शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला शेततळे योजना लक्ष्यांकापासून दूरच

By admin | Updated: May 23, 2017 01:05 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. कृषी विभागामार्फत ती सक्तीने राबविली गेली;

केवळ २८६ शेततळे : जिल्ह्याला दिले होते ३२०० शेततळ्यांचे उद्दिष्टलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे योजना अंमलात आणली. कृषी विभागामार्फत ती सक्तीने राबविली गेली; पण प्रारंभी शेतकऱ्यांचा प्रतिसादच मिळत नव्हता. यामुळे वर्धा जिल्हा लक्ष्यांकापासून दूर आहे. ३ हजार २०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असताना जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यंत ३०० वर शेततळे पूर्ण झाले.कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेत वर्धा जिल्ह्याला ३ हजार २०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दीड वर्षांपूर्वी सुरू झालेली योजना जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पचनी पडली नाही. केवळ ५० हजार रुपयांच्या अनुदानात सदर शेततळ्यांचे काम करायचे होते. परिणामी, लक्ष्य गाठताना कृषी विभागाला श्रम घ्यावे लागत आहेत. कृषी विभागाच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत २८६ शेततळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा आकडा ३०० वर गेला आहे. शिवाय सुमारे १५० वर शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्यातील २ हजार ४८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी लागणारे सेवाशुल्क शेतकऱ्यांनी अदा केले आहे. हे सर्व प्रस्ताव निकाली निघाल्यास कृषी विभागाला उद्दिष्टाप्रत पोहोचता येणार आहे. जययुक्त शिवार अभियानातील कंत्राटदारांकडून शेततळ्यांची कामे करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.गैरप्रकार टाळण्याची गरजशेततळे योजनेत कंत्राटदारांकडून गैरप्रकार केले जात आहेत. तळ्यांच्या मोजमापात निकष डावलले जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. खोलीकरणातून निघालेल्या माती, मुरूमाच्या ढिगाऱ्यावरून तळ्याची खोली मोजली जात असल्याच्या तक्रारी आहे. हा प्रकार कृषी सहायकही करीत असल्याची ओरड होत आहे. कृषी विभागातील वरिष्ठांनी या प्रकारांवर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेला आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी स्वत:हुन शेततळ्यांची मागणी करीत आहे. ३०० वर तळे पूर्ण झाले असून १५० वर कामे सुरू आहेत. उर्वरित कामेही लवकरच हाती घेतली जातील. उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.