शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

अस्मानी, सुल्तानी संकटांचा शेतकरी व व्यापाऱ्यांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:51 IST

राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे.

ठळक मुद्देकापसाची आवक अत्यल्प : अनेक समस्यांना द्यावे लागते तोंड

प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे. बहुदा दसऱ्याला सितदही झाल्यानंतर दिवाळीत कापसाची बाजारपेठ फुलू लागते; पण मागील काही वर्षांत नैसर्गिक बदल, नापिकी, कर्जबाजारी झालेला शेतकरी यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. या अस्मानी, सुल्तानी संकटामुळे शेतकरी तथा व्यापाºयांनाही फटका बसत आहे.शेतमाल खरेदी करणारा व्यापारी, शासनाने लादलेली नोटबंदी, सेवाकर व कॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे त्रस्त आहे. यासह स्थानिक समस्यांचा सामनाही शेतकरी, व्यापाऱ्यांना करावा लागतो. परिणामी, कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक नसल्याचे चित्र शहरातील दोन्ही कापूस खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.शहरात पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सोरटा शिवारातील नर्मदा कॉटेक्स या केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. गुरूवारपर्यंत ३०२१.५६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून कापसाला सरासरी ४४०० ते ४६५० रुपये भाव देण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सुनील राजपूत यांनी दिली. शहरातील श्री साई स्कॉटपीन या खासगी कापूस केंद्रावर आतापर्यंत २५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. येथे कापसाला ४६५० ते ४७५० रुपये भाव देण्यात आला आहे. शासनाची नोटबंदी, जीएसटी, कॅशलेस आर्थिक व्यवहाराचा फटका बसल्याने शेतकºयांकडून फारच कमी प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जात असल्याचे या केंद्रांच्या संचालकांनी सांगितले.केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले दहेगाव (धांदे) येथील शेतकरी राजू रंगारी व माणिक रामटेके यांनी समस्या कथन केल्या. शेतकºयांनी अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागत आहे. उभ्या शेतमालावर निसर्ग व हानी पोहोचविणाºया किटकांचा उपद्रव, वाढलेली मजुरी, कापूस खरेदी केंद्रापर्यंत माल आणण्याचा खर्च पाहता शेतकºयाला खर्च व परिश्रमाच्या तुलनेत शेतकºयाला कापूस ३ हजार क्विंटल पडत असल्याच्या व्यथाही शेतकरी मांडतात. एकेकाळी शहरातील कापूस खरेदी केंद्रावर बैलगाड्यांची रांग लागत होती; पण आज केवळ ३०० ते ५०० क्विंटलची आवक असल्याचे खरेदी केंद्रावर दिसून आले.दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदीपुलगाव शहरात दोन केंद्रांवर कापूस खरेदी केली जात आहे; पण या केंद्रांवर कापसाची आवक कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. आजपर्यंत दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. दोन्ही केंद्रांवर बºयापैकी भाव दिला जात असला तरी शेतकरी फारसा कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचे दिूसन येत आहे. यामुळे कापसाची बाजारपेठ मंदावल्याचेच दिसते.