शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वर्धा जिल्ह्यात मोसंबीवर बुरशीजन्य रोगाचा हल्ला; ५० टक्के फळगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 20:47 IST

Wardha News तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

 

वर्धा: तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाले आहे. (Attack of fungal disease on citrus in Wardha district)

             तारासावंगा परिसरात आंब्या बहराच्या मोसंबीला चांगली फळधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी मोसंबीवरील रोगांपासून बचावाकरिता अनेक महागड्या औषधांच्या फवारण्या देखील केल्या. झाडावर फळांचे प्रमाण जास्त असल्याने एकूण उत्पन्न जास्त मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच बागा व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी काही दिवस वाट पाहण्याचे ठरवत बागा विकल्या नाही. परंतु आता अचानक बुरशी रोगाने मोसंबीवर हल्ला केल्याने ५० टक्क्यांहून अधिक फळ गळून पडत आहे.

             परिसरातील माणिकवाडा, वाडेगाव,साहुर, दृगवाडा, वडाळा बोरगाव,जामगाव व वर्धपूर येथील मोठ्या प्रमाणात मोसंबीची फळगळती होत आहे. १५ ते १८ हजार रुपये प्रति टन व्यापाऱ्यांकडून मागणी सुरू असतानाच परिसरात होणारी फळगळ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तर गेल्या वर्षापासून सतत होणारी फळगळ व अन्य काही रोग यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात फळबागांवर होत नव्हते हे इतिहासात पहिल्यांदाच पाहात असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

             गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात तारासावंगा परिसरात फळगळतीमुळे शेकडो टन मोसंबीचे नुकसान सुरू आहे. दुर्दैवाने जर फळगळ एवढ्याच मोठ्या प्रमाणात सुरू राहिली तर, मोसंबी उत्पादनासाठी फळबागांची घेतलेली काळजी, महागड्या फवारणीसाठी लागलेला खर्च देखील निघणे कठीण होणार आहे. यामुळे या रोगावर तातडीने उपाय सुचवावा व मोसंबी उत्पादकांचे नुकसान टाळावे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी तारासावंगा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मोसंबीवर बुरशी रोगांचे आक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू आहे. माझी तीन एकरामध्ये मोसंबीची बाग असून इतक्या महागड्या फवारण्या मोसंबीवर केल्या परंतु ऐन हंगामात व्यापाऱ्यांकडून मोसंबीला मागणी घातली जात असताना आठवडाभरापासून फळगळती सुरू आहे.

रमेश नासरे, मोसंबी उत्पादक शेतकरी, तारासावंगा

टॅग्स :agricultureशेती