात्र वरिष्ठ पातळीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर आलेली आहे. याच अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांनीही आघाडीसाठी पुढाकार घेणे सुरू केल्यामुळे नवे राजकीय समीकरण भाजपसाठी चिंतेची बाब ठरण्याची चिन्हे आहेत. वर्धा जिल्ह्यात भाजपचा जुना मित्रपक्ष शिवसेनाही स्वबळावर काही जागा लढविण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे वजन नसल्यामुळे भाजप शिवसेनेकडे ढुंकूनही बघायला तयार दिसत नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यास भाजपला शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेली मतेही धोक्याची घंटा ठरण्याची भीती आहे. बसपाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत बसपाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. परंतु नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत बसपाने पुलगाव पालिकेत पाच सदस्य निवडून आणले. ही बाब बसपा कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी असली तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हा चमत्कार करणे बसपासाठी वाटते तितके सोपे नाही. फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले महादेव जानकर यांचा शेकाप पक्ष वर्धा जिल्ह्यात वाढोणा-पिंपळखुटा जि.प. मतदार संघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. यासोबतच रिपाइं(आठवले गट) सेवाग्राम जि.प. मतदार संघातून आपले भवितव्य आजमावणार असल्याचे संकेत आहे. अन्य राजकीय पक्षही आपआपल्या परीनेव ही निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले आहे. मात्र एकाही पक्षाने आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.