शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अटल पेन्शन योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनी ठरणारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:30 IST

गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : विशेष मेळावा; तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा गरजुंनी लाभ घ्यावा. ही योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनीच ठरणारी आले, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. ते अटल पेन्शन योजना मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया, वर्धा मुख्य शाखा द्वारे अटल पेन्शन योजना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रादेशिक व्यवस्थापक जोरा सिंग, क्षेत्रीय प्रबंधक नागपूर मीना, वर्धेचे मुख्य व्यवस्थापक बहिरशेठ, शाखा व्यवस्थापक पुरेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, अटल पेन्शन योजना ही मुदतीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. जे वर्गणीदार १८ ते ४० या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी १ हजार ते ५ हजार प्रतीमाह पेन्शन मिळेल. या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी १ हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या ५० टक्के रक्कम जमा करणार आहे. याला लाभ गरजुंनी घेतला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य व्यवस्थापक बहिरशेठ यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाखा व्यवस्थापक पुरेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस