शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वर्धा जिल्ह्यात मोसंबीवर बुरशीजन्य रोगाचा हल्ला; ५० टक्के फळगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 20:47 IST

Wardha News तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

 

वर्धा: तारासावंगा परिसरात गेल्या आठवडाभरापासून बुरशीजन्य रोगामुळे मोसंबी फळाची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, आधीच कोरोनामुळे फळांना भाव नसल्याने संकटात असलेले शेतकरी फळगळतीमुळे हवालदिल झाले आहे. (Attack of fungal disease on citrus in Wardha district)

             तारासावंगा परिसरात आंब्या बहराच्या मोसंबीला चांगली फळधारणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी मोसंबीवरील रोगांपासून बचावाकरिता अनेक महागड्या औषधांच्या फवारण्या देखील केल्या. झाडावर फळांचे प्रमाण जास्त असल्याने एकूण उत्पन्न जास्त मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच बागा व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी काही दिवस वाट पाहण्याचे ठरवत बागा विकल्या नाही. परंतु आता अचानक बुरशी रोगाने मोसंबीवर हल्ला केल्याने ५० टक्क्यांहून अधिक फळ गळून पडत आहे.

             परिसरातील माणिकवाडा, वाडेगाव,साहुर, दृगवाडा, वडाळा बोरगाव,जामगाव व वर्धपूर येथील मोठ्या प्रमाणात मोसंबीची फळगळती होत आहे. १५ ते १८ हजार रुपये प्रति टन व्यापाऱ्यांकडून मागणी सुरू असतानाच परिसरात होणारी फळगळ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तर गेल्या वर्षापासून सतत होणारी फळगळ व अन्य काही रोग यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात फळबागांवर होत नव्हते हे इतिहासात पहिल्यांदाच पाहात असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.

             गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात तारासावंगा परिसरात फळगळतीमुळे शेकडो टन मोसंबीचे नुकसान सुरू आहे. दुर्दैवाने जर फळगळ एवढ्याच मोठ्या प्रमाणात सुरू राहिली तर, मोसंबी उत्पादनासाठी फळबागांची घेतलेली काळजी, महागड्या फवारणीसाठी लागलेला खर्च देखील निघणे कठीण होणार आहे. यामुळे या रोगावर तातडीने उपाय सुचवावा व मोसंबी उत्पादकांचे नुकसान टाळावे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी तारासावंगा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मोसंबीवर बुरशी रोगांचे आक्रमण केल्याने मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू आहे. माझी तीन एकरामध्ये मोसंबीची बाग असून इतक्या महागड्या फवारण्या मोसंबीवर केल्या परंतु ऐन हंगामात व्यापाऱ्यांकडून मोसंबीला मागणी घातली जात असताना आठवडाभरापासून फळगळती सुरू आहे.

रमेश नासरे, मोसंबी उत्पादक शेतकरी, तारासावंगा

टॅग्स :agricultureशेती