शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात मोसंबीवर बुरशीजन्य रोगाचा हल्ला; ५० टक्के फळगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 20:47 IST

Wardha News तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

 

वर्धा: तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाले आहे. (Attack of fungal disease on citrus in Wardha district)

             तारासावंगा परिसरात आंब्या बहराच्या मोसंबीला चांगली फळधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी मोसंबीवरील रोगांपासून बचावाकरिता अनेक महागड्या औषधांच्या फवारण्या देखील केल्या. झाडावर फळांचे प्रमाण जास्त असल्याने एकूण उत्पन्न जास्त मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच बागा व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी काही दिवस वाट पाहण्याचे ठरवत बागा विकल्या नाही. परंतु आता अचानक बुरशी रोगाने मोसंबीवर हल्ला केल्याने ५० टक्क्यांहून अधिक फळ गळून पडत आहे.

             परिसरातील माणिकवाडा, वाडेगाव,साहुर, दृगवाडा, वडाळा बोरगाव,जामगाव व वर्धपूर येथील मोठ्या प्रमाणात मोसंबीची फळगळती होत आहे. १५ ते १८ हजार रुपये प्रति टन व्यापाऱ्यांकडून मागणी सुरू असतानाच परिसरात होणारी फळगळ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तर गेल्या वर्षापासून सतत होणारी फळगळ व अन्य काही रोग यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात फळबागांवर होत नव्हते हे इतिहासात पहिल्यांदाच पाहात असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

             गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात तारासावंगा परिसरात फळगळतीमुळे शेकडो टन मोसंबीचे नुकसान सुरू आहे. दुर्दैवाने जर फळगळ एवढ्याच मोठ्या प्रमाणात सुरू राहिली तर, मोसंबी उत्पादनासाठी फळबागांची घेतलेली काळजी, महागड्या फवारणीसाठी लागलेला खर्च देखील निघणे कठीण होणार आहे. यामुळे या रोगावर तातडीने उपाय सुचवावा व मोसंबी उत्पादकांचे नुकसान टाळावे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी तारासावंगा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मोसंबीवर बुरशी रोगांचे आक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू आहे. माझी तीन एकरामध्ये मोसंबीची बाग असून इतक्या महागड्या फवारण्या मोसंबीवर केल्या परंतु ऐन हंगामात व्यापाऱ्यांकडून मोसंबीला मागणी घातली जात असताना आठवडाभरापासून फळगळती सुरू आहे.

रमेश नासरे, मोसंबी उत्पादक शेतकरी, तारासावंगा

टॅग्स :agricultureशेती