शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:28 IST

कधी नव्हे ते विदर्भात किटकशाकांच्या फवारणीने ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकरी आत्महत्या सतत वाढत आहे; पण सरसकट कर्जमाफी सरकारने दिलेली नाही.

ठळक मुद्देसुनील तटकरे : महात्मा गांधी आश्रमातील सभा

आॅनलाईन लोकमतसेवाग्राम : कधी नव्हे ते विदर्भात किटकशाकांच्या फवारणीने ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शेतकरी आत्महत्या सतत वाढत आहे; पण सरसकट कर्जमाफी सरकारने दिलेली नाही. एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले नाही. सरकारकडून शेतकरी व जनतेची फसवणूक झाली आहे. या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाने विदर्भातून हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. नागपूर अधिवेशनात सरकारला जागं करण्याचं काम आम्ही करू, असे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी दिले.सेवाग्राम येथे हल्लाबोल पदयात्रा पोहोचल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. हल्लाबोल पदयात्रा सेवाग्राम मेडिकल चौकात आली. सभेपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रतिमेला आ. तटकरे, खा. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींनी हारार्पण केले.व्यासपीठावर आ. जयंत पाटील, जयदेव गायकवाड, राजेश टोपे, गुलाबराव देवकर, ख्वाजा बेग, हसन ुमुश्रीफ, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, चंद्रकांत पाटील, माजी आमदार गुलाबराव गावंडे, प्रा. सुरेश देशमुख, राजू तिमांडे, किशोर माथनकर, अ‍ॅड. सुधीर कोठारी, शरद देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, संदीप काळे आदी उपस्थित होते.तटकरे पूढे म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्रांती घडवून आणण्याचे काम केले. कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय त्यांनी घेतले. या महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व दिले. आज डॉ. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन असून त्यांनी या देशाला समानता आधारित लोकशाही दिली; पण धर्माचे राजकारण करणाºया सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच धोक्यात आणल्याचा आरोप करीत सरकारला घेरण्यासाठी हल्लाबोल आंदोलनाची तिव्रता वाढली पाहिजे, असे सांगितले.आ. गायकवाड यांनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देशाचे संविधान तयार व्हावे यासाठी जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा गांधीजींनी बाबासाहेबांचे नाव सुचविले. त्यांनी देशाला सक्षम व प्रभावी लोकशाही निर्माण करणारी व लोकांचे राज्य व्हावे यासाठी राज्य घटना लिहून काढली. उद्देशिका समजावून घेतली तर या सरकारने गुजरातमध्ये एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. विदर्भात हल्लाबोल पदयात्रा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. सुरेश देशमुख म्हणाले की, माझा जन्म या भूमीत झाला असून येथे महात्मा गांधीजींचे वास्तव्य राहिले आहे; पण विकास झाला नाही. या सरकारच्या आश्वासन व धोरणामुळे शेतकऱ्यात निराशा पसरली आहे. त्यांना आश्वस्त करणे गरजेचे आहे.सभेचे संचालन समीर देशमुख यांनी केले. यावेळी पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.धनंजय मुंडेंना आडवा आला प्रोटोकॉलविरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांना बोलण्यास आग्रह करण्यात आला; पण पक्षाच्या अध्यक्षाचे भाषण झाल्यानंतर बोलण्याचा प्रोटोकॉल नाही, असे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांना सभेला मार्गदर्शन करता आले नाही. राष्ट्रवादी काँगे्रसची ही पदयात्रा गुरूवारी सकाळी ९ वाजता महात्मा गांधी आश्रम येथून निघून पवनारकडे रवाना होणार आहे. रात्री सेलू येथे यात्रेचा मुक्काम राहणार आहे.