शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

अस्मानी, सुल्तानी संकटांचा शेतकरी व व्यापाऱ्यांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:51 PM

राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे.

ठळक मुद्देकापसाची आवक अत्यल्प : अनेक समस्यांना द्यावे लागते तोंड

प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे. बहुदा दसऱ्याला सितदही झाल्यानंतर दिवाळीत कापसाची बाजारपेठ फुलू लागते; पण मागील काही वर्षांत नैसर्गिक बदल, नापिकी, कर्जबाजारी झालेला शेतकरी यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. या अस्मानी, सुल्तानी संकटामुळे शेतकरी तथा व्यापाºयांनाही फटका बसत आहे.शेतमाल खरेदी करणारा व्यापारी, शासनाने लादलेली नोटबंदी, सेवाकर व कॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे त्रस्त आहे. यासह स्थानिक समस्यांचा सामनाही शेतकरी, व्यापाऱ्यांना करावा लागतो. परिणामी, कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक नसल्याचे चित्र शहरातील दोन्ही कापूस खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.शहरात पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सोरटा शिवारातील नर्मदा कॉटेक्स या केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. गुरूवारपर्यंत ३०२१.५६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून कापसाला सरासरी ४४०० ते ४६५० रुपये भाव देण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सुनील राजपूत यांनी दिली. शहरातील श्री साई स्कॉटपीन या खासगी कापूस केंद्रावर आतापर्यंत २५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. येथे कापसाला ४६५० ते ४७५० रुपये भाव देण्यात आला आहे. शासनाची नोटबंदी, जीएसटी, कॅशलेस आर्थिक व्यवहाराचा फटका बसल्याने शेतकºयांकडून फारच कमी प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जात असल्याचे या केंद्रांच्या संचालकांनी सांगितले.केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले दहेगाव (धांदे) येथील शेतकरी राजू रंगारी व माणिक रामटेके यांनी समस्या कथन केल्या. शेतकºयांनी अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागत आहे. उभ्या शेतमालावर निसर्ग व हानी पोहोचविणाºया किटकांचा उपद्रव, वाढलेली मजुरी, कापूस खरेदी केंद्रापर्यंत माल आणण्याचा खर्च पाहता शेतकºयाला खर्च व परिश्रमाच्या तुलनेत शेतकºयाला कापूस ३ हजार क्विंटल पडत असल्याच्या व्यथाही शेतकरी मांडतात. एकेकाळी शहरातील कापूस खरेदी केंद्रावर बैलगाड्यांची रांग लागत होती; पण आज केवळ ३०० ते ५०० क्विंटलची आवक असल्याचे खरेदी केंद्रावर दिसून आले.दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदीपुलगाव शहरात दोन केंद्रांवर कापूस खरेदी केली जात आहे; पण या केंद्रांवर कापसाची आवक कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. आजपर्यंत दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. दोन्ही केंद्रांवर बºयापैकी भाव दिला जात असला तरी शेतकरी फारसा कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचे दिूसन येत आहे. यामुळे कापसाची बाजारपेठ मंदावल्याचेच दिसते.