शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एटीएम ठरतात ग्राहकांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: May 30, 2014 00:20 IST

आर्थिक व्यवहार करताना तासनतास रांगेत उभे राहून वेळ आणि श्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून प्रत्येक बँकेने एटीएम सेवा देणे सुरू केले. बँकेकडूनही १५ ते २0 हजारांची रोख खात्यातून विड्रॉल करावयाची असल्यास एटीएम

वर्धा : आर्थिक व्यवहार करताना तासनतास रांगेत उभे राहून वेळ आणि श्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून प्रत्येक बँकेने एटीएम सेवा देणे सुरू केले. बँकेकडूनही १५ ते २0 हजारांची रोख खात्यातून विड्रॉल करावयाची असल्यास एटीएम कार्डचा वापर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. कमी वेळात आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी म्हणून बँकेच्या अनेक ग्राहकांकडून या सेवेचा वापर केला जातो; मात्र ही सेवा दिवसेंदिवस ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे प्रत्ययास येत आहे. बरेचदा तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांना या सेवेचा उपभोग घेता येत नाही. कधी एटीएम मशीनमधून रोकडच येत नाही, अशा स्थितीत ग्राहकांनी बँकेच्या कर्मचार्‍यांकडे मदतीची मागणी केली तर त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. याबाबत अनेक ग्राहकांनी नेवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमचा वापर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा रक्कम खात्यातून विड्रॉल झाल्याचे दाखविण्यात येते. पण कॅश मात्र मिळतच नाही. या संदर्भात संबंधित बँकेच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली असता ज्या बँकेच्या एटीएमच्या मशीनचा वापर केला तिथे तक्रार करा असा सल्ला दिला जातो. यानंतरही ग्राहक सुचनांचे पालन करतात. मात्र तिथेही कोणतीच मदत न मिळता रिकम्या हाताने परतावे लागते. बँकेच्या अधिकार्‍याकडून ही बाब आमच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगून टोलवून दिले जाते. या सर्व प्रक्रीयेत बँकेत केवळ हेलपाटा मारण्याखेरीज हाती काहीच लागत नसल्याची स्थिती आहे. बर्चदा ग्राहकांची  तक्रार घेण्यास नकार दिला. जातो. शिवाय शहानिशा न करता त्यांना बँकेतून घालवून दिले जाते. यात ग्राहकांना नाहक नुकसान सोसावे लागत आहे. ग्राहकांच्या सुविधेकरिता तयार केलेली एटीएम सेवा आता ग्राहकांकरिता आता डोकेदुखी ठरत आहे. ग्राहकांनी यासंदर्भात तक्रार दिली तरी बँकेच्या कर्मचार्‍यांकडून बरेचदा हेटाळणी केली जाते. ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असे ब्रीदवाक्ये असलेल्या या बँकांमध्ये बरेचदा ग्राहकांना याउलट प्रत्यय येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील खातेधारक तासनतास रांगेत उभे राहूनच व्यवहार करण्यास पसंती देतात. एटीएम मशीनचा वापर करून वेळ वाचविताना मनस्ताप नाहक सहन करावा लागत आहे.(स्थानिक  प्रतिनिधी)