शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मागेल त्याला शेततळे योजना लक्ष्यांकापासून दूरच

By admin | Updated: May 23, 2017 01:05 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. कृषी विभागामार्फत ती सक्तीने राबविली गेली;

केवळ २८६ शेततळे : जिल्ह्याला दिले होते ३२०० शेततळ्यांचे उद्दिष्टलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. कृषी विभागामार्फत ती सक्तीने राबविली गेली; पण प्रारंभी शेतकऱ्यांचा प्रतिसादच मिळत नव्हता. यामुळे वर्धा जिल्हा लक्ष्यांकापासून दूर आहे. ३ हजार २०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत ३०० वर शेततळे पूर्ण झाले.कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेत वर्धा जिल्ह्याला ३ हजार २०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेली योजना जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पचनी पडली नाही. केवळ ५० हजार रुपयांच्या अनुदानात सदर शेततळ्यांचे काम करायचे होते. परिणामी, लक्ष्य गाठताना कृषी विभागाला श्रम घ्यावे लागत आहेत. कृषी विभागाच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत २८६ शेततळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा आकडा ३०० वर गेला आहे. शिवाय सुमारे १५० वर शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यातील २ हजार ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी लागणारे सेवाशुल्क शेतकऱ्यांनी अदा केले आहे. हे सर्व प्रस्ताव निकाली निघाल्यास कृषी विभागाला उद्दिष्टाप्रत पोहोचता येणार आहे. जययुक्त शिवार अभियानातील कंत्राटदारांकडून शेततळ्यांची कामे करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.गैरप्रकार टाळण्याची गरजशेततळे योजनेत कंत्राटदारांकडून गैरप्रकार केले जात आहेत. तळ्यांच्या मोजमापात निकष डावलले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. खोलीकरणातून निघालेल्या माती, मुरूमाच्या ढिगाऱ्यावरून तळ्याची खोली मोजली जात असल्याच्या तक्रारी आहे. हा प्रकार कृषी सहायकही करीत असल्याची ओरड होत आहे. कृषी विभागातील वरिष्ठांनी या प्रकारांवर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेला आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी स्वत:हुन शेततळ्यांची मागणी करीत आहे. ३०० वर तळे पूर्ण झाले असून १५० वर कामे सुरू आहेत. उर्वरित कामेही लवकरच हाती घेतली जातील. उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.