शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पिंपळ वृक्ष कीडमुक्त करण्यासाठी आश्रमची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:31 IST

आश्रम परिसरात महात्मा गांधींनी लावलेले पिंपळाचे झाड आहे. या झाडाला कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. आश्रमाने पारंपरिक पद्धतीची उपाययोजना करून किडीचा नायनाट केला आहे.

ठळक मुद्देदिल्ली व नागपूरच्या पथकाने केली पाहणी : बुरशी नष्ट करण्यासाठी सूचविणार उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आश्रम परिसरात महात्मा गांधींनी लावलेले पिंपळाचे झाड आहे. या झाडाला कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. आश्रमाने पारंपरिक पद्धतीची उपाययोजना करून किडीचा नायनाट केला आहे. दिल्लीच्या धानुका अ‍ॅग्रीटेक लिमिटेड नागपूर शाखेचे अभय जिभकाटे व सुमोध झारीया यांनी झाडाची पाहणी केली. किडीचा नायनाट करून झाड हिरवेगार करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर त्यांनी अध्ययन केले.शेगाव या ठिकाणी राहण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. प्रथम कुटी निर्माणानंतर बापूंनी १९३६ मध्ये पिंपळाचे रोपटे लावले. या झाडाला ८२ वर्षे झालीत. अनेक उन्हाळे, पावसाळे व हिवाळे या वृक्षांनी पाहिलेत. आश्रमच्या वातावरणात शुद्धता आणि प्राणवायूचे भरपूर सिंचन करून वातावरण प्रफुल्लीत ठेवण्याचे काम पिंपळ वृक्षाने केले; पण या झाडावर किडीने आक्रमण केल्याने संकट निर्माण झाले. आश्रमने शेण, गोमुत्र, कडूनिंब यांचे द्रावण करून झाडावरील बाधित भागावर शिंपडले. एवढेच नव्हे तर झाडाच्या परिसरातही ते टाकण्यात आले. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.बापूंनी लावलेल्या या झाडाबाबतची माहिती धानुका अ‍ॅग्रीटेक लि.चे प्रशासकीय व्यवस्थापक आर.जी. अग्रवाल यांना मिळाली. त्यांनी नागपूर शाखेचे उपप्रबंधक अभय जिभकाटे व दिल्लीचे प्रोडक्ट एक्झीक्युटीव सुबोध झारीया यांना झाडाची माहिती घेत अहवाल देण्यास सांगितले. इतिहासाचा साक्षीदार पिंपळ वृक्ष हिरवेगार व किडमुक्त कसे होईल, यावर उपाययोजना होणार असल्याने नक्कीच झाडाला नवसंजीवनी मिळणार आहे.आश्रमाची स्थापना आणि पिंपळ रोपाची लागवड बापुंनी केली होती. स्मारकासोबत त्या झाडाचे सुद्धा महत्त्व आहे. झाडाला कीडे लागल्याने धोका निर्माण झाला होता. वनसंशोधन संस्थेकडे याबाबत विचारणा केली आहे. दिल्लीतील लोकांनी पाहणी केली असून ते उपाययोजना सूचवतील. झाड पूर्वीप्रमाणे हिरवेगार होऊन आयुष्य वाढावे हा आमचा प्रयत्न आहे.- टी.आर.एन. प्रभु, अध्यक्ष, आश्रम प्रतिष्ठान.अग्रवाल साहेबांना या झाडाविषयी माहिती मिळाली. त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठविले. झाडांना कीड व बुरशी दिसून येते. याचे फोटो व माहिती दिल्लीला पाठविण्यात येईल. जी उपाययोजना सूचवतील ती आश्रमच्या परवानगीने झाडावर करण्यात येईल. झाडांच्या मूळांना सेंद्रीय खत दिल्यास फायदा होईल. गांधीजींनी झाड लावले असल्याने त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे.- अभय जिभकाटे, नागपूर.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी