शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा अटॅक, शेतकऱ्यांनो वेळीच करा उपाययोजना

By महेश सायखेडे | Updated: August 18, 2023 17:16 IST

एकरी दोन कामगंध सापळे लावणे ठरेल फायद्याचे

वर्धा : जिल्ह्यात २ लाख १९ हजार ३२ हेक्टरवर यंदा कपाशीची लागवड झाली आहे. शुक्रवारी पहाटेपासून थांबूनथांबून कोसळत असलेला पाऊस उभ्या पिकांसाठी नवसंजीवनी ठरला आहे; पण याच पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील विविध भागांतील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे एकरी दोन कामगंध सापळे लावणे गुलाबी बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी फायद्याचे ठरत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील विविध भागांतील कापूस पीक सद्य:स्थितीत पात्या, फुले तसेच बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. केळापूर येथे काही कृषी तज्ज्ञांनी थेट शेतात जात पाहणी केली असता कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून आला. सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉ. नीलेश वझिरे, तालुका कृषी अधिकारी सारिका ढुके यांनी शेतकरी शीतलसिंग धुमाळ व कुलदीपसिंग बैस यांच्या शेतात पाहणी केल्यावर कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. अशीच काहीशी परिस्थिती इतरही भागांत फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर असण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.

तज्ज्ञांना काय दिसले?

शेतकरी धुमाळ व बैस यांच्या शेतातील कपाशी पिकाची बारकाईने पाहणी केली असता फुलामध्ये पांढुरक्या, तसेच गुलाबी रंगाच्या अळ्या दिसून आल्या. ज्या फुलांमध्ये ही अळी आहे, अशी फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, अशा डोमकळ्या दिसून येत आहेत. सदर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आला असल्याने शेतकऱ्यांनीही किडीचे सर्वेक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी एकरी २ कामगंध सापळे उभारून त्यानंतर पिकाचे निरीक्षण करून शिफारशीनुसार गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.

- डॉ. जीवन कतोरे, प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा

जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी कपाशी पिकाचे सर्वेक्षण करावे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ५ ते १० टक्के दिसून आल्यास शिफारशीनुसार किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.

- डॉ. नीलेश वझिरे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीwardha-acवर्धा