शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अटल पेन्शन योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनी ठरणारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:30 IST

गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : विशेष मेळावा; तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा गरजुंनी लाभ घ्यावा. ही योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनीच ठरणारी आले, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. ते अटल पेन्शन योजना मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया, वर्धा मुख्य शाखा द्वारे अटल पेन्शन योजना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रादेशिक व्यवस्थापक जोरा सिंग, क्षेत्रीय प्रबंधक नागपूर मीना, वर्धेचे मुख्य व्यवस्थापक बहिरशेठ, शाखा व्यवस्थापक पुरेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, अटल पेन्शन योजना ही मुदतीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. जे वर्गणीदार १८ ते ४० या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी १ हजार ते ५ हजार प्रतीमाह पेन्शन मिळेल. या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी १ हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या ५० टक्के रक्कम जमा करणार आहे. याला लाभ गरजुंनी घेतला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य व्यवस्थापक बहिरशेठ यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाखा व्यवस्थापक पुरेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस