शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पिंपळ वृक्ष कीडमुक्त करण्यासाठी आश्रमची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:31 IST

आश्रम परिसरात महात्मा गांधींनी लावलेले पिंपळाचे झाड आहे. या झाडाला कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. आश्रमाने पारंपरिक पद्धतीची उपाययोजना करून किडीचा नायनाट केला आहे.

ठळक मुद्देदिल्ली व नागपूरच्या पथकाने केली पाहणी : बुरशी नष्ट करण्यासाठी सूचविणार उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आश्रम परिसरात महात्मा गांधींनी लावलेले पिंपळाचे झाड आहे. या झाडाला कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. आश्रमाने पारंपरिक पद्धतीची उपाययोजना करून किडीचा नायनाट केला आहे. दिल्लीच्या धानुका अ‍ॅग्रीटेक लिमिटेड नागपूर शाखेचे अभय जिभकाटे व सुमोध झारीया यांनी झाडाची पाहणी केली. किडीचा नायनाट करून झाड हिरवेगार करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर त्यांनी अध्ययन केले.शेगाव या ठिकाणी राहण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. प्रथम कुटी निर्माणानंतर बापूंनी १९३६ मध्ये पिंपळाचे रोपटे लावले. या झाडाला ८२ वर्षे झालीत. अनेक उन्हाळे, पावसाळे व हिवाळे या वृक्षांनी पाहिलेत. आश्रमच्या वातावरणात शुद्धता आणि प्राणवायूचे भरपूर सिंचन करून वातावरण प्रफुल्लीत ठेवण्याचे काम पिंपळ वृक्षाने केले; पण या झाडावर किडीने आक्रमण केल्याने संकट निर्माण झाले. आश्रमने शेण, गोमुत्र, कडूनिंब यांचे द्रावण करून झाडावरील बाधित भागावर शिंपडले. एवढेच नव्हे तर झाडाच्या परिसरातही ते टाकण्यात आले. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.बापूंनी लावलेल्या या झाडाबाबतची माहिती धानुका अ‍ॅग्रीटेक लि.चे प्रशासकीय व्यवस्थापक आर.जी. अग्रवाल यांना मिळाली. त्यांनी नागपूर शाखेचे उपप्रबंधक अभय जिभकाटे व दिल्लीचे प्रोडक्ट एक्झीक्युटीव सुबोध झारीया यांना झाडाची माहिती घेत अहवाल देण्यास सांगितले. इतिहासाचा साक्षीदार पिंपळ वृक्ष हिरवेगार व किडमुक्त कसे होईल, यावर उपाययोजना होणार असल्याने नक्कीच झाडाला नवसंजीवनी मिळणार आहे.आश्रमाची स्थापना आणि पिंपळ रोपाची लागवड बापुंनी केली होती. स्मारकासोबत त्या झाडाचे सुद्धा महत्त्व आहे. झाडाला कीडे लागल्याने धोका निर्माण झाला होता. वनसंशोधन संस्थेकडे याबाबत विचारणा केली आहे. दिल्लीतील लोकांनी पाहणी केली असून ते उपाययोजना सूचवतील. झाड पूर्वीप्रमाणे हिरवेगार होऊन आयुष्य वाढावे हा आमचा प्रयत्न आहे.- टी.आर.एन. प्रभु, अध्यक्ष, आश्रम प्रतिष्ठान.अग्रवाल साहेबांना या झाडाविषयी माहिती मिळाली. त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठविले. झाडांना कीड व बुरशी दिसून येते. याचे फोटो व माहिती दिल्लीला पाठविण्यात येईल. जी उपाययोजना सूचवतील ती आश्रमच्या परवानगीने झाडावर करण्यात येईल. झाडांच्या मूळांना सेंद्रीय खत दिल्यास फायदा होईल. गांधीजींनी झाड लावले असल्याने त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे.- अभय जिभकाटे, नागपूर.

टॅग्स :Bapu Kutiबापू कुटी