शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

अस्मानी, सुल्तानी संकटांचा शेतकरी व व्यापाऱ्यांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:51 IST

राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे.

ठळक मुद्देकापसाची आवक अत्यल्प : अनेक समस्यांना द्यावे लागते तोंड

प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक वातावरणातील बदलाचा परिणाम शेती, शेतकरी व व्यापाऱ्यांवर होत आहे. बहुदा दसऱ्याला सितदही झाल्यानंतर दिवाळीत कापसाची बाजारपेठ फुलू लागते; पण मागील काही वर्षांत नैसर्गिक बदल, नापिकी, कर्जबाजारी झालेला शेतकरी यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. या अस्मानी, सुल्तानी संकटामुळे शेतकरी तथा व्यापाºयांनाही फटका बसत आहे.शेतमाल खरेदी करणारा व्यापारी, शासनाने लादलेली नोटबंदी, सेवाकर व कॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे त्रस्त आहे. यासह स्थानिक समस्यांचा सामनाही शेतकरी, व्यापाऱ्यांना करावा लागतो. परिणामी, कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक नसल्याचे चित्र शहरातील दोन्ही कापूस खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.शहरात पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सोरटा शिवारातील नर्मदा कॉटेक्स या केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. गुरूवारपर्यंत ३०२१.५६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून कापसाला सरासरी ४४०० ते ४६५० रुपये भाव देण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सुनील राजपूत यांनी दिली. शहरातील श्री साई स्कॉटपीन या खासगी कापूस केंद्रावर आतापर्यंत २५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. येथे कापसाला ४६५० ते ४७५० रुपये भाव देण्यात आला आहे. शासनाची नोटबंदी, जीएसटी, कॅशलेस आर्थिक व्यवहाराचा फटका बसल्याने शेतकºयांकडून फारच कमी प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जात असल्याचे या केंद्रांच्या संचालकांनी सांगितले.केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेऊन आलेले दहेगाव (धांदे) येथील शेतकरी राजू रंगारी व माणिक रामटेके यांनी समस्या कथन केल्या. शेतकºयांनी अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागत आहे. उभ्या शेतमालावर निसर्ग व हानी पोहोचविणाºया किटकांचा उपद्रव, वाढलेली मजुरी, कापूस खरेदी केंद्रापर्यंत माल आणण्याचा खर्च पाहता शेतकºयाला खर्च व परिश्रमाच्या तुलनेत शेतकºयाला कापूस ३ हजार क्विंटल पडत असल्याच्या व्यथाही शेतकरी मांडतात. एकेकाळी शहरातील कापूस खरेदी केंद्रावर बैलगाड्यांची रांग लागत होती; पण आज केवळ ३०० ते ५०० क्विंटलची आवक असल्याचे खरेदी केंद्रावर दिसून आले.दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदीपुलगाव शहरात दोन केंद्रांवर कापूस खरेदी केली जात आहे; पण या केंद्रांवर कापसाची आवक कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. आजपर्यंत दोन केंद्रांवर केवळ ५ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. दोन्ही केंद्रांवर बºयापैकी भाव दिला जात असला तरी शेतकरी फारसा कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचे दिूसन येत आहे. यामुळे कापसाची बाजारपेठ मंदावल्याचेच दिसते.