शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

घर बांधायला सांगितले,आता पैशाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:05 IST

ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर होताच ते परिवार कामालाही लागले. यात बहुतांश नागरिक हे स्वमालकीच्या जागेवर मोडक्या तोडक्या घरात राहणारे तसेच घर नसलेले आहेत. अनेक परिवार आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अजूनही किरायाच्या घरात राहतात. यासर्व कुटुंबांना शासनाच्यावतीने पहिली किस्त प्रात्प होताच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली.

ठळक मुद्देकोरोना संकटाचे दाहक वास्तव। लाभार्थ्यांसमोर आर्थिक संकटाचे डोंगर उभे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे म्हणून मोठा गाजावाजा करुन घरकुल योजना सुरू केली. पंतप्रधानांच्या या महत्वाकांक्षी योजनेने अनेकांनी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न रंगविले. अनेकांनी योजनेच्या अधीन राहून हक्काच्या जागेवर बांधण्यास सुरूवातही केली. सुरुवातीला अनुदानाच्या किश्ती बरोबर मिळाल्या. पण, आता मात्र, अनुदानाच्या पुढील किश्ती मिळणे थांबले आहे. न मिळण्यामागे यंत्रणेचे उत्तर एकच, ते म्हणजे कोरोनाचे संकट.नगरपालिकेंतर्गत पंतप्रधान आवास योजनेकरीता घरकुल मिळण्यास शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी अर्ज केले. यामध्ये टप्प्या-टप्प्याने अर्जांना मंजूरी देण्यात आली. ज्या कुटुंबांना घरकुल मंजूर होताच ते परिवार कामालाही लागले. यात बहुतांश नागरिक हे स्वमालकीच्या जागेवर मोडक्या तोडक्या घरात राहणारे तसेच घर नसलेले आहेत. अनेक परिवार आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अजूनही किरायाच्या घरात राहतात. यासर्व कुटुंबांना शासनाच्यावतीने पहिली किस्त प्रात्प होताच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. अगोदरच जीवनात विविध समस्यांचा सामना करणाऱ्या परिवारांना घर बांधताना अनेक अडचणी आल्या. जिल्ह्यातील सर्व वाळूघाट मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने अव्वाच्या सव्वा दराने वाळू विकत घ्यावी लागली. कसेबसे बांधकाम स्लॅब लेव्हलला नेले. काही लाभार्थ्यांनी आपापले बांधकाम पूर्ण केले. योजनेच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप आणि नियमात बसवून सर्व शासकीय सोपस्कार आटोपले. पैसे मिळण्याची वेळ आली आणि अघटित घडले. कोरोना आजाराने शिरकाव केला. हे संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आणि जनजीवन विस्कळीत होवून सर्व चाके जागीच थांबली.एक महिन्याचा कालावधी लोटूनही शासकीय कामे बंद आहेत. परिणामी, लाभार्थ्यांपुढे मोठी आर्थिक अडचण आणि पेच निर्माण झाला आहे. अनेकांनी स्वत:चे झोपडीवजा घर मोडले. किरायाने राहणे सुरू केले. अशात अनेकांचे घरकुलही पूर्ण झालेले नाही. त्यात शासकीय अनुदानाची किस्त मिळणे थांबले आहे. ज्या दुकानदारांकडून बांधकाम साहित्य घेतले ते आता पैशाचा तगादा लावत आहेत. कारण त्यांनाही मोठ्या व्यापाºयांना पैसे द्यायचे आहेत.पावसाळा अवघ्या दीड महिन्यांवर आला आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही. जवळ असलेले पैसे काही घरच्या कामात उपयोगात आणाले, तर काही घरखर्चात निघून गेले. सध्या इकडे आड, तिकडे विहीर... अशी अवस्था शहरातील घरकुल लाभार्थ्यांची झाली आहे. शासनाने या समस्येचे तत्काळ समाधान करण्यासाठी शिल्लक रक्कम घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.लाभार्थी पूर्णत्वाच्या प्रतीक्षेतघरकुल योजनेमार्फत लाभार्थ्यांनी घर बांधकामाला सुरूवात केली असता कोरोनामुळे कामे स्थगीत झाली. अशा परिस्थितीत निम्मेच कर्मचारी कामावर येत असल्याने अडचण निर्माण होत आहे. सर्व सुरळीत कधी होणार आणि घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक