शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या घोषणेकडे ग्रामीण मतदारांचे लक्ष

By admin | Updated: January 18, 2017 00:48 IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अद्यापही एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

चाचपणीच सुरू : उमेदवारांच्या गर्दीमुळे भाजपला बंडखोरीची भीती राजेश भोजेकर   वर्धा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अद्यापही एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. यामुळे ग्रामीण मतदारांमध्ये उमेदवारांबाबत कमालीची उत्सुकता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. इच्छुकांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू झालेली आहे. भाजपकडे उमेदवारांची मोठी यादी आहे. ही यादीही भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्ष सत्तेत आणि पक्षाचे अच्छे दिन असल्यामुळे ही बाब पक्षश्रेष्ठींसाठी आनंददायी असली तरी एका जिल्हा परिषद मतदार संघातून एकालाच उमेदवारी द्यायची असल्यामुळे बंडखोरीची भीतीही भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेम्यात पाहिजे तशी चहलपहल दिसत नाही. मात्र वरिष्ठ पातळीवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लहर आलेली आहे. याच अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांनीही आघाडीसाठी पुढाकार घेणे सुरू केल्यामुळे नवे राजकीय समीकरण भाजपसाठी चिंतेची बाब ठरण्याची चिन्हे आहेत. वर्धा जिल्ह्यात भाजपचा जुना मित्रपक्ष शिवसेनाही स्वबळावर काही जागा लढविण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे वजन नसल्यामुळे भाजप शिवसेनेकडे ढुंकूनही बघायला तयार दिसत नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यास भाजपला शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेली मतेही धोक्याची घंटा ठरण्याची भीती आहे. बसपाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत बसपाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. परंतु नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत बसपाने पुलगाव पालिकेत पाच सदस्य निवडून आणले. ही बाब बसपा कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी असली तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हा चमत्कार करणे बसपासाठी वाटते तितके सोपे नाही. फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले महादेव जानकर यांचा शेकाप पक्ष वर्धा जिल्ह्यात वाढोणा-पिंपळखुटा जि.प. मतदार संघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. यासोबतच रिपाइं(आठवले गट) सेवाग्राम जि.प. मतदार संघातून आपले भवितव्य आजमावणार असल्याचे संकेत आहे. अन्य राजकीय पक्षही आपआपल्या परीनेव ही निवडणूक लढण्याच्या तयारीला लागले आहे. मात्र एकाही पक्षाने आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.