शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शेंगा पोखरणाऱ्या अळीचा ‘अटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:47 IST

यंदाच्या वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करताना ४ ते ६ तासावर सोयाबीन पिकासोबत तुरीची लागवड केली. परंतु, सध्या याच पिकावर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देअडचणीत भर : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : यंदाच्या वर्षी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करताना ४ ते ६ तासावर सोयाबीन पिकासोबत तुरीची लागवड केली. परंतु, सध्या याच पिकावर शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे तूर उत्पादकांच्या अडचणीत भर पडली असून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.सदर अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरूवातीला फिनाफॉस, प्रॉक्लेम, गायत्री फरफेक्ट, टाकुमी फेन, केम, कोराजन, मिसाईल सारखे औषधींची तुरीवर फवारण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी सुरू केला आहे. परंतु, सात दिवसात परिस्थिती जैसे थे होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. तुरीच्या शेंगांमध्ये सदर अशी दडून राहत असल्याने औषधांचा पाहिजे तसा परिणाम होत नसल्याचे शेतकरी सांगतात.शिवाय फवारणीच्या औषधीचे प्रमाण जास्त झाल्यास बहार गळण्याची तसेच उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी या भागातील तूर उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.थंडीचे प्रमाण कमी व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्याचे विपरित परिणाम तूर पिकावर दिसून येत आहे. शिवाय ढगाळी वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तुरीचे रोजचे परिक्षण करून शेतकऱ्यांनी किटनाशकाचा वापर करावा.- पंकज चौधरी, कृषी सहायक, अल्लीपूर.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती